शहरं
Join us  
Trending Stories
1
गुवाहाटीची खरी कथा मला विचारूनच लिहावी लागेल- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
2
न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनले जोहरान ममदानी, ट्रम्प यांच्या धमक्यांनंतरही मोठा विजय!
3
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
4
अमिताभ बच्चन यांनी विकले २ लक्झरी फ्लॅट्स; ‘बिग बीं’ची प्रॅापर्टीमधून बंपर कमाई, कितीमध्ये झाली ही ‘सुपर डील’?
5
"आम्ही कार्यक्रम वेळेत सुरु केलेला, पण..."; माधुरी दीक्षितच्या उशीरा येण्यामागचं खरं कारण आयोजकांनी सांगितलं
6
२०२६ला डबल धमाका, ७ राशींवर असीम शनि कृपा; उत्पन्नात लक्षणीय वाढ, घर खरेदीचे स्वप्न पूर्ण!
7
“६ महिन्यात ४८ लाख मतदार वाढ, डबल स्टार नाही, डबल मतदारांची यादी हवी”; शरद पवार गटाची मागणी
8
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
9
१३,००० कोटींचे कोकेन प्रकरण: डॉन वीरूच्या मुलाला पकडण्यासाठी १८० देशांची फौज; इंटरपोलची रेड नोटीस जारी
10
पालघरमधील तीन नगरपरिषदा, एका नगरपंचायतीत रणधुमाळी; यंदा कोण मारणार बाजी?
11
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
12
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
13
बदलापुरात युतीत लढाई? तर अंबरनाथमध्ये मविआत तडजोड? निवडणुकांमध्ये चुरशीची लढाई
14
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
15
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
16
रायगडमध्ये १० नगरपरिषदांमध्ये धूम युतीची की आघाडीची..? सर्व राजकीय पक्षांकडून हालचाली
17
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
18
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
19
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
20
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू

रब्बीचा हंगाम धोक्यात!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2017 01:42 IST

हातरूण : यावर्षी दमदार पावसाने हुलकावणी दिल्याने शेतशिवारातील शेततळय़ात पाण्याचा ठणठणाट आहे. हजारो रुपये खर्च करून साकारलेली शेततळी कोरडी पडल्याने, रब्बीचा हंगाम धोक्यात आला आहे.

ठळक मुद्देशेततळी पडली कोरडी यंदा अल्प पावसामुळे नदी-नाल्यांना पूर नाही!

लोकमत न्यूज नेटवर्कहातरूण : यावर्षी दमदार पावसाने हुलकावणी दिल्याने शेतशिवारातील शेततळय़ात पाण्याचा ठणठणाट आहे. हजारो रुपये खर्च करून साकारलेली शेततळी कोरडी पडल्याने, रब्बीचा हंगाम धोक्यात आला आहे.महाराष्ट्र शासनाने कृषी विभागामार्फत ‘मागेल त्याला शेततळे’ योजनेमार्फत शेततळी निर्माण करण्यासाठी कोट्यवधी रुपयांचे अनुदान दिले. दुष्काळावर मात करण्यासाठी शेततळे उपयुक्त असल्याने राज्यातील पर्जन्यावर आधारित कोरडवाहू शेतीसाठी पाणलोट व जलसंवर्धन माध्यमातून जलसिंचनाची उपलब्धता वाढविणे, तसेच संरक्षित व शाश्‍वत सिंचनाची सुविधा निर्माण करण्यासाठी  ‘मागेल त्याला शेततळे’ योजना कृषी विभागाने हातरुण शिवारात राबवली. कृषी विभागाच्या अधिकार्‍यांनी हातरुण, शिंगोली, मालवाडा, दुधाळा, बोरगाव वैराळे, अंदुरा, खंडाळा, लोणग्रा, मांजरी शेतशिवारात तालुका कृषी अधिकारी शशिकिरण जांभरूणकर आणि कृषी सहाय्यक गावित यांच्या प्रयत्नाने शेकडो शेततळी साकारली.शेतजमिनींच्या वरील बाजूस पावसाचे वाहून जाणारे पाणी अडवून शेततळ्यात साठवण्यात येते. आपत्कालीन परिस्थितीत पिकास पाणी उपलब्ध होण्यासाठी शेततळे गतवर्षी वरदान ठरली होती. पावसाच्या अनियमितपणामुळे पिकांना पाण्याची गरज असते. नेमक्या त्याच वेळी या शेततळ्यात साठविलेल्या पाण्यामधून एक किंवा दोन पाणी पिकास देऊन उत्पादन वाढण्यास मदत होऊ शकते. हाच उद्देश डोळ्यासमोर ठेवून शेतकर्‍यांनी शेतात शेततळी निर्माण केली. मात्र, यावर्षी शेततळी कोरडी राहिल्याने शेततळ्यातील पाणी पिकांना देता येणार नाही. संरक्षित सिंचनासाठी, तसेच रब्बी पिकांनाही या शेततळ्यातील पाणी देता येऊ शकते. पण, यावर्षी तुरळक पावसाने हजेरी लावली. परिसरातील नदी आणि नाल्यांना पावसाळा संपल्यात जमा असला, तरी एकही पूर आला नाही. त्यामुळे गतवर्षी साकारलेली शेततळी पावसाच्या पाण्याने भरली नाही. त्यामुळे शेततळ्यात पाण्याचा ठणठणाट आहे. बाळापूर तालुक्यात कृषी विभागाच्या पुढाकाराने गतवर्षी १७0 शेततळी साकारली. सात प्रकारच्या वेगवेगळ्या आकाराची शेततळी शेतात निर्माण केली आहेत. गतवर्षी शेततळी पावसाच्या पाण्याने तुडुंब भरली होती. यावर्षी मात्र शेततळ्यात पाण्याचा पत्ताच नाही. यावर्षी उडीद व मुगाच्या पिकाचे उत्पादन घटल्याने, रब्बीचे क्षेत्र वाढणार आहे. रब्बी पिकाला पाण्याची गरज असल्यास शेतकरी शेततळ्यातील पाणी पिकाला देतात. मात्र यावर्षी शेततळ्यात पाणीच नसल्याने रब्बीच्या पिकाला पाण्याची गरज लागल्यास पाणी कोठून द्यावे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. 

४५ शेततळ्यांचे अनुदान कधी?बाळापूर कृषी विभागाच्या पुढाकाराने साकारलेल्या १७0 शेततळ्यांपैकी ४५ शेततळ्यांचे अनुदान शेतकर्‍यांना मिळाले नाही. शेततळय़ांचे २१ ते २२ लाख रुपये थकीत असून, सहा महिने झाले, तरी शेतकर्‍यांना पैसे मिळाले नाहीत. थकीत अनुदानासाठी पाठपुरावा सुरू आहे. आता दिवाळीपूर्वी तरी शेततळ्याचे अनुदान मिळते का, याकडे शेतकर्‍यांचे लक्ष लागले आहे.

बाळापूर तालुक्यातील ४५ शेततळय़ांच्या थकीत अनुदानासाठी पाठपुरावा सुरू आहे. अनुदान प्राप्त होताच शेतकर्‍यांना तत्काळ वितरित करण्यात येईल. यावर्षी पाऊस कमी प्रमाणात असल्याने शेततळ्यात पाणी साचले नाही.- गावित, कृषी सहायक, हातरुण.-