शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने सियालकोटवर हल्ला चढवला, अन् पाकिस्तानने अमृतसरवर; रात्रभर अफवांचा बाजार उठला...
2
पाकिस्तानला घरात घुसून मारले! १०० हून अधिक दहशतवादी ठार; पहलगाम हल्ल्याचा घेतला बदला
3
Operation Sindoor Live Updates: स्फोटाचा आवाजांमुळे अमृतसरमध्ये रात्रभर ब्लॅक आऊट; पोलिस म्हणतात काहीच सापडले नाही
4
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
5
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी निवडले ‘सिंदूर’ नाव; दडले आहेत कोणते पाच अर्थ? 
6
भारताच्या हल्ल्याला प्रत्युत्तरासाठी पाकची लष्कराला परवानगी
7
अर्ध्या तासात दहशतवादी भुईसपाट; ९ तळ उद्ध्वस्त; लष्करातील नारीशक्तीचे जगाला दर्शन
8
संपादकीय: याद राखा, हिशेब चुकता होईल! पाकिस्तान काय करेल आणि काय नाही...
9
पाकला धडा शिकवलाच, कायदेही मोडले नाहीत! एलओसी पार न करताच शत्रूवर मारा... 
10
सिंदूर, सोफिया अन् व्योमिका... नावात काय नाही, नावातच सारे दडलेले होते...
11
पाकिस्तान प्रतिहल्ला करेल?-शक्यता नाकारता येत नाही!
12
प्रवाशांना ‘बेस्ट’ची रिअल-टाइम सुविधा; मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उपक्रमाचे उद्घाटन 
13
१८ विमानतळांवरील कामकाज तात्पुरते बंद; एकट्या इंडिगोने सुमारे १६० उड्डाणे रद्द केली
14
सीमावर्ती जिल्ह्यांमधील १४ जिल्ह्यांत सर्व शाळा बंद; ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर पंजाब, राजस्थान आणि जम्मूत सूचना जारी  
15
विनाअपघात एसटी बस चालकांना बक्षीस देणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती
16
चंद्रावर उमटणार भारतीय अंतराळवीराचे पदचिन्ह
17
राज्यात गारपिटीची, तर मुंबईत मुसळधारेची शक्यता; मध्य महाराष्ट्र व मराठवाड्याला इशारा
18
रोहितने ‘तो’ निर्णय तेव्हाच घेतलेला? गंभीर आलेला, पण रोहित शर्मा अनुपस्थित होता... 
19
रोहित शर्माने घेतली कसोटीतून तडकाफडकी निवृत्ती; इंग्लंड दौऱ्यात मिळणार होता डच्चू...
20
गोष्ट मिठी नदीच्या न उपसलेल्या गाळाची..., गाळाने भरले भ्रष्ट अभियंत्याचे खिसे; चौकशीतून स्पष्ट 

१.४0 लाख हेक्टरवर रब्बी पेरणीचे नियोजन

By admin | Updated: October 12, 2015 01:56 IST

४५ हजार क्विंटल बियाण्याची मागणी.

अकोला: जिल्ह्यात यावर्षीच्या रब्बी हंगामात १ लाख ४0 हजार ३00 हेक्टर क्षेत्रावर रब्बी पेरणीचे नियोजन कृषी विभागामार्फत करण्यात आले आहे. रब्बी पेरणीसाठी ४५ हजार ३१६ क्विंटल बियाण्यांची मागणी कृषी आयुक्तालयाकडे करण्यात आली आहे.जिल्ह्यातील रब्बी पेरणीची सरासरी १ लाख ७ हजार १५६ हेक्टर एवढी आहे. सरासरीच्या तुलनेत यावर्षीच्या रब्बी हंगामात जिल्ह्यातील अकोला, आकोट, बाळापूर, बाश्रीटाकळी, तेल्हारा, पातूर व मूर्तिजापूर या सातही तालुक्यात १ लाख ४0 हजार ३00 हेक्टर क्षेत्रावर रब्बी पेरणीचे नियोजन जिल्हा कृषी विभागामार्फत करण्यात आले आहे. त्यामध्ये गहू, हरभरा, करडी, मका व सूर्यफूल इत्यादी पीक पेरणीच्या क्षेत्राचा समावेश आहे. रब्बी हंगामात पेरणीसाठी ४५ हजार ३१६ क्विंटल बियाण्याची मागणी जिल्हा कृषी विभागामार्फत राज्याच्या कृषी आयुक्तालयाकडे करण्यात आली आहे.दहा हजार क्विंटल बियाण्याचा पुरवठा!ल्ल रब्बी हंगामात जिल्ह्यातील पेरणीसाठी ४५ हजार ३१६ क्विंटल बियाण्याची मागणी कृषी आयुक्तालयाकडे करण्यात आली आहे. त्यापैकी ९ ऑक्टोबरपर्यंत जिल्ह्यात १0 हजार २५१ क्विंटल बियाण्याचा पुरवठा करण्यात आला आहे. त्यामध्ये रब्बी ज्वारी ५0 क्विंटल, गहू ५३0 क्विंटल, हरभरा ९ हजार ४७१ िक्वंटल, करडई १८५ क्विंटल व सूर्यफूल १५ क्विंटल बियाणे उपलब्ध झाले आहे.१२ हजार मेट्रिक टन खतसाठा उपलब्ध!रब्बी हंगामासाठी कृषी विभागामार्फत ७४ हजार ७00 मेट्रिक टन रासायनिक खतांची मागणी करण्यात आली आहे. त्यापैकी ९ ऑक्टोबरपर्यंत जिल्ह्यात १२ हजार ६७२ मेट्रिक टन खतांचा साठा उपलब्ध झाला आहे. त्यामध्ये युरिया ९३७ मेट्रिक टन, डीएपी १ हजार ५२३ मेट्रिक टन, एमओपी २ हजार ४0९ मेट्रिक टन,एसएसपी ७00 मेट्रिक टन, संयुक्त खते ६ हजार ६६३ मेट्रिक टन व मिश्र खते १५४ मेट्रिक टन ख तसाठय़ाचा समावेश आहे.