शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: SC
2
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
3
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
4
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
7
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
8
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
9
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
10
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
11
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
12
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
13
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
14
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
15
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
17
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
18
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
19
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
20
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?

पाचशे रुपयांसाठी महिलांच्या ‘सीएससी’मध्ये रांगा;

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2020 17:04 IST

‘सोशल डिस्टन्सिंग’कडे फारसे लक्ष दिले जात नसल्याने कोरोना पसरण्याची भीतीही व्यक्त होत आहे.

अकोला : जन-धन खात्यात पंतप्रधान गरीब कल्याण योजनेतून १ लाख ७० हजार महिलांच्या खात्यात प्रत्येकी ५०० रुपये जमा झाल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. ती रक्कम बँकेतून किंवा (सीएससी) ग्राहक सेवा केंद्रातून काढण्यासाठी ग्रामीण भागातील महिलांच्या सकाळपासूनच रांगा लागत असल्याचे चित्र बँक, ‘सीएससी’समोर दैनंदिन पाहावयास मिळत आहे. विशेष म्हणजे, त्या ठिकाणी ‘सोशल डिस्टन्सिंग’कडे फारसे लक्ष दिले जात नसल्याने कोरोना पसरण्याची भीतीही व्यक्त होत आहे.कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी देशभरात ‘लॉकडाऊन’ करण्यात आले. त्यामुळे देशातील कोट्यवधी मजुरांच्या उदरनिर्वाहाची समस्या निर्माण झाली. त्यावर उपाय म्हणून केंद्र शासनाने पंतप्रधान गरीब कल्याण योजनेतून महिलांना ५०० रुपये सानुग्रह अनुदान देण्याचा उपक्रम सुरू केला. योजनेतून जन-धन बचत खाते असलेल्या महिलांच्या बचत खात्यात एप्रिल, मे, जून या तीन महिन्यांत दरमहा ५०० रुपये जमा केले जाणार आहेत. जिल्ह्यात महिलांची जन-धन योजनेची एकूण २ लाख ३५ हजार खाती आहेत. त्यापैकी १ लाख ७० हजार महिलांच्या खात्यात पहिल्या टप्प्यात ५०० रुपये जमा झाले आहेत. ही रक्कम काढण्यासाठी संबंधित खातेधारकांना थेट बँक किंवा ग्राहक सेवा केंद्रात धाव घ्यावी लागते. त्यातच बँकेतून ही रक्कम मिळते की नाही, याबाबत संभ्रमावस्था आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात महिला बँक सेवा देणाऱ्या ग्राहक सेवा केंद्रातूनच रक्कम काढण्यासाठी गर्दी करीत आहेत. त्यातच आता जिल्हाधिकाऱ्यांनी सर्वच व्यवहारांची वेळ सकाळी ८ ते १२ वाजतापर्यंत केली आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील महिलांना सकाळीच घरातून निघावे लागते. काही महिला तर पायी चालत येऊन रांगेत उभ्या राहत असल्याचे चित्रही डाबकी रोडवरील ग्राहक सेवा केंद्रासमोर पाहायला मिळते.या महिलांना रक्कम काढण्यासाठी थेट बँक किंवा सीएससी केंद्रातच यावे लागते. त्यांना ‘एटीएम’ची सुविधा नाही. बँकेतून चिठ्ठीद्वारे रक्कम देताना किमान रक्कम जमा ठेवण्याची अट टाकली जाते. त्यामुळे या कटकटीत न पडता सर्वच रक्कम ‘सीएससी’मधून एकाच वेळी काढण्याचा पर्याय महिलांकडून वापरला जात आहे. परिणामी, त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी पाहावयास मिळत आहे.

टॅग्स :Akolaअकोलाbankबँक