शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA : बुमराह-वरुण चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
4
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
5
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
6
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
7
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
8
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
9
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
10
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
11
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
12
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
13
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
14
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
15
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
16
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
17
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
18
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
19
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
20
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

घनकचऱ्याची समस्या जटिल; प्रक्रियेला मुहूर्त सापडेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 21, 2019 15:29 IST

महापालिकेला मुहूर्त सापडत नसल्याने संपूर्ण शहराच्या पर्यावरणावर परिणाम होण्यासोबतच अकोलेकरांना गंभीर आजारांचा सामना करण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.

अकोला: शहरातील दैनंदिन घनकचºयावर प्रक्रिया न करता त्यांची नायगावस्थित डम्पिंग ग्राउंडवर विल्हेवाट लावल्या जात आहे. हा प्रकार कमी म्हणून की काय, कचरा जमा करणारे घंटा गाडी चालक शहरात उघड्यावर कचरा टाकून पळ काढत असल्याने घनकचºयाची समस्या जटिल झाली आहे. त्यावर प्रक्रिया करण्यासाठी पात्र एजन्सीची नियुक्त ी करण्याला महापालिकेला मुहूर्त सापडत नसल्याने संपूर्ण शहराच्या पर्यावरणावर परिणाम होण्यासोबतच अकोलेकरांना गंभीर आजारांचा सामना करण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.स्वच्छ भारत अभियानांतर्गत पहिल्या टप्प्यात उघड्यावर शौच करणाºया नागरिकांचा शोध घेऊन त्यांना वैयक्तिक स्तरावर शौचालय बांधून देण्याचे महापालिकेला केंद्र व राज्य शासनाचे निर्देश होते. शौचालय बांधून देण्याच्या बदल्यात केंद्र, राज्य व मनपा प्रशासनाने पात्र लाभार्थींना अनुदान दिले. २०१५ ते २०१७ या कालावधीत शौचालय बांधून देण्याची मोहीम पूर्ण झाल्यानंतर शासनाने शहरात निर्माण होणाºया कचºयाचे ओला व सुका असे विलगीकरण करण्यासाठी मोहीम सुरू केली. यासंदर्भात शासनाने मागील दोन वर्षांच्या कालावधीत सातत्याने पाठपुरावा करूनही कचºयाच्या विलगीकरणासाठी महापालिके च्या स्तरावर ठोस प्रयत्न होत नसल्याचे समोर आले आहे. घनकचºयाची विल्हेवाट लावण्यासाठी मनपाकडे सक्षम यंत्रणा नसल्याचे ध्यानात घेता शासनाने ‘डीपीआर’(सविस्तर प्रकल्प अहवाल) तयार करण्यासाठी ‘मार्स’नामक एजन्सीची नियुक्ती केली. संबंधित एजन्सीने तयार केलेल्या डीपीआरला महाराष्ट्र जीवन प्राधिकरणची तांत्रिक मान्यता मिळाल्यानंतर नागपूर येथील निरी संस्थेमार्फत मूल्यांकन करण्यात आले. त्यानंतर मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखालील उच्चाधिकार समितीच्या बैठकीत प्रकल्प अहवाल मंजूर करण्यात आला. शासनाने घनकचरा व्यवस्थापनासाठी ४५ कोटी ३५ लक्ष मंजूर केल्यानंतर महापालिका प्रशासनाकडून निविदा अर्ज बोलावणे अपेक्षित होते. शासनाने डीपीआरप्रमाणे घनकचºयाचे व्यवस्थापन बंधनकारक केले असले तरी निविदा प्रकाशित करून पात्र एजन्सीची नियुक्ती करण्याला मनपाच्या स्तरावर विलंब होत असल्याचे चित्र दिसत आहे.प्रदूषणाचा स्तर वाढला!शहरात तयार होणारा दैनंदिन कचरा उचलण्यासाठी मनपाचा मोठा लवाजमा आहे. यामध्ये १२५ घंटा गाड्या, मनपाच्या मालकीचे २० ट्रॅक्टर, भाडेतत्त्वावरील ३३ ट्रॅक्टर, आस्थापनेवरील ७४८ सफाई कर्मचाऱ्यांसह पडीत प्रभागांमधील ३२२ पेक्षा अधिक कर्मचाºयांचा समावेश आहे. तरीही उघड्यावर साचणाºया कचºयाची समस्या कायम असल्यामुळे शहराच्या प्रदूषण स्तरात वाढ झाल्याची माहिती आहे.

खासगी संस्थेच्या विश्वासर्हतेवर प्रश्नचिन्हनायगाव येथील डम्पिंग ग्राउंडवर मागील अडीच वर्षांपासून कचºयावर प्रक्रिया करण्यासाठी मनपा प्रशासनाने एका स्वयंसेवी खासगी संस्थेची नियुक्ती केली. मध्यंतरी या संस्थेने पूर्व झोनमध्ये थातूर-मातूरपणे उभारण्यात आलेल्या डम्पिंग ग्राउंडवर कचरा विलगीकरणासाठीही पुढाकार घेतला होता. मागील अडीच वर्षांच्या कालावधीत संबंधित संस्थेने व प्रशासनाने आजवर किती टन कंपोस्ट खताची निर्मिती केली, याचा खुलासा होणे गरजेचे आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाAkola Municipal Corporationअकोला महानगरपालिका