शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

विदर्भात रब्बी पिके, फळांच्या गुणात्मक दर्जावर परिणामाची शक्यता!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2017 23:51 IST

अकोला: ढगाळ वातावरण असताना थंडी, विदर्भात असे मागील तीन आठवड्यापासून विचित्र वातावरण तयार झाले असून, याचा रब्बी पिके तसेच फळाच्या अंगीकृत गुणात्मक दर्जावर परिणाम होण्याची शक्यता कृषी शास्त्रज्ञ वतरुळात वर्तविली जात आहे.

ठळक मुद्देढगाळ वातावरण, पण थंडी जोरातयावर्षी विचित्र वातावरण

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: ढगाळ वातावरण असताना थंडी, विदर्भात असे मागील तीन आठवड्यापासून विचित्र वातावरण तयार झाले असून, याचा रब्बी पिके तसेच फळाच्या अंगीकृत गुणात्मक दर्जावर परिणाम होण्याची शक्यता कृषी शास्त्रज्ञ वतरुळात वर्तविली जात आहे. यावर्षी पाऊस कमी झाल्याने खरिपाची पिके हातची गेली,रब्बीतील पिके साथ देतील, अशी अपेक्षा असताना, विदर्भात विचित्र वातावरणाचा सामना शेतकर्‍यांना करावा लागत आहे. एक तर ओलावा नसल्याने पश्‍चिम विदर्भातील पाच जिल्हय़ात ६५ ते ७0 टक्के क्षेत्रावरच रब्बीची पेरणी झाली. यात सर्वाधिक हरभरा शेतकर्‍यांनी पेरला; पण मागील तीन आठवड्यांपासून या भागात ढगाळ वातावरण आहे. असे असताना थंडीपण आहे. ढगाळ वातावरण असले तर थंडी नसते, असे आजपर्यंतचा अनुभव आहे; परंतु यावर्षी हे वेगळेच वातावरण असल्याचे कृषी शास्त्रज्ञांना वाटते. हिवाळा ऋतूच्या काळात पिके, फळझाडांना दिवसा स्पष्ट सूर्यप्रकाश आणि रात्रीची थंडी असे नैसर्गिक वातावरण हवे असते. तथापि, यावर्षी या वातावरणात विचित्र बदल झालेले दिसतात. त्याचा परिणाम पिकांवर होण्याची शक्यता असून, किडींचा प्रादुर्भाव तसेच मूलभूत गुणांवर परिणाम होण्याची शक्यता आहे. या वातावरणामुळे चांगला प्रकाश मिळत नसल्याने पिके, फळांची अन्नद्रव्य शोषणाची प्रक्रिया कमी होते. फळे लवकर परिपक्व होतात; पण त्याचा आकार लहान होतो; तसेच दर्जा घसरतो.आंबा मोहोरावर माव्याच्या प्रादुर्भावाची शक्यता वाढते. पेरू  व इतर सर्वच फळे अकाली परिपक्क होतात. हरभरा घाट्यांवर, गहू पिकांच्या ओंब्यावर प्रतिकूल परिणाम होतो. हरभर्‍यावर घाटेअळीचा प्रादुर्भाव होतो. ज्या ठिकाणी या पिकाला पाणी दिले असेल तेथे विशेष काळजी घेण्याची गरज असते.

वातावरणाचा नवीन प्रकार!यावर्षी ढगाळ वातावरण असताना प्रचंड थंडी हा नवीनच प्रकार अनुभवायला येत असल्याचे कृषी शास्त्रज्ञांचे म्हणने आहे. त्यामुळे या वातावरणाचे काय परिणाम होतील, हे आता सांगता येत नसले, तरी त्याचे पुढे काय परिणाम होतील, यावर कृषी शास्त्रज्ञांची नजर आहे.

ढगाळ वातावरणात थंडी, असे नवीनच वातावरण यावर्षी असून, शेतकर्‍यांनी वेळोवेळी रब्बी पिकांचे, फळझाडांचे सर्वेक्षण करणे गरजेचे आहे. शेतकर्‍यांची पिकांची काळजी घेण्यासाठी हरभरा फुलावर,घाट्यावर आला असेल तर दोन टक्के युरियाची फवारणी करावी.- डॉ. मोहनराव खाकरे,ज्येष्ठ कृषी विद्यावेत्ता, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ,अकोला.

टॅग्स :agricultureशेती