शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

विदर्भात रब्बी पिके, फळांच्या गुणात्मक दर्जावर परिणामाची शक्यता!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2017 23:51 IST

अकोला: ढगाळ वातावरण असताना थंडी, विदर्भात असे मागील तीन आठवड्यापासून विचित्र वातावरण तयार झाले असून, याचा रब्बी पिके तसेच फळाच्या अंगीकृत गुणात्मक दर्जावर परिणाम होण्याची शक्यता कृषी शास्त्रज्ञ वतरुळात वर्तविली जात आहे.

ठळक मुद्देढगाळ वातावरण, पण थंडी जोरातयावर्षी विचित्र वातावरण

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: ढगाळ वातावरण असताना थंडी, विदर्भात असे मागील तीन आठवड्यापासून विचित्र वातावरण तयार झाले असून, याचा रब्बी पिके तसेच फळाच्या अंगीकृत गुणात्मक दर्जावर परिणाम होण्याची शक्यता कृषी शास्त्रज्ञ वतरुळात वर्तविली जात आहे. यावर्षी पाऊस कमी झाल्याने खरिपाची पिके हातची गेली,रब्बीतील पिके साथ देतील, अशी अपेक्षा असताना, विदर्भात विचित्र वातावरणाचा सामना शेतकर्‍यांना करावा लागत आहे. एक तर ओलावा नसल्याने पश्‍चिम विदर्भातील पाच जिल्हय़ात ६५ ते ७0 टक्के क्षेत्रावरच रब्बीची पेरणी झाली. यात सर्वाधिक हरभरा शेतकर्‍यांनी पेरला; पण मागील तीन आठवड्यांपासून या भागात ढगाळ वातावरण आहे. असे असताना थंडीपण आहे. ढगाळ वातावरण असले तर थंडी नसते, असे आजपर्यंतचा अनुभव आहे; परंतु यावर्षी हे वेगळेच वातावरण असल्याचे कृषी शास्त्रज्ञांना वाटते. हिवाळा ऋतूच्या काळात पिके, फळझाडांना दिवसा स्पष्ट सूर्यप्रकाश आणि रात्रीची थंडी असे नैसर्गिक वातावरण हवे असते. तथापि, यावर्षी या वातावरणात विचित्र बदल झालेले दिसतात. त्याचा परिणाम पिकांवर होण्याची शक्यता असून, किडींचा प्रादुर्भाव तसेच मूलभूत गुणांवर परिणाम होण्याची शक्यता आहे. या वातावरणामुळे चांगला प्रकाश मिळत नसल्याने पिके, फळांची अन्नद्रव्य शोषणाची प्रक्रिया कमी होते. फळे लवकर परिपक्व होतात; पण त्याचा आकार लहान होतो; तसेच दर्जा घसरतो.आंबा मोहोरावर माव्याच्या प्रादुर्भावाची शक्यता वाढते. पेरू  व इतर सर्वच फळे अकाली परिपक्क होतात. हरभरा घाट्यांवर, गहू पिकांच्या ओंब्यावर प्रतिकूल परिणाम होतो. हरभर्‍यावर घाटेअळीचा प्रादुर्भाव होतो. ज्या ठिकाणी या पिकाला पाणी दिले असेल तेथे विशेष काळजी घेण्याची गरज असते.

वातावरणाचा नवीन प्रकार!यावर्षी ढगाळ वातावरण असताना प्रचंड थंडी हा नवीनच प्रकार अनुभवायला येत असल्याचे कृषी शास्त्रज्ञांचे म्हणने आहे. त्यामुळे या वातावरणाचे काय परिणाम होतील, हे आता सांगता येत नसले, तरी त्याचे पुढे काय परिणाम होतील, यावर कृषी शास्त्रज्ञांची नजर आहे.

ढगाळ वातावरणात थंडी, असे नवीनच वातावरण यावर्षी असून, शेतकर्‍यांनी वेळोवेळी रब्बी पिकांचे, फळझाडांचे सर्वेक्षण करणे गरजेचे आहे. शेतकर्‍यांची पिकांची काळजी घेण्यासाठी हरभरा फुलावर,घाट्यावर आला असेल तर दोन टक्के युरियाची फवारणी करावी.- डॉ. मोहनराव खाकरे,ज्येष्ठ कृषी विद्यावेत्ता, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ,अकोला.

टॅग्स :agricultureशेती