शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
9
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
10
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
11
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
12
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
13
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
14
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
15
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
16
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
17
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
18
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
19
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
20
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  

राज्यात रब्बीची पेरणी १७ टक्क्यांवर!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2018 15:04 IST

पावसाच्या अनिश्चिततेचा परिणाम यावर्षीच्या खरीपासह रब्बी हंगामावर झाला असून, पेरण्याची गती खुंटली आहे. आजमितीस राज्यात रब्बीतील विविध पिकांची केवळ १७ टक्क्यांवर पेरणी झाली आहे. 

अकोला :  पावसाच्या अनिश्चिततेचा परिणाम यावर्षीच्या खरीपासह रब्बी हंगामावर झाला असून, पेरण्याची गती खुंटली आहे. आजमितीस राज्यात रब्बीतील विविध पिकांची केवळ १७ टक्क्यांवर पेरणी झाली आहे. 

राज्यात रबी पिकांचे सरासरी क्षेत्र ५६.९३ लाख हेक्टर आहे. २ नोव्हेंबरपर्यंत यातील ७.५९ हजार म्हणजेच १३ टक्के पेरणी झाली होती. तीन दिवसात ४ ते ५ टक्केच यात वाढ झाली आहे. ३१ ऑक्टोबरपर्यंत राज्यात ८८१.७ मि.मी. म्हणजेच ७३.६ टक्के पाऊस झाला. ३१ ऑक्टोबर अखेर राज्यातील एकूण ३५५ तालुक्यांपैकी एका तालुक्यात ० ते २५ टक्के, ४० तालुक्यांत २५ ते ५० टक्के, १५७ तालुक्यांत ५० ते ७५ टक्के,११३ तालुक्यात ७५ ते १०० टक्के तर ४४ तालुक्यात १०० टक्केपेक्षा जास्त पाऊस झाला. जिल्हानिहाय आकडेवारी बघितल्यास सोलापूर ,बीड देन जिल्ह्यांत २५ ते ५० टक्के एवढाचा पाऊस पडला. 

नाशिक, धुळे, नंदूरबार, जळगाव, अहमदनगर, कोल्हापूर, औरंगाबाद, जालना, लातूर, उस्मानाबाद, परभणी, बुलडाणा, अमरावती, यवतमाळ, भंडारा आणि चंद्रपूर या १६ जिल्ह्यात ५० ते ७५ टक्के पाऊस झाला तर ठाणे, रायगड,रत्नागीरी,सिंधुदूर्ग, पालघर, पुणे, सातारा, सांगली,नांदेड, हिंगोली,अकोला,वाशिम,वर्धा,नागपूर,गोंदिया आणि गडचिरोली १६ जिल्ह्यात ७५ ते १०० टक्के पावसाची नोंद झालेली आहे. 

सप्टेंबर महिन्यात पावसाने दडी मारली, परतीचा पाऊसही आला नसल्याने रब्बी पिकांच्या पेरणीसाठी लागणारा जमिनीत ओलावाच नसल्याने रब्बी पेरणीवर परिणाम होताना दिसत आहे. २ नोव्हेंबर राज्यात ७ लाख ५९ हजार ४७७ हेक्टरवर विविध पिकांची पेरणी झाली आहे. यात एकूण रब्बी कडधान्ये ७ लाख ५३ हजार ३१७ हेक्टर तर तेलबियाचे क्षेत्र ६, १६० हेक्टर आहे. 

टॅग्स :Akolaअकोलाagricultureशेती