अकोला, दि १९ : वर्हाडातील शापित खारपाणपट्टय़ात प्रथमच सहा बॅरेजेस (सिंचन प्रकल्प) होत आहेत. स्वातंत्र्यानंतर प्रथमच या प्रकल्पाची शृंखला तयार झाली आहे; पण शृंखलेला पूर्ण करणार्या काटीपाटी बॅरेजचे काम रखडले आहे. या आशयाचे वृत्त लोकमतने प्रकाशित करताच पाटबंधारे मंडळाने दखल घेत हा प्रकल्प होण्यासाठीच्या हालचाली सुरू केल्या असून, येत्या पंधरा दिवसात या प्रकल्पाच्या बांधकामासाठीच्या सुधारित प्रशासकीय मान्यतेसाठी जलसंपदा महामंडळाकडे प्रस्ताव पाठविला जाणार आहे.पश्चिम वर्हाडात खारपाणपट्टा आहे. या भागातील भूगर्भात ४0 ते ५0 मीटर खाली खडक नसल्याने धरण होऊ शकत नसल्याचे अभिप्राय जलसंपदा तज्ज्ञांनी यापूर्वी दिल्याने अनेक वर्ष या भागात प्रकल्प झाले नाहीत. या भागातील स्थिती सातत्याने लोकमतने मांडली. जनता व लोकप्रतिनिधींनी पाठपुरावा केला. शेवटी नवीन तंत्रज्ञान वापरू न प्रकल्पांच्या कामांना सुरुवात झाली. त्यामुळे खारपाणपट्टय़ातील बुलडाणा जिल्हय़ात पहिला मेगा जिगाव सिंचन प्रकल्प तयार होत असून, अकोला जिल्हय़ातील नया अंदुरा, नेरधामणा (पूर्णा-२) बॅरेज, मूर्तिजापूूर तालुक्यातील घुंगशी, काटेपूर्णा बॅरेज, उमा बॅरेजची कामे सुरू झाली आहेत. अमरावती जिल्ह्यातही पूर्णा बॅरेजचे काम सुरू आहे. या शृंखलेत काटीपाटीचे बॅरेजचे काम रखडले आहे. आता या बॅरेजचे स्पेशल डिझाईन करण्यात आले आहे. त्यामुळे या बॅरेजची किंमत ३२५ कोटी रुपये वाढली असून, हे बॅरेजच होण्यासाठीच्या हालचाली वाढल्या आहेत.खारपाणपट्टय़ातील शेतकरी आत्महत्याग्रस्त भागातील बॅरेज असल्याने या बॅरेजला मापदंड लावू नये यासाठीची विनंती शासनाकडे करण्यात आली आहे. हे बॅरेज झाल्यास ८.२४ दलघमी जलसाठा संकलित होईल. तसेच १८00 हेक्टर क्षेत्रावर सिंचन होणार असल्याने पाटबंधारे मंडळाच्या अधीक्षक अभियंत्यासह लोकप्रतिधींनीही या बॅरेजसाठी पाठपुरावा सुरू केला आहे.काटीपाटी बॅरेज शेतकरी आत्महत्याग्रस्त खारपाणपट्टय़ात असल्याने या बॅरेजचे मापदंड शिथिल करावे असा पत्रव्यवहार शासनासोबत केला आहे. या बॅरेजचे डिझाईन बदलल्याने किंमत वाढली आहे; पण हे बॅरेज होणार असून, या महिन्याच्या शेवटापर्यंत सुधारित प्रशासकीय मान्यतेसाठी जलसपंदा महामंडळाकडे प्रस्ताव पाठवणार आहोत.- अंकुर देसाई,अधीक्षक अभियंता, पाटबंधारे मंडळ,अकोला.
काटीपाटी बॅरेजचा प्रस्ताव पाठवणार !
By admin | Updated: August 20, 2016 02:43 IST