शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना
2
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
3
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
4
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
5
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
6
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी
7
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
8
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
9
कंटाळा आला म्हणून मुलींनी मागवले ऑनलाइन जेवण; मद्यधुंद आईला राग अनावर, लेकींना बेदम मारहाण
10
३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?
11
१ ऑक्टोबरपासून लागू होणार ट्रेन तिकीट बुकींगचा नवा नियम, झटपट आटोपून घ्या हे काम, अन्यथा...
12
“पूरग्रस्तांचे संसार पुन्हा उभे करण्यासाठी सर्वस्व पणाला लावू”; अजित पवारांचा VCद्वारे संवाद
13
नवरात्रात सोनं खरेदी करणं झालं अवघड! सर्वकालीन उच्चांकी पातळीच्या अगदी जवळ जाऊन पोहोचलं; चेक करा 'लेटेस्ट रेट'
14
जॉन अब्राहमच्या 'फोर्स ३'मध्ये साउथच्या या प्रसिद्ध अभिनेत्रीची झाली एन्ट्री, जाणून घ्या कोण आहे ती?
15
“PM केअर फंडात महाराष्ट्राचाही पैसा, ५० हजार कोटींची मदत जाहीर करावी”; उद्धव ठाकरेंची मागणी
16
“संकट आले तेव्हा आम्ही पंचांग काढून बसलो नाही, सरकारने सरसकट कर्जमाफी द्यावी”: उद्धव ठाकरे
17
दुहेरी हत्येच्या प्रयत्नाने दिल्ली हादरली, पतीने पत्नी आणि मुलावर झाडल्या गोळ्या 
18
'सोनम वांगचुकच्या संपर्कात पाकिस्तानी नागरिक, बांगलादेशातही गेले'; पोलिसांचा धक्कादायक खुलासा
19
संविधान रक्षणासाठी काँग्रेस काढणार दीक्षाभूमी ते सेवाग्राम ‘संविधान सत्याग्रह पदयात्रा’
20
"आम्ही जगायचं की नाही, मुख्यमंत्र्यांनी सांगावं"; लक्ष्मण हाकेंचा संतप्त सवाल, हल्ल्याचा सगळा घटनाक्रम सांगितला

आज शास्तीवर हाेणार निर्णय; अकाेलेकरांना दिलासा मिळेल का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2021 04:24 IST

महापालिकेत भाजपची एकहाती सत्ता असली तरीही सर्वसामान्यांच्या हिताचे मुद्दे रेटून धरण्यात सत्तापक्ष प्रशासनासमाेर कमकुवत ठरत असल्याचे चित्र दिसून येत ...

महापालिकेत भाजपची एकहाती सत्ता असली तरीही सर्वसामान्यांच्या हिताचे मुद्दे रेटून धरण्यात सत्तापक्ष प्रशासनासमाेर कमकुवत ठरत असल्याचे चित्र दिसून येत आहे. काेराेना विषाणूमुळे मागील दीड वर्षापासून अनेक लहानमाेठे उद्याेग व्यवसाय प्रभावित झाले आहेत. त्यांना उभारी देण्यासाठी केंद्र तसेच राज्य शासनाकडून विविध उपाययाेजना करण्यासाेबतच अनुदानही देण्यात आले. काेराेनामुळे किरकाेळ व्यावसायिकांची पुरती वाट लागली आहे. हातावर पाेट असणाऱ्या कुटुंबीयांची परवड अद्यापही सुरूच आहे. अशास्थितीत मनपाकडून अकाेलेकरांना मालमत्ता कराच्या मुद्द्यावर काहीअंशी दिलासा मिळणे अपेक्षित हाेते. मनपाची सत्तासूत्रे साेपविलेल्या भाजपकडूनही ठाेस निर्णय घेतला जाईल, अशी सर्वसामान्यांची भावना हाेती. परंतु, थकीत मालमत्ता कराच्या संदर्भात प्रशासनाने घेतलेली राेखठाेक भूमिका व त्यावर सत्तापक्षाने घेतलेला सावध पवित्रा पाहता अकाेलेकरांचा वाली काेण, असा सवाल यानिमित्ताने उपस्थित केला जात आहे.

या मुद्द्यांवर साधली चुप्पी

‘अमृत’अभियान अंतर्गत कंत्राटदाराने आठवा जलकुंभ उभारण्यास नकार दिला आहे. त्याच्या देयकासाठी दबावतंत्राचा वापर करणाऱ्या सत्ताधाऱ्यांनी चुप्पी साधली आहे. भटक्या श्वानांचे निर्बीजीकरण केले जात असले तरी त्यांच्या वाढलेल्या संख्येमुळे नागरिक त्रस्त आहेत. शहरात डासांची पैदास वाढली असून, धुरळणी, फवारणी हाेत नसल्याने अकाेलेकर विविध साथ राेगांनी त्रस्त आहेत. ठिकठिकाणी कचऱ्याची व सांडपाण्याची समस्या आहे. याबद्दल सत्तापक्ष जाब विचारताना दिसत नाही.

एक वर्षाची हवी मुदतवाढ

काेराेनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता केंद्र व राज्य शासनाकडूनही वर्तविली जात आहे. एकूणच परिस्थिती लक्षात घेता शास्ती अभय याेजनेसाठी एक वर्षाची मुदतवाढ मिळणे अकाेलेकरांना अपेक्षित आहे.