शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

भूमिहीन लाभार्थींसाठी २८ एकर जमीन खरेदी !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2021 04:14 IST

शासनामार्फत राबविण्यात येत असलेल्या कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजनेंतर्गत अनुसूचित जातीमधील भूमिहीन व दारिद्र्यरेषेखालील लाभार्थींना प्रत्येकी ...

शासनामार्फत राबविण्यात येत असलेल्या कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजनेंतर्गत अनुसूचित जातीमधील भूमिहीन व दारिद्र्यरेषेखालील लाभार्थींना प्रत्येकी चार एकर कोरडवाहू शेती किंवा दोन एकर बागायती शेतीचा लाभ देण्यात येतो. त्यासाठी सामाजिक न्याय विभागामार्फत शासकीय दराने शेतजमीन खरेदी करण्यात येते. त्यानुषंगाने २०२०-२१ या आर्थिक वर्षात शासनाकडून उपलब्ध १ कोटी २ लाख ५० हजार रुपयांच्या निधीतून सामाजिक न्याय विभागाच्या सहायक आयुक्त कार्यालयामार्फत २८ एकर १८ गुंठे शेतजमीन शासकीय दराने खरेदी करण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली असून, खरेदी करण्यात आलेली जमीन शंभर टक्के अनुदानावर वाटप करण्यासाठी लवकरच जिल्हास्तरीय समितीमार्फत भूमिहीन लाभार्थींची निवड करण्यात येणार आहे.

सात भूमिहीन लाभार्थींना

मिळणार जमिनीचा लाभ!

कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजनेंतर्गत सामाजिक न्याय विभागाच्या सहायक आयुक्त कार्यालयामार्फत शासकीय दराने २८ एकर शेतजमीन खरेदी करण्यात आली आहे. खरेदी केलेल्या जमिनीतून प्रत्येकी चार एकरप्रमाणे सातभूमिहीन लाभार्थींना जमिनीचा लाभ देण्यात येणार आहे. त्यासाठी जिल्हास्तरीय समितीमार्फत भूमिहीन लाभार्थींची निवड करण्यात येणार आहे.

कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजनेंतर्गत जिल्ह्यातील भूमिहीन लाभार्थींना शंभर टक्के अनुदानावर जमीन वाटप करण्यासाठी २०२०-२१ या आर्थिक वर्षात शासनाकडून प्राप्त १ कोटी २ लाख ५० हजार रुपयांच्या निधीतून २८ एकर शेतजमीन शासकीय दराने खरेदी करण्यात आली आहे. ही जमीन भूमिहीन लाभार्थींना वाटप करण्यात येणार आहे. त्यासाठी जिल्हास्तरीय समितीकडून सात भूमिहीन लाभार्थींची निवड करण्यात येणार आहे.

उमा जोशी

समाजकल्याण निरीक्षक,

सहायक आयुक्त, सामाजिक न्याय विभाग, अकोला.