शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
4
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
5
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
6
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
7
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
8
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
9
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
10
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
11
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
12
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
13
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
14
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
15
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
16
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
17
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
18
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
19
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
20
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास

अकोला जिल्ह्यातील पीक नुकसानीचे पंचनामे कासवगतीने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2021 11:04 IST

Agriculture News : सोमवार २ ऑगस्ट पर्यंत केवळ ३७ हजार ३६० हेक्टरवरील पिकांचे नुकसान पूर्ण करण्यात आले.

- संतोष येलकर

अकोला : अतिवृष्टी आणि पुराच्या तडाख्यात जिल्ह्यात शेतजमिनीसह पिकांचे प्रचंड नुकसान झाले असून, शेतकरी संकटात सापडला आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनामार्फत पीक नुकसानीचे पंचनामे सुरु करण्यात आले असले तरी, सोमवार २ ऑगस्ट पर्यंत केवळ ३७ हजार ३६० हेक्टरवरील पिकांचे नुकसान पूर्ण करण्यात आले. त्यामुळे जिल्हयातील पीक नुकसानाचे पंचनामे कासवगतीने सुरु असल्याचे वास्तव समोर येत आहे.

जिल्ह्यात २१ जुलै रोजी रात्रभर पडलेल्या मुसळधार पावसाने नदी व नाल्यांना पूर आला. अतिवृष्टी आणि पुराच्या तडाख्यात जिल्ह्यातील विविध भागात मूग, उडीद, कपाशी, सोयाबीन, तूर, ज्वारी आदी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. पिके पाण्यात बुडाली आणि नदी व नाल्याकाठासह पाटाच्या भागातील शेतजमीन खरडून गेल्याने शेतकरी हवालदिल झाला. त्यानुषंगाने जिल्हा प्रशासन मार्फत तलाठी, ग्रामसेवक व कृषी सहायकांच्या पथकांमार्फत जिल्ह्यात शेती आणि पीक नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम सुरु करण्यात आले. कृषी विभागाच्या प्राथमिक अहवालानुसार अतिवृष्टी आणि पुराच्या तडाख्यात जिल्ह्यात ७५ हजार हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे ; मात्र पूर ओसरल्यानंतर बारा दिवसांचा कालावधी उलटून जात असताना, २ ऑगस्टपर्यंत जिल्ह्यात केवळ ३७ हजार ५९८ शेतकऱ्यांच्या ३७ हजार ३६० हेक्टरवरील पिकांच्या नुकसानाचे पंचनामे करण्याचे काम पूर्ण करण्यात आले आहे. त्यामुळे जिल्ह्यात पीक नुकसानाचे पंचनामे करण्याचे काम कासवगतीने सुरु असल्याचे वास्तव समोर येत असून, उर्वरित क्षेत्रावरील पीक नुकसानाचे पंचनामे पूर्ण होणार तरी केव्हा, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.

 

पीक नुकसानाचे असे आहे वास्तव !

तालुका             शेतकरी क्षेत्र (हेक्टर)

अकोला             ६२१०             ७४५२

बार्शीटाकळी १२६२५            १६३१५

मूर्तिजापूर             ३२४             १६२

अकोट             ५६६७             ४५३४

तेल्हारा             ४६५२             २८१०

बाळापूर             १७८८             १३३६

पातूर             ६३३२             ४७५०

 

जमीन खरडून गेली मोठी ; पंचनामे १००६ हेक्टरवरील !

अतिवृष्टी व पुराच्या तडाख्यात जिल्ह्यात नदी व नाल्याकाठच्या शेतासह पाटाच्या पुरात शेतजमीन मोठ्या प्रमाणात खरडून गेली आहे. परंतु सुरु असलेल्या नुकसानाच्या पंचनाम्यात २ ऑगस्टपर्यंत जिल्ह्यात खरडून गेलेल्या जमिनीपैकी केवळ ३ हजार २९८ शेतकऱ्यांच्या १ हजार ६ हेक्टरवरील खरडून गेलेल्या जमिनीचे पंचनामे पूर्ण करण्यात आले.

 

विमा काढलेल्या एक हजार शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे !

प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत यंदाच्या खरीप हंगामात जिल्ह्यात १ लाख ९० हजार शेतकऱ्यांनी पिकांचा विमा काढला असला तरी, आतापर्यंत केवळ १ हजार ३१ शेतकऱ्यांच्या केवळ ५५५ हेक्टर क्षेत्रावरील पीक नुकसानाचे पंचनामे विमा कंपनीच्या प्रतिनिधींसह संबंधित पथकांमार्फत करण्यात आले.

 

अतिवृष्टी व पुरामुळे जिल्हयातील शेती व पीक नुकसानाचे पंचनामे करण्याचे काम सद्यस्थितीत सुरु आहे. आतापर्यंत जिल्हयातील ३७ हजार ५९८ शेतकऱ्यांच्या ३७ हजार ३६० हेक्टरवरील पीक नुकसानाचे पंचनामे करण्याचे काम पूर्ण करण्यात आले आहे.

- कांतप्पा खाेत, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी.

टॅग्स :Akolaअकोलाagricultureशेती