शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
2
"एवढ्या मोठ्या शुल्कवाढीने..."; ट्रम्प यांनी फोडला H-1B व्हिसा बॉम्ब, भारतानं व्यक्त केली मोठी चिंता!
3
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
4
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
5
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
6
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
7
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
8
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
9
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
10
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
11
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
12
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
13
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
14
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
15
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
16
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
17
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
18
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
19
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
20
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल

रब्बीचा हंगाम धोक्यात!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2017 01:42 IST

हातरूण : यावर्षी दमदार पावसाने हुलकावणी दिल्याने शेतशिवारातील शेततळय़ात पाण्याचा ठणठणाट आहे. हजारो रुपये खर्च करून साकारलेली शेततळी कोरडी पडल्याने, रब्बीचा हंगाम धोक्यात आला आहे.

ठळक मुद्देशेततळी पडली कोरडी यंदा अल्प पावसामुळे नदी-नाल्यांना पूर नाही!

लोकमत न्यूज नेटवर्कहातरूण : यावर्षी दमदार पावसाने हुलकावणी दिल्याने शेतशिवारातील शेततळय़ात पाण्याचा ठणठणाट आहे. हजारो रुपये खर्च करून साकारलेली शेततळी कोरडी पडल्याने, रब्बीचा हंगाम धोक्यात आला आहे.महाराष्ट्र शासनाने कृषी विभागामार्फत ‘मागेल त्याला शेततळे’ योजनेमार्फत शेततळी निर्माण करण्यासाठी कोट्यवधी रुपयांचे अनुदान दिले. दुष्काळावर मात करण्यासाठी शेततळे उपयुक्त असल्याने राज्यातील पर्जन्यावर आधारित कोरडवाहू शेतीसाठी पाणलोट व जलसंवर्धन माध्यमातून जलसिंचनाची उपलब्धता वाढविणे, तसेच संरक्षित व शाश्‍वत सिंचनाची सुविधा निर्माण करण्यासाठी  ‘मागेल त्याला शेततळे’ योजना कृषी विभागाने हातरुण शिवारात राबवली. कृषी विभागाच्या अधिकार्‍यांनी हातरुण, शिंगोली, मालवाडा, दुधाळा, बोरगाव वैराळे, अंदुरा, खंडाळा, लोणग्रा, मांजरी शेतशिवारात तालुका कृषी अधिकारी शशिकिरण जांभरूणकर आणि कृषी सहाय्यक गावित यांच्या प्रयत्नाने शेकडो शेततळी साकारली.शेतजमिनींच्या वरील बाजूस पावसाचे वाहून जाणारे पाणी अडवून शेततळ्यात साठवण्यात येते. आपत्कालीन परिस्थितीत पिकास पाणी उपलब्ध होण्यासाठी शेततळे गतवर्षी वरदान ठरली होती. पावसाच्या अनियमितपणामुळे पिकांना पाण्याची गरज असते. नेमक्या त्याच वेळी या शेततळ्यात साठविलेल्या पाण्यामधून एक किंवा दोन पाणी पिकास देऊन उत्पादन वाढण्यास मदत होऊ शकते. हाच उद्देश डोळ्यासमोर ठेवून शेतकर्‍यांनी शेतात शेततळी निर्माण केली. मात्र, यावर्षी शेततळी कोरडी राहिल्याने शेततळ्यातील पाणी पिकांना देता येणार नाही. संरक्षित सिंचनासाठी, तसेच रब्बी पिकांनाही या शेततळ्यातील पाणी देता येऊ शकते. पण, यावर्षी तुरळक पावसाने हजेरी लावली. परिसरातील नदी आणि नाल्यांना पावसाळा संपल्यात जमा असला, तरी एकही पूर आला नाही. त्यामुळे गतवर्षी साकारलेली शेततळी पावसाच्या पाण्याने भरली नाही. त्यामुळे शेततळ्यात पाण्याचा ठणठणाट आहे. बाळापूर तालुक्यात कृषी विभागाच्या पुढाकाराने गतवर्षी १७0 शेततळी साकारली. सात प्रकारच्या वेगवेगळ्या आकाराची शेततळी शेतात निर्माण केली आहेत. गतवर्षी शेततळी पावसाच्या पाण्याने तुडुंब भरली होती. यावर्षी मात्र शेततळ्यात पाण्याचा पत्ताच नाही. यावर्षी उडीद व मुगाच्या पिकाचे उत्पादन घटल्याने, रब्बीचे क्षेत्र वाढणार आहे. रब्बी पिकाला पाण्याची गरज असल्यास शेतकरी शेततळ्यातील पाणी पिकाला देतात. मात्र यावर्षी शेततळ्यात पाणीच नसल्याने रब्बीच्या पिकाला पाण्याची गरज लागल्यास पाणी कोठून द्यावे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. 

४५ शेततळ्यांचे अनुदान कधी?बाळापूर कृषी विभागाच्या पुढाकाराने साकारलेल्या १७0 शेततळ्यांपैकी ४५ शेततळ्यांचे अनुदान शेतकर्‍यांना मिळाले नाही. शेततळय़ांचे २१ ते २२ लाख रुपये थकीत असून, सहा महिने झाले, तरी शेतकर्‍यांना पैसे मिळाले नाहीत. थकीत अनुदानासाठी पाठपुरावा सुरू आहे. आता दिवाळीपूर्वी तरी शेततळ्याचे अनुदान मिळते का, याकडे शेतकर्‍यांचे लक्ष लागले आहे.

बाळापूर तालुक्यातील ४५ शेततळय़ांच्या थकीत अनुदानासाठी पाठपुरावा सुरू आहे. अनुदान प्राप्त होताच शेतकर्‍यांना तत्काळ वितरित करण्यात येईल. यावर्षी पाऊस कमी प्रमाणात असल्याने शेततळ्यात पाणी साचले नाही.- गावित, कृषी सहायक, हातरुण.-