शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

बेघर व्यक्तींना जीवनावश्यक सुविधा उपलब्ध करून द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 04:56 IST

शहरात उघड्यावर वास्तव्य करणाऱ्या बेघर व्यक्तींसाठी महानगरपालिकेद्वारे निवारा केंद्र उभारण्यात आले आहे. या निवारा केंद्राला बच्चू कडू यांनी ...

शहरात उघड्यावर वास्तव्य करणाऱ्या बेघर व्यक्तींसाठी महानगरपालिकेद्वारे निवारा केंद्र उभारण्यात आले आहे. या निवारा केंद्राला बच्चू कडू यांनी भेट देऊन निवारा केंद्रातील नागरिकांच्या सोयी-सुविधा व समस्या जाणून घेतल्या. या वेळी कडू यांनी प्रशासनास निर्देश दिले की, शहरात विविध ठिकाणी भिक्षा मागून जगणाऱ्या व बेघर व्यक्तींना निवारा उपलब्ध करून द्यावा. तसेच त्यांना निर्वाह भत्ता लागू करावा. केंद्रातील व्यक्तींना त्यांच्या शारीरिक क्षमता व कौशल्यानुसार रोजगार उपलब्ध करून द्यावा. केंद्रातील व्यक्तींना वेळोवेळी वैद्यकीय तपासण्या करून औषधोपचार व मूलभूत गरजा पूर्ण करण्याकरिता प्रशासनाने आवश्यक ती मदत पुरविण्याचे निर्देश त्यांनी या वेळी दिले.

आशाकिरण महिला विकास संस्थेद्वारे निवारा केंद्रातील व्यक्तींकरिता केलेल्या कामाचे कौतुक केले. सोबतच निवारा केंद्रातील व्यक्तींकरिता सहली, मनोरंजनात्मक सांस्कृतिक कार्यक्रम, सण-उत्सव व प्रमुख व्यक्तींचे वाढदिवस येथे साजरा करण्याचेही आवाहन कडू यांनी केले. केंद्रातील व्यक्तींनी भिक्षा न मागता आत्मनिर्भर होण्याचे आवाहन केले. या वेळी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, जिल्हा पोलीस अधीक्षक जी. श्रीधर, मनपा आयुक्त संजय कापडणीस, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजकुमार चव्हाण उपस्थित होते.