शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
2
"हिंदू वेळीच एकवटला नाही तर भारतात गल्लोगल्ली बांगलादेशसारखा..."; धीरेंद्र शास्त्रींचा इशारा
3
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
4
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
5
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! नवीन वर्षात शेअर बाजाराला १५ दिवस सुट्टी; एनएसईकडून कॅलेंडर प्रसिद्ध
6
नाताळाला गालबोट; महाराष्ट्र, केरळसह काही राज्यांत तोडफोड अन् झटापटीच्या घटना...
7
“मी खरा वाघ आहे, त्यांच्यासारखा कागदी नाही”; रावसाहेब दानवेंचे ठाकरे बंधूंना प्रत्युत्तर
8
टीव्ही अभिनेत्याला झालेली खुलेआम मारहाण; म्हणाला, "तो अजूनही मोकाट...", मुंबई आता असुरक्षित?
9
कर्क राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? स्वप्नपूर्ती आणि मानसन्मानाचे वर्ष; पण आरोग्याबाबत राहा सतर्क!
10
शेख हसीना यांना परत बांग्लादेशात न पाठवून भारताने..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य
11
गृहकर्ज घेण्याचा विचार करताय? कोणती बँक देतेय सर्वात स्वस्त होम लोन? पाहा संपूर्ण यादी
12
वैभव सूर्यवंशी पहिल्या सामन्यात बनला 'नंबर १'; रोहित शर्मा, विराट कोहलीला टाकलं मागे
13
एसबीआयमध्ये मॅनेजर असल्याचं सांगून तरुणीला जाळ्यात ओढलं; भेटायला बोलावलं अन् लुटून झाला पसार!
14
Pune Crime: शेजारी राहणाऱ्या तरुणीसोबत प्रेमसंबंध, तिच्यासह नांदेडमधून पळाला; पण पुण्यात झाली हत्या
15
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
16
मिथुन राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? आधी संघर्ष, नंतर मोठे यश; 'जबाबदारी' ठरेल प्रगतीचा मूलमंत्र!
17
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
18
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
19
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
Daily Top 2Weekly Top 5

बेघर व्यक्तींना जीवनावश्यक सुविधा उपलब्ध करून द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 04:56 IST

शहरात उघड्यावर वास्तव्य करणाऱ्या बेघर व्यक्तींसाठी महानगरपालिकेद्वारे निवारा केंद्र उभारण्यात आले आहे. या निवारा केंद्राला बच्चू कडू यांनी ...

शहरात उघड्यावर वास्तव्य करणाऱ्या बेघर व्यक्तींसाठी महानगरपालिकेद्वारे निवारा केंद्र उभारण्यात आले आहे. या निवारा केंद्राला बच्चू कडू यांनी भेट देऊन निवारा केंद्रातील नागरिकांच्या सोयी-सुविधा व समस्या जाणून घेतल्या. या वेळी कडू यांनी प्रशासनास निर्देश दिले की, शहरात विविध ठिकाणी भिक्षा मागून जगणाऱ्या व बेघर व्यक्तींना निवारा उपलब्ध करून द्यावा. तसेच त्यांना निर्वाह भत्ता लागू करावा. केंद्रातील व्यक्तींना त्यांच्या शारीरिक क्षमता व कौशल्यानुसार रोजगार उपलब्ध करून द्यावा. केंद्रातील व्यक्तींना वेळोवेळी वैद्यकीय तपासण्या करून औषधोपचार व मूलभूत गरजा पूर्ण करण्याकरिता प्रशासनाने आवश्यक ती मदत पुरविण्याचे निर्देश त्यांनी या वेळी दिले.

आशाकिरण महिला विकास संस्थेद्वारे निवारा केंद्रातील व्यक्तींकरिता केलेल्या कामाचे कौतुक केले. सोबतच निवारा केंद्रातील व्यक्तींकरिता सहली, मनोरंजनात्मक सांस्कृतिक कार्यक्रम, सण-उत्सव व प्रमुख व्यक्तींचे वाढदिवस येथे साजरा करण्याचेही आवाहन कडू यांनी केले. केंद्रातील व्यक्तींनी भिक्षा न मागता आत्मनिर्भर होण्याचे आवाहन केले. या वेळी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, जिल्हा पोलीस अधीक्षक जी. श्रीधर, मनपा आयुक्त संजय कापडणीस, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजकुमार चव्हाण उपस्थित होते.