शहरं
Join us  
Trending Stories
1
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
2
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
3
Yuzvendra Chahal Hat Trick : आधी धोनीची विकेट; मग चहलनं साधला IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकचा डाव
4
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
5
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
6
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
7
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
8
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
9
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
10
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
11
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
12
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
13
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
14
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
15
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
16
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
17
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
18
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
19
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
20
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत

सार्वजनिक ठिकाणी टायर जाळण्यास बंदी

By admin | Updated: November 19, 2014 02:01 IST

विषारी वायूचे मानवी जीवनावर घातक परिणाम.

सचिन राऊत / अकोलाअशास्त्रीय पद्धतीने मोकळ्या जागेत टायर जाळल्याने मोठय़ा प्रमाणात विषारी वायूची निर्मिती होते. त्याचे घातक परिणाम मनुष्यासह पर्यावरणावरही होत असून, याबाबत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने अहवाल दिल्यानंतर, अशाप्रकारे टायर जाळण्यावर बंदी घालण्यात आली आहे.मोकळया जागेत टायर जाळल्याने मोठय़ा प्रमाणावर विषारी वायू वातावरणात पसरतात. याचे मानवी आरोग्यावर प्रचंड घातक परिणाम होत आहेत. त्यामुळे महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाने राज्य सरकारला सार्वजनिक ठिकाणी टायर जाळण्यास प्रतिबंध करण्यासाठी योग्य ती अधिसूचना जारी करण्याची शिफारस केली होती. यावरून मुंबई पोलिस कायदा, फौजदारी प्रक्रिया संहिता अंतर्गत सार्वजनिक क्षेत्रात टायर जाळण्यास बंदी घालण्यासाठी योग्य कारवाई करता यावी, यासाठी प्रदूषण प्रतिबंध व नियंत्रण अधिनियमानुसार वायुप्रदूषण क्षेत्रामध्ये टायर जाळण्यास प्रतिबंध लावण्यात आला आहे. तद्वतच, पुणे खंडपीठाच्या हरित लवादानेही ९ सप्टेंबर रोजी गृह, तसेच महसूल विभागाला आदेश देऊन सार्वजनिक ठिकाणी टायर जाळण्यास प्रतिबंध करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यापृष्ठभूमिवर हा निर्णय घेण्यात आला असून, यापुढे सार्वजनिक ठिकाणी टायर जाळणार्‍यांवर कठोर कारवाई करण्याचा इशारा महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिव राजीव मित्तल यांनी दिला आहे.