शहरं
Join us  
Trending Stories
1
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
2
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
3
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
4
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
5
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
6
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
7
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
8
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
9
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
10
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
11
आयपीएल २०२५ दरम्यान 'या' स्टार फलंदाजावर ४ सामन्यांची बंदी
12
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
13
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
14
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
15
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
16
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
17
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
18
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
19
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
20
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज

पालखी-कावड महाेत्सवाचा प्रस्ताव द्या; मंगळवारी बैठकीत निर्णय घेणार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2021 04:21 IST

अकोला: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहरातील पालखी व कावड महोत्सव साजरा करण्याच्या धोरणात्मक निर्णयाचा विषय असल्याने, यासंदर्भात शिवभक्त मंडळांच्या प्रतिनिधींची एक ...

अकोला: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहरातील पालखी व कावड महोत्सव साजरा करण्याच्या धोरणात्मक निर्णयाचा विषय असल्याने, यासंदर्भात शिवभक्त मंडळांच्या प्रतिनिधींची एक समिती गठित करून, या समितीने जिल्हा प्रशासनाकडे प्रस्ताव द्यावा. त्यावर मंगळवारी बैठक घेऊन निर्णय घेण्यात येणार असल्याची ग्वाही पालकमंत्री ओमप्रकाश ऊर्फ बच्चू कडू यांनी शिवभक्त मंडळांच्या बैठकीत शनिवारी दिली.

श्रावण महिन्यातील शेवटच्या सोमवारी ६ सप्टेंबर रोजी अकोला शहरात पालखी व कावड महोत्सव साजरा करण्यात येणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पालखी कावड महोत्सव साजरा करण्यासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात आयोजित शहरातील शिवभक्त मंडळ प्रतिनिधींच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी आ. गोपीकिशन बाजोरिया, आ. नितीन देशमुख, आ. अमोल मिटकरी, आ. किरण सरनाइक, जिल्हाधिकारी नीमा अरोरा, जिल्हा पोलीस अधीक्षक जी. श्रीधर, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांच्यासह शहरातील शिवभक्त मंडळांचे प्रतिनिधी उपस्थित होते. कोरोना काळात शहरातील पालखी-कावड महोत्सवाची परंपरा खंडित होऊ नये, यासाठी नियमांचे पालन करून महोत्सव साजरा करण्याचे आवाहन उपस्थित लोकप्रतिनिधींसह अधिकाऱ्यांनी यावेळी केले. तसेच नियमांचे पालन करून कावड व पालखी महोत्सव साजरा करण्याची परवानगी देण्याची मागणी शिवभक्त मंडळांच्या प्रतिनिधींनी यावेळी केली. पालखी-कावड महोत्सव साजरा करण्यासंदर्भात शिवभक्त मंडळांच्या प्रतिनिधींची एक समिती नेमून या समितीने सोमवारपर्यंत जिल्हा प्रशासनाकडे प्रस्ताव द्यावा, त्या प्रस्तावावर मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेऊन जिल्हा प्रशासनामार्फत निर्णय घेण्यात येणार असल्याचे पालकमंत्री बच्चू कडू यांनी सांगितले.

शिवभक्त मंडळांच्या प्रतिनिधींनी अशी केली मागणी!

पालखी-कावड महोत्सवात शहरातील सर्व १६० पालखी आणि कावड काढण्याची परवानगी देण्यात यावी, अशी मागणी नगरसेवक राजेश मिश्रा यांनी या बैठकीत केली. कावड पालखी महोत्सव साजरा करण्याची तयारी शिवभक्त मंडळांकडून सुरू करण्यात आली आहे. नियमांचे पालन करून पालखी कावड काढण्याची परवानगी देण्याची मागणी तरुण बगेरे यांनी केली. तसेच कावड-पालखी श्रद्धेचा विषय असून, नियमांचे पालन करून या महोत्सवाला परवानगी देण्याची मागणी सागर भारुका यांनी केली. शिवभक्तांच्या आस्था व परंपरेचा विचार करून पालखी-कावड महोत्सवासंदर्भात निर्णय घेण्याची मागणी एका शिवभक्ताने केली.