शहरं
Join us  
Trending Stories
1
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
2
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
3
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
4
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
5
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
6
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
7
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
8
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
9
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
10
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
11
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
12
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
13
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
14
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
15
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
16
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
17
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
18
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
19
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
20
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा

गुणवत्तेचा दर्जा टिकवा भाव मिळेलच - धनंजय दातार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2019 13:15 IST

योग्य बाजारपेठ आणि संवाद कौशल्य असेल तर कुणासाठीही अशक्य नाही, असे मत सुप्रसिद्ध मसालाकिंग धनंजय दातार यांनी व्यक्त केले.

ठळक मुद्दे अकोल्यातील मराठा मंडळ सभागृहात दुसरे अखिल भारतीय वºहाडी साहित्य संमेलन पार पडले. सिनेअभिनेता भरत गणेशपुरे यांनी प्रसिद्ध उद्योजक मसालाकिंग धनंजय दातार यांची प्रकट मुलाखत घेतली.दातार यांनी उद्योगाची अनेक दालने नवयुवकांसाठी खुले असून, त्याचा लाभ घेण्याचे आवाहन केले.

अकोला: उत्पादनाच्या गुणवत्तेचा दर्जा टिकवा, आपल्या ब्रॅण्डची ओळख निर्माण करा, तुम्ही ठरवाल तसे भाव ग्राहक देतील. जी मिरची ८० रुपये किलो विकल्या जाते, तीच मिरची १८० रुपये किलोनेदेखील विकता येते. योग्य बाजारपेठ आणि संवाद कौशल्य असेल तर कुणासाठीही अशक्य नाही, असे मत सुप्रसिद्ध मसालाकिंग धनंजय दातार यांनी व्यक्त केले. रविवारी अकोल्यातील मराठा मंडळ सभागृहात दुसरे अखिल भारतीय वºहाडी साहित्य संमेलन पार पडले. दुपारच्या सत्रात सिनेअभिनेता भरत गणेशपुरे यांनी प्रसिद्ध उद्योजक मसालाकिंग धनंजय दातार यांची प्रकट मुलाखत घेतली. प्रकट मुलाखतीच्या निमित्ताने दातार यांनी उद्योगाची अनेक दालने नवयुवकांसाठी खुले असून, त्याचा लाभ घेण्याचे आवाहन केले.दातार यांचा कारंजा, शेगाव, अमरावती येथील प्रवास, घरची बिकट परिस्थिती आणि त्यातून श्रीमंतीचे आकर्षण त्यांनी सुरुवातीला सांगितले. दहावीत पाच वेळा नापास झालो; मात्र नोटा कमाविण्याची जिद्द कमी होऊ दिली नाही. चिंच, फिनाइल विकण्याच्या सेल्समनशिपपासून कामे केलीत. व्यवसायात तोटा आला, आईचे दागिने विकले. त्यानंतर मसाल्यात कुणी नसल्याचे पाहून हा उद्योग टाकला. प्रचंड संघर्षानंतर आता चार गल्फ कन्ट्रीमध्ये चाळीस कंपन्या कार्यरत आहेत. पैशामुळे माणसाला प्रतिष्ठा मिळते. हे लक्षात आल्यानंतर झपाटल्यासारखा पैसा कमाविला आहे; मात्र त्यात कुठेही शॉर्टकट निवडला नाही. प्रामाणिक प्रयत्न आणि गुणवत्ता टिकविली. त्याच भरवशावर मी पैसा कमाविला. माझ्या उत्पादनाचे भाव मी ठरविले. ते ग्राहकांनी दिले. त्यामुळे ग्राहक माझ्यासाठी देव आहे आणि व्यवसाय माझ्यासाठी धर्म असल्याचेही ते याप्रसंगी बोलले. मागणीनुसार बाजार केला पाहिजे. कोणत्याही व्यवसायाची लाज किंवा न्यूनगंड बाळगू नका, मी मराठी माणूस असून, माझ्या कंपनीचे नाव अल-अदील असून, पीकॉक ही भारतीयांची ओळख जपली आहे. आजही मला कुणी स्पर्धक नाही. मी थांबलो नाही. माझा व्यवसाय अजूनही विस्तारित होत आहे. नवीन शाखा नवे प्रयोग आजही सुरूच आहेत. त्यामुळे जगभरातील १८ श्रीमंत उद्योजकांत आज माझी मोजणी होत असल्याचेही त्यांनी मुलाखतीत प्रश्नास उत्तर देताना सांगितले. प्रतिष्ठा आणि पैसा कमाविल्यानंतर मी दुबईतून ९७ टक्के गुणांनी डॉक्टरेट डिग्री मिळविली आहे. केवळ पैसा कमाविण्यापुरता राहू नका, तो खर्च करून त्याचा आनंदही लुटा, असा संदेशही त्यांनी येथे दिला. भविष्यात राजकाणात येण्यासंदर्भात विचारणा केली असता, त्यांनी या विषयाला बगल दिली. सोबतच भारतात भरमसाट टॅक्स भरून व्यवसाय करण्यात रस नसल्याचे त्यांनी सांगितले. मराठी आणि वºहाडी माणसांना मोठ्या प्रमाणात मी नोकऱ्या दिल्या आहेत. भविष्यातही त्यांना मदत करीत राहील, असेही ते याप्रसंगी बोलले. 

 

टॅग्स :Akolaअकोलाinterviewमुलाखत