शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

वाळू घाटांच्या लिलावासाठी जनसुनावणी प्रलंबित!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2020 13:21 IST

राज्यात रखडलेले वाळू घाटांचे लिलाव होणार तरी केव्हा, यासंदर्भात प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : वाळू घाटांचे लिलाव करण्यासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळामार्फत सुनावणी घेणे बंधनकारक आहे; मात्र राज्यातील एकाही जिल्ह्यात अद्याप जनसुनावणी घेण्यात आली नाही. जनसुनावणीची प्रक्रिया प्रलंबित असल्याने, राज्यात रखडलेले वाळू घाटांचे लिलाव होणार तरी केव्हा, यासंदर्भात प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.राज्यातील वाळू धोरण शासनामार्फत गत ३ सप्टेंबर २०१९ रोजी निश्चित करण्यात आले. त्यानंतर राज्यातील सर्वच जिल्ह्यांत वाळू घाटांचा लिलाव करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली असली तरी, उन्हाळा सुरू होऊन दीड महिन्याचा कालावधी उलटून जात असताना राज्यात वाळू घाटांचा लिलाव करण्याची प्रक्रिया अद्यापही मार्गी लागली नाही. राज्यस्तरीय पर्यावरण मूल्यांकन समितीच्या निर्देशानुसार वाळू घाटांचे लिलाव करण्यापूर्वी प्रत्येक जिल्ह्यात वाळू घाटांच्या लिलावासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळामार्फत जनसुनावणी घेणे आवश्यक आहे; परंतु राज्यातील एकाही जिल्ह्यात वाळू घाटांच्या लिलावासाठी अद्याप जनसुनावणी घेण्यात आली नाही. त्यामुळे राज्यात रखडलेले वाळू घाटांचे लिलाव होणार तरी केव्हा, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

जनसुनावणीची अशी आहे प्रक्रिया!वाळू घाटांचा लिलाव करण्यापूर्वी प्रत्येक जिल्ह्यात महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळामार्फत वाळू घाटांच्या लिलावासंदर्भात जनसुनावणी घेण्यात येते. त्यामध्ये वाळू घाटांमधील वाळूचे उत्खनन, वाहतूक आणि लिलावासंदर्भात संबंधित परिसरातील नागरिकांच्या हरकती व आक्षेपांवर जनसुनावणी घेण्यात येते.

जिल्ह्यातील वाळू घाटांच्या लिलावासाठी जनसुनावणी घेण्याकरिता महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कार्यालयाला पत्राद्वारे कळविले आहे. जनसुनावणी घेण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर वाळू घाटांचा लिलाव करण्यात येणार आहे.-डॉ. अतुल दोड, जिल्हा खनिकर्म अधिकारी, अकोला.

टॅग्स :AkolaअकोलाsandवाळूRevenue Departmentमहसूल विभाग