शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

पालखी-कावड महाेत्सवाचा प्रस्ताव द्या; मंगळवारी बैठकीत निर्णय घेणार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2021 04:21 IST

अकोला: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहरातील पालखी व कावड महोत्सव साजरा करण्याच्या धोरणात्मक निर्णयाचा विषय असल्याने, यासंदर्भात शिवभक्त मंडळांच्या प्रतिनिधींची एक ...

अकोला: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहरातील पालखी व कावड महोत्सव साजरा करण्याच्या धोरणात्मक निर्णयाचा विषय असल्याने, यासंदर्भात शिवभक्त मंडळांच्या प्रतिनिधींची एक समिती गठित करून, या समितीने जिल्हा प्रशासनाकडे प्रस्ताव द्यावा. त्यावर मंगळवारी बैठक घेऊन निर्णय घेण्यात येणार असल्याची ग्वाही पालकमंत्री ओमप्रकाश ऊर्फ बच्चू कडू यांनी शिवभक्त मंडळांच्या बैठकीत शनिवारी दिली.

श्रावण महिन्यातील शेवटच्या सोमवारी ६ सप्टेंबर रोजी अकोला शहरात पालखी व कावड महोत्सव साजरा करण्यात येणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पालखी कावड महोत्सव साजरा करण्यासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात आयोजित शहरातील शिवभक्त मंडळ प्रतिनिधींच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी आ. गोपीकिशन बाजोरिया, आ. नितीन देशमुख, आ. अमोल मिटकरी, आ. किरण सरनाइक, जिल्हाधिकारी नीमा अरोरा, जिल्हा पोलीस अधीक्षक जी. श्रीधर, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांच्यासह शहरातील शिवभक्त मंडळांचे प्रतिनिधी उपस्थित होते. कोरोना काळात शहरातील पालखी-कावड महोत्सवाची परंपरा खंडित होऊ नये, यासाठी नियमांचे पालन करून महोत्सव साजरा करण्याचे आवाहन उपस्थित लोकप्रतिनिधींसह अधिकाऱ्यांनी यावेळी केले. तसेच नियमांचे पालन करून कावड व पालखी महोत्सव साजरा करण्याची परवानगी देण्याची मागणी शिवभक्त मंडळांच्या प्रतिनिधींनी यावेळी केली. पालखी-कावड महोत्सव साजरा करण्यासंदर्भात शिवभक्त मंडळांच्या प्रतिनिधींची एक समिती नेमून या समितीने सोमवारपर्यंत जिल्हा प्रशासनाकडे प्रस्ताव द्यावा, त्या प्रस्तावावर मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेऊन जिल्हा प्रशासनामार्फत निर्णय घेण्यात येणार असल्याचे पालकमंत्री बच्चू कडू यांनी सांगितले.

शिवभक्त मंडळांच्या प्रतिनिधींनी अशी केली मागणी!

पालखी-कावड महोत्सवात शहरातील सर्व १६० पालखी आणि कावड काढण्याची परवानगी देण्यात यावी, अशी मागणी नगरसेवक राजेश मिश्रा यांनी या बैठकीत केली. कावड पालखी महोत्सव साजरा करण्याची तयारी शिवभक्त मंडळांकडून सुरू करण्यात आली आहे. नियमांचे पालन करून पालखी कावड काढण्याची परवानगी देण्याची मागणी तरुण बगेरे यांनी केली. तसेच कावड-पालखी श्रद्धेचा विषय असून, नियमांचे पालन करून या महोत्सवाला परवानगी देण्याची मागणी सागर भारुका यांनी केली. शिवभक्तांच्या आस्था व परंपरेचा विचार करून पालखी-कावड महोत्सवासंदर्भात निर्णय घेण्याची मागणी एका शिवभक्ताने केली.