शहरं
Join us  
Trending Stories
1
Aadhaar New Rules : आधार फेस ऑथेंटिकेशन म्हणजे काय? केंद्र सरकार नवीन नियम लागू करणार
2
पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दोन वेळा 'अनसोल्ड' राहिल्यावर शेवटी जुन्या मालकानेच दाखवला भरवसा
3
"पंतप्रधान मोदींना दोन गोष्टींचा अत्यंत तिरस्कार, एक गांधींचे विचार अन् दुसरे...!"; राहुल गांधींचा हल्लाबोल
4
मुंबईकर सरफराज खानला मोठा दिलासा! IPL च्या आगामी हंगामात पगारवाढीसह चेन्नईकडून उतरणार मैदानात
5
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
6
IPL Auction 2026 : काव्या मारन vs आकाश अंबानी यांच्यात जुगलबंदी; त्यात अनकॅप्ड खेळाडू झाला 'करोडपती'
7
धक्कादायक! विमानतळावर भुताटकी, प्रवाशांना त्रास देते एक रहस्यमय सावली, प्रवाशांचा दावा
8
IPL 2026 Auction: 'त्या' खेळाडूविषयी मनात आदरच..; आकाश अंबानींनी सांगितली पडद्यामागची गोष्ट
9
विरार हत्याकांड प्रकरण: कुख्यात गुंड सुभाषसिंह ठाकूर याला ७ दिवसांची पोलीस कोठडी
10
Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
11
पीएम मोदींना दोन गोष्टींची खूप चीड; 'जी राम जी' विधेयकावरुन राहुल गांधींची टीका
12
कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली
13
VIDEO: पाहावं ते नवलंच... मुलीने चक्क केली ख्रिसमस ट्री हेअरस्टाईल, नेटकऱ्यांना हसू आवरेना
14
बेस प्राईस अवघी ३० लाख, पण लिलावात या ५ खेळाडूंवर पडला पैशांचा पाऊस, बनले करोडपती
15
गीझर-हीटरमुळे तुमचे वीज बिल जास्त येतंय? या स्मार्ट टिप्स वापरून पैसे वाचवा
16
IPL 2026: ऑक्शनमध्ये चेन्नईचा मोठा डाव! १४ कोटी खर्च केले, पण परफेक्ट खेळाडू निवडला, धोनीची जागा घेणार?
17
BJP Assets: 2014 पूर्वी भाजपाच्या तिजोरीत किती पैसा होता? 11 वर्षांत किती वाढला? जाणून थक्क व्हाल!
18
आत्मनिर्भर भारताच्या दिशेने मोठे पाऊल, भारतातील पहिला स्वदेशी 64- बिट मायक्रोप्रोसेसर Dhruv64 लाँच
19
तब्बल ८ कोटी २० लाखांची बोली, दिल्ली कॅपिटल्सने संघात घेतलेला अकीब नबी दार कोण?
20
बाँडी बिचवर हल्ला करणाऱ्या साजिदचं भारताशी कनेक्शन समोर, २७ वर्षांपूर्वी सोडलं होतं हैदराबाद
Daily Top 2Weekly Top 5

‘पीडब्ल्यूडी’ने ९०० काेटींच्या प्रस्तावात काढली त्रुटी; भूमिगत गटार याेजनेला ग्रहण, मनपाच्या अडचणीत भर

By आशीष गावंडे | Updated: June 14, 2024 21:28 IST

‘अमृत अभियान’च्या पहिल्या टप्प्यात सन २०१७ मध्ये भूमिगत गटार याेजना निकाली काढण्यासाठी केंद्र व राज्य शासनामार्फत महापालिकेला ८७ काेटी रुपयांचा निधी प्राप्त झाला हाेता.

आशिष गावंडे

अकाेला: भूमिगत गटार याेजने अंतर्गत शहरातील रस्त्यांची ताेडफाेड केली जाणार असल्याने महापालिका प्रशासनाने सार्वजनिक बांधकाम विभागाकडे रस्ते दुरुस्तीसाठी तब्बल ९०० काेटी रुपयांचा प्रस्ताव सादर केला हाेता. ‘पीडब्ल्यूडी’ने या प्रस्तावात त्रुटी काढल्याची माहिती असून हा प्रस्ताव पुन्हा एकदा मनपा प्रशासनाकडे टाेलवला आहे. एकूणच चित्र पाहता,भूमिगत गटार याेजनेला ग्रहण लागण्याची चिन्हं असून मनपाच्या अडचणीत भर पडल्याचे दिसून येत आहे. 

‘अमृत अभियान’च्या पहिल्या टप्प्यात सन २०१७ मध्ये भूमिगत गटार याेजना निकाली काढण्यासाठी केंद्र व राज्य शासनामार्फत महापालिकेला ८७ काेटी रुपयांचा निधी प्राप्त झाला हाेता. या कामासाठी मनपा प्रशासनाने इगल इन्फ्रा नामक कंपनीची नियुक्ती केली हाेती. याेजनेच्या पहिल्या टप्प्यात माेर्णा नदीपात्रात चेंबर बांधणे व चेंबरमध्ये नदीतील सांडपाणी एकत्र करुन नदीपात्रात अंथरलेल्या मलजल वाहिनीद्वारे शिलाेडा येथील ३० एमएलडी प्लान्टपर्यंत पाेहाेचविणे व त्याठिकाणी मलशुध्दीकरण केंद्राची बांधणी करण्याचा समावेश हाेता. याव्यतिरिक्त डाॅ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या जागेत ७ एमएलडी प्लान्टची उभारणी करण्यात आली. दरम्यान, ‘अमृत अभियान’च्या दुसऱ्या टप्प्यात जागाेजागी चेंबरची उभारणी करावी लागणार असल्याने शहरातील मुख्य रस्त्यांसह प्रभागांमधील अंतर्गत रस्त्यांची ताेडफाेड केली जाइल. या रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी महापालिकेच्या बांधकाम विभागाने सुमारे ९०० काेटी रुपयांचा प्रस्ताव तयार करुन तांत्रिक मंजूरीसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे सादर केला हाेता. या प्रस्तावात संबंधित विभागाने त्रुटी काढत हा प्रस्ताव मनपाकडे परत पाठवल्याची माहिती आहे.

...तरीही त्रुटी कशी?

‘अमृत अभियान’च्या दुसऱ्या टप्प्यात हद्दवाढ भागाचाही समावेश करण्यात आला आहे. याेजनेला प्रत्यक्षात सुरुवात केल्यानंतर शहरात सुमारे ९०० किमी अंतर रस्त्यांची ताेडफाेड केली जाइल. सार्वजनिक बांंधकाम विभागाच्या निकषानुसारच मनपा प्रशासनाने रस्ते दुरुस्तीचा प्रस्ताव तयार केला हाेता. ‘पीडब्ल्यूडी’च्या सूचनेनुसार प्रस्ताव तयार केल्यानंतरही त्यात त्रुटी काढली गेल्याने मनपातील बांधकाम विभाग व तांत्रिक सल्लागार असलेल्या पुराणिक ब्रदर्सच्या कामकाजावर प्रश्नचिन्हं निर्माण झाले आहेत. 

...अन् प्रक्रिया केलेले पाणी नदीत

सन २०२० पासून शिलाेडा येथे उभारण्यात आलेल्या ३० एमएलडी क्षमतेच्या सीवरेज ट्रीटमेंट प्लान्ट (मलजलशुध्दीकरण केंद्र)मध्ये सांडपाण्यावर प्रक्रिया केली जात आहे. शुध्दीकरण केलेले पाणी शेती किंवा उद्याेगासाठी वापरणे अपेक्षित असताना सदर पाणी थेट माेर्णा नदीपात्रात साेडले जात आहे,हे विशेष.

मनपाने प्रस्ताव टाेलवला ‘पीएमसी’कडे

सार्वजनिक बांधकाम विभागाने त्रुटी काढलेला प्रस्ताव मनपाच्या बांधकाम विभागाने तांत्रिक सल्लागार असलेल्या पुराणिक ब्रदर्सकडे टाेलवल्याची माहिती आहे. हा प्रकार पाहता, भूमिगत गटार याेजना निकाली काढण्यासाठी महापालिका प्रशासन खरच गंभीर आहे का, असा सवाल उपस्थित हाेत आहे.