शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

सोयाबीन, कापसाला सरसकट अनुदान द्या!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2017 02:00 IST

अकोला : सोयाबीन उत्पादक शेतकर्‍यांना सरसकट ५000 प्रतिएकर शासनाने अनुदान द्यावे तसेच कपाशीला १५00 रुपये प्रतिक्विंटल अनुदान द्यावे, अशी मागणी अकोला पूर्वचे आमदार रणधीर सावरकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटून केली. 

ठळक मुद्देखासदार, आमदारांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : सोयाबीन उत्पादक शेतकर्‍यांना सरसकट ५000 प्रतिएकर शासनाने अनुदान द्यावे तसेच कपाशीला १५00 रुपये प्रतिक्विंटल अनुदान द्यावे, अशी मागणी अकोला पूर्वचे आमदार रणधीर सावरकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटून केली.  यावर्षी खरीप हंगामातील पिकांना लहरी पावसामुळे मोठा फटका बसल्याने उत्पादनात फार मोठी घट झाली आहे. विशेषत: सोयाबीन पिकाचे फार मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले आहे, त्यामुळे  शेतकर्‍यांची आर्थिक तूट झाली आहे. तशातच इतर पिकांच्या मशागतीसाठी लागणारा खर्च, धार्मिक सण, उत्सव यासाठी शेतकर्‍यांना कमी भावात सोयाबीन विकावे लागले. त्यामुळे शासकीय खरेदी तसेच मिळणारा बोनस इत्यादी लाभांपासून शेतकरी नाइलाजाने वंचित राहिला आहे. शेतकर्‍यांची नुकसान भरपाई फ्हावी तसेच त्याला आर्थिक संकटातून बाहेर काढावे, याकरिता शेतकर्‍यांच्या पेरेपत्रकानुसार शेतकर्‍यांना ५000 रुपये प्रतिएकर अनुदान देऊन नुकसान भरपाई करावी, अशी सविनय मागणी आ. रणधीर सावरकर यांनी राज्याचे मुख्यमंत्री ना देवेंद्र फडणवीस यांना प्रत्यक्ष भेटून केली . त्याचबरोबर खरिपातील तूर, मूग, कपाशी, हरभरा इत्यादी उत्पादनाला जास्तीत जास्त बोनस देण्याची अभ्यासपूर्ण मागणी मा. मुख्यमंत्री यांना भेटून एका निवेदनाद्वारे केली आहे. याबाबत खा. संजयभाऊ धोत्रे यांचे आ. रणधीर सावरकर यांनी मुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत या विषयाबाबत दूरध्वनीवरून बोलणे करून दिले व मा. मुख्यमंत्री यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.यावर्षी सोयाबीनला केंद्र शासनाचा हमीभाव २८५0 अधिक बोनस २00 रुपये प्रतिक्विंटल असा ३0५0 प्रतिक्विंटल भाव असताना बाजारात प्रत्यक्ष सरासरी २३00 रुपये प्रतिक्विंटलचे भाव आहेत. अशी परिस्थिती लक्षात घेता राज्यात हमीभाव अधिक राज्य शासनाकडून ५00 रुपये प्रतिक्विंटल बोनस द्यावा, जेणेकरून शेतकर्‍यांना बर्‍यापैकी भाव मिळू शकेल. तुरीसाठी किमान ५00 रुपये प्रतिक्विंटल बोनस द्यावा तसेच बरेचदा असेही दिसून येते, की व्यापारी तूर नाफेडकडून खरेदी करतात व तीच तूर परत नाफेडला पुढील हंगामात विकतात, त्यामुळे सरकारची कोंडी होते. यासाठी उपाययोजना करावी.हरभरा पिकाच्या बाबतीत किमान आधारभूत किंमत जी ४000 रुपये प्रतिक्विंटल आहे. यावर्षी रब्बी पिकाचे उत्पादन नक्की किती होईल, याची आकडेवारी उपलब्ध नाही. इतर देशातून ४0 लाख क्विंटल हरभरा आयात होत असून, यापैकी २0 लाख क्विंटल हरभरा बाजारात आला आलेला आहे. उर्वरित जानेवारी-२0१८ च्या आसपास येण्याची शक्यता आहे. तथापि, याचवेळी शेतकर्‍यांचासुद्धा हरभरा बाजारात येतो. परिणामी, पुनश्‍च भाव कोसळून शेतकर्‍यांना आर्थिक फटका बसतो. कपाशी पिकाच्या बाबतीत विचार केल्यास ४0२0 ते ४३२0 प्रतिक्विंटल असा हमीभाव कापसाला आहे. सदर भाव यावर्षीच्या उत्पादन खर्चाच्या तुलनेत कमी आहे. त्यामुळे राज्य सरकारने १५00 रुपये प्रतिक्विंटल किमान बोनस द्यावा.यावर्षी झालेली नापिकी तसेच सण, उत्सव साजरे करताना शेतकर्‍यांना आपला माल कमी भावात विकावा लागला, त्यामुळे राज्याचे शेतकरी आर्थिकदृष्ट्या अडचणीत आहे. ही बाब राज्य शासनाने विचारात घ्यावी, करिता विनंती केली आहे. 

खरिपातील शेतकर्‍यांच्या हातून गेलेल्या पिकांबाबत मुख्यमंत्र्यांशी संपर्क साधला. सोयाबीन पिकाला सरसकट ५000 रुपये प्रतिएकर अनुदान आणि कापसाला १५00 प्रतिक्विंटल बोनस देण्यात यावा, अशी मागणी केली. मुख्यमंत्री यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. - खा. संजय धोत्रे, 

भाजपाप्रणित सरकार शेतकर्‍यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. सोयाबीन उत्पादित शेतकर्‍यांना सरसकट ५000 प्रतिएकर अनुदान द्यावे, याबाबत मी मुख्यमंत्री यांची भेट घेऊन मागणी केली, तसेच मुख्यमंत्री यांनी सकारात्मक विचार होईल, असे आश्‍वासित केले.- आ. रणधीर सावरकर,

टॅग्स :agricultureशेती