शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
3
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
4
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
5
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
6
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
7
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
8
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
9
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
10
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
11
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
12
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
13
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
14
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
15
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
16
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
17
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
18
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
19
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
20
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात रब्बीची पेरणी १७ टक्क्यांवर!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2018 15:04 IST

पावसाच्या अनिश्चिततेचा परिणाम यावर्षीच्या खरीपासह रब्बी हंगामावर झाला असून, पेरण्याची गती खुंटली आहे. आजमितीस राज्यात रब्बीतील विविध पिकांची केवळ १७ टक्क्यांवर पेरणी झाली आहे. 

अकोला :  पावसाच्या अनिश्चिततेचा परिणाम यावर्षीच्या खरीपासह रब्बी हंगामावर झाला असून, पेरण्याची गती खुंटली आहे. आजमितीस राज्यात रब्बीतील विविध पिकांची केवळ १७ टक्क्यांवर पेरणी झाली आहे. 

राज्यात रबी पिकांचे सरासरी क्षेत्र ५६.९३ लाख हेक्टर आहे. २ नोव्हेंबरपर्यंत यातील ७.५९ हजार म्हणजेच १३ टक्के पेरणी झाली होती. तीन दिवसात ४ ते ५ टक्केच यात वाढ झाली आहे. ३१ ऑक्टोबरपर्यंत राज्यात ८८१.७ मि.मी. म्हणजेच ७३.६ टक्के पाऊस झाला. ३१ ऑक्टोबर अखेर राज्यातील एकूण ३५५ तालुक्यांपैकी एका तालुक्यात ० ते २५ टक्के, ४० तालुक्यांत २५ ते ५० टक्के, १५७ तालुक्यांत ५० ते ७५ टक्के,११३ तालुक्यात ७५ ते १०० टक्के तर ४४ तालुक्यात १०० टक्केपेक्षा जास्त पाऊस झाला. जिल्हानिहाय आकडेवारी बघितल्यास सोलापूर ,बीड देन जिल्ह्यांत २५ ते ५० टक्के एवढाचा पाऊस पडला. 

नाशिक, धुळे, नंदूरबार, जळगाव, अहमदनगर, कोल्हापूर, औरंगाबाद, जालना, लातूर, उस्मानाबाद, परभणी, बुलडाणा, अमरावती, यवतमाळ, भंडारा आणि चंद्रपूर या १६ जिल्ह्यात ५० ते ७५ टक्के पाऊस झाला तर ठाणे, रायगड,रत्नागीरी,सिंधुदूर्ग, पालघर, पुणे, सातारा, सांगली,नांदेड, हिंगोली,अकोला,वाशिम,वर्धा,नागपूर,गोंदिया आणि गडचिरोली १६ जिल्ह्यात ७५ ते १०० टक्के पावसाची नोंद झालेली आहे. 

सप्टेंबर महिन्यात पावसाने दडी मारली, परतीचा पाऊसही आला नसल्याने रब्बी पिकांच्या पेरणीसाठी लागणारा जमिनीत ओलावाच नसल्याने रब्बी पेरणीवर परिणाम होताना दिसत आहे. २ नोव्हेंबर राज्यात ७ लाख ५९ हजार ४७७ हेक्टरवर विविध पिकांची पेरणी झाली आहे. यात एकूण रब्बी कडधान्ये ७ लाख ५३ हजार ३१७ हेक्टर तर तेलबियाचे क्षेत्र ६, १६० हेक्टर आहे. 

टॅग्स :Akolaअकोलाagricultureशेती