शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

अकोला जिल्ह्यातील पीक नुकसानीचे पंचनामे कासवगतीने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2021 11:04 IST

Agriculture News : सोमवार २ ऑगस्ट पर्यंत केवळ ३७ हजार ३६० हेक्टरवरील पिकांचे नुकसान पूर्ण करण्यात आले.

- संतोष येलकर

अकोला : अतिवृष्टी आणि पुराच्या तडाख्यात जिल्ह्यात शेतजमिनीसह पिकांचे प्रचंड नुकसान झाले असून, शेतकरी संकटात सापडला आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनामार्फत पीक नुकसानीचे पंचनामे सुरु करण्यात आले असले तरी, सोमवार २ ऑगस्ट पर्यंत केवळ ३७ हजार ३६० हेक्टरवरील पिकांचे नुकसान पूर्ण करण्यात आले. त्यामुळे जिल्हयातील पीक नुकसानाचे पंचनामे कासवगतीने सुरु असल्याचे वास्तव समोर येत आहे.

जिल्ह्यात २१ जुलै रोजी रात्रभर पडलेल्या मुसळधार पावसाने नदी व नाल्यांना पूर आला. अतिवृष्टी आणि पुराच्या तडाख्यात जिल्ह्यातील विविध भागात मूग, उडीद, कपाशी, सोयाबीन, तूर, ज्वारी आदी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. पिके पाण्यात बुडाली आणि नदी व नाल्याकाठासह पाटाच्या भागातील शेतजमीन खरडून गेल्याने शेतकरी हवालदिल झाला. त्यानुषंगाने जिल्हा प्रशासन मार्फत तलाठी, ग्रामसेवक व कृषी सहायकांच्या पथकांमार्फत जिल्ह्यात शेती आणि पीक नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम सुरु करण्यात आले. कृषी विभागाच्या प्राथमिक अहवालानुसार अतिवृष्टी आणि पुराच्या तडाख्यात जिल्ह्यात ७५ हजार हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे ; मात्र पूर ओसरल्यानंतर बारा दिवसांचा कालावधी उलटून जात असताना, २ ऑगस्टपर्यंत जिल्ह्यात केवळ ३७ हजार ५९८ शेतकऱ्यांच्या ३७ हजार ३६० हेक्टरवरील पिकांच्या नुकसानाचे पंचनामे करण्याचे काम पूर्ण करण्यात आले आहे. त्यामुळे जिल्ह्यात पीक नुकसानाचे पंचनामे करण्याचे काम कासवगतीने सुरु असल्याचे वास्तव समोर येत असून, उर्वरित क्षेत्रावरील पीक नुकसानाचे पंचनामे पूर्ण होणार तरी केव्हा, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.

 

पीक नुकसानाचे असे आहे वास्तव !

तालुका             शेतकरी क्षेत्र (हेक्टर)

अकोला             ६२१०             ७४५२

बार्शीटाकळी १२६२५            १६३१५

मूर्तिजापूर             ३२४             १६२

अकोट             ५६६७             ४५३४

तेल्हारा             ४६५२             २८१०

बाळापूर             १७८८             १३३६

पातूर             ६३३२             ४७५०

 

जमीन खरडून गेली मोठी ; पंचनामे १००६ हेक्टरवरील !

अतिवृष्टी व पुराच्या तडाख्यात जिल्ह्यात नदी व नाल्याकाठच्या शेतासह पाटाच्या पुरात शेतजमीन मोठ्या प्रमाणात खरडून गेली आहे. परंतु सुरु असलेल्या नुकसानाच्या पंचनाम्यात २ ऑगस्टपर्यंत जिल्ह्यात खरडून गेलेल्या जमिनीपैकी केवळ ३ हजार २९८ शेतकऱ्यांच्या १ हजार ६ हेक्टरवरील खरडून गेलेल्या जमिनीचे पंचनामे पूर्ण करण्यात आले.

 

विमा काढलेल्या एक हजार शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे !

प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत यंदाच्या खरीप हंगामात जिल्ह्यात १ लाख ९० हजार शेतकऱ्यांनी पिकांचा विमा काढला असला तरी, आतापर्यंत केवळ १ हजार ३१ शेतकऱ्यांच्या केवळ ५५५ हेक्टर क्षेत्रावरील पीक नुकसानाचे पंचनामे विमा कंपनीच्या प्रतिनिधींसह संबंधित पथकांमार्फत करण्यात आले.

 

अतिवृष्टी व पुरामुळे जिल्हयातील शेती व पीक नुकसानाचे पंचनामे करण्याचे काम सद्यस्थितीत सुरु आहे. आतापर्यंत जिल्हयातील ३७ हजार ५९८ शेतकऱ्यांच्या ३७ हजार ३६० हेक्टरवरील पीक नुकसानाचे पंचनामे करण्याचे काम पूर्ण करण्यात आले आहे.

- कांतप्पा खाेत, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी.

टॅग्स :Akolaअकोलाagricultureशेती