शहरं
Join us  
Trending Stories
1
Sandhya Shantaram Death: नृत्याच्या 'बिजली'च्या पैंजणांचा आवाज थांबला..! ज्येष्ठ अभिनेत्री संध्या शांताराम यांचं निधन
2
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
3
“सोनम वांगचूक यांना सोडून द्यावे, नवीन पिढीसाठी मोठे योगदान”: शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद
4
“अनिल परब अर्धवट वकील”; रामदास कदमांचा पलटवार, पत्नीने जाळून घेतले की? यावरही दिले उत्तर
5
Video - "मी तुला गोळी मारेन, कोणी वाचवणार नाही"; भाजपा नेत्याची गुंडगिरी, डान्सरवर उधळले पैसे
6
प्रवाशांची दिवाळी! मुंबई-गोवा ‘वंदे भारत’च्या फेऱ्या वाढणार; कोकणवासीयांना फायदा, नवे टाइमटेबल
7
Kojagiri Purnima 2025: कोजागरीला लक्ष्मी योगात 'या' राशींवर बरसणार सुख-संपत्तीचे चांदणे!
8
"त्यांचा आशीर्वादच मिळाल्याची भावना होती...", संध्या शांताराम यांच्या निधनानंतर प्रिया बेर्डेंनी दिला आठवणींना उजाळा
9
“आम्ही युती-आघाडीचे बळी ठरलो, आता स्थानिकांच्या भावना लक्षात घेणार”; उद्धव ठाकरे थेट बोलले
10
"गौतमी पाटील तू महाराष्ट्राचा बिहार केलास, तुझी कार..."; मराठी अभिनेत्याने व्यक्त केला संताप
11
वनडेतही नवे पर्व! रोहित शर्माचं मोठं स्वप्न भंगलं; गिलच्या कॅप्टन्सीत किंग कोहलीसमोरही असेल चॅलेंज
12
"अरे बिट्टू, मी तुझ्यासाठी काय केलं नाही, तरीही तू..."  मुलीचा ब्रेकअपनंतरचा व्हिडीओ व्हायरल!
13
'जननायक' पदवीची चोरी होतेय , बिहारी वाले सावधान! पंतप्रधान मोदींनी राहुल गांधी आणि 'राजद'वर निशाणा साधला
14
Uddhav Thackeray : बाळासाहेबांच्या पार्थिवावरुन रामदास कदम यांनी केलेल्या आरोपावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया
15
Kojagiri Purnima 2025: कोजागरीला १ रुपयांचा शिक्का करेल कमाल, नशीब उजळेल, व्हाल मालामाल 
16
धक्कादायक घटना ; 'कफ सिरप' घेतल्याने आठ बालकांचा मृत्यू ! जीव जाण्याला काय ठरले कारणीभूत ?
17
हृदयद्रावक! बॉयफ्रेंडसोबत पळून गेली बायको; ढसाढसा रडत नवऱ्याने ४ मुलांसह नदीत मारली उडी
18
IND vs AUS: ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा; रोहित शर्माला ठेंगा! शुबमन गिल वनडेचा नवा कॅप्टन
19
"हात पाय सलामत ठेवायचे असतील तर…", आमदार संतोष बांगर यांची अधिकाऱ्यांना धमकी, कॉल रेकॉर्डिंग व्हायरल
20
IND vs WI: मोहम्मद सिराज, रवींद्र जडेजाची कमाल; सामन्याच्या तिसऱ्याच दिवशी वेस्ट इंडीजचा खेळ खल्लास!

खासगी रुग्णालयांचा बेमुदत बंद, रुग्णसेवा कोलमडली!

By admin | Updated: March 24, 2017 02:00 IST

मेडिकलमधील १६ डॉक्टर, ९0 आंतरवासिता डॉक्टर पुन्हा रजेवर

अकोला, दि. २३- राज्यात ठिकठिकाणी रुग्णालयांमध्ये होत असलेल्या डॉक्टरांवरील हल्ल्याच्या निषेधार्थ इंडियन मेडिकल असोसिएशननेसुद्धा मार्डला सर्मथन देत शहरातील खासगी रुग्णालये बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार गुरुवारी शहरातील डॉक्टरांनी अत्यावश्यक सेवा वगळता, रुग्णालये बंद ठेवली. शहरातील रुग्णालये बंद असल्यामुळे ग्रामीण भागासह शहरातील रुग्णांना त्याचा फटका सहन करावा लागला. अनेकांना उपचार न करताच परतावे लागले. यासोबतच शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील १६ डॉक्टर आणि ९0 आंतरवासिता डॉक्टरसुद्धा पुन्हा रजेवर गेले आहेत. त्यामुळे सर्वोपचार रुग्णालयातील रुग्णांवरील उपचार थांबले आहेत. गत काही दिवसांपासून राज्यातील धुळे, मुंबई, सोलापूर आणि औरंगाबाद येथे लागोपाठ डॉक्टरांवर हल्ल्याच्या घटना घडल्या. डॉक्टरांवरील हल्ल्याच्या घटना वाढत असतानाच, शासनाकडून कोणतीच खबरदारी घेतली जात नाही. मार्डच्या संपाला सर्मथन देत, आयएमएनेसुद्धा डॉक्टरांना संरक्षण देण्याची मागणी केली आहे. डॉक्टरांवर होत असलेल्या हल्ल्याच्या निषधार्थ गुरुवारपासून आयएमएने शहरातील खासगी रुग्णालये, दवाखाने, बेमुदत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. यातून केवळ अत्यावश्यक सेवा वगळण्यात आली आहे. खासगी रुग्णालयांमधील ओपीडी आणि शस्त्रक्रिया बंद ठेवण्यात आल्या आहेत. शासनाकडून डॉक्टरांना संरक्षण मिळेपर्यंंत खासगी रुग्णालये बंद ठेवण्याचा निर्णय आयएमएने घेतला आहे. यासोबतच शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील १६ डॉक्टर रजेवर गेल्याचे पाहून त्यांचे विद्यार्थी असलेले ९0 आंतरवासिता डॉक्टरसुद्धा रजेवर गेले आहेत. यामुळे सर्वोपचार रुग्णालयातील रुग्णसेवेवर परिणाम होत आहे. रुग्णालयात आलेल्या रुग्णांना उपचार व औषधोपचाराविनाच गावी परतावे लागले. भरती असलेल्या रुग्णांवरील उपचारसुद्धा थांबले असून, त्यांच्या जीवाशी खेळ सुरू असल्याचे दिसून येत आहे. सर्वोपचार रुग्णालयातील डॉक्टर आणि खासगी डॉक्टरांनी संप पुकारल्यामुळे रुग्णांसमोर उपचार आणि औषधोपचाराचे मोठे आव्हान उभे ठाकले आहे.  

आंतरवासिता डॉक्टरांची निदर्शने आणि पथनाट्य४शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील आंतरवासिता डॉक्टरांनी गुरुवारी दुपारी रुग्णालय परिसरात डॉक्टरांवरील हल्ल्यासंदर्भात जनजागृतीपर पथनाट्य सादर केले आणि शासनाविरुद्ध निदर्शने करीत, डॉक्टरांवरील हल्ले थांबविण्यासाठी शासनाने संरक्षण द्यावे. अशी मागणी केली. निदर्शनांमध्ये १५0 च्यावर आंतरवासिता विद्यार्थी सहभागी झाले होते. ४अनेक व्याधींवर उपचार घेण्यासाठी ग्रामीण भागासह शहरातील हजारो रुग्ण व त्यांचे नातेवाइक शहरातील खासगी रुग्णालयांसोबतच, स्त्री रुग्णालय, सर्वोपचार रुग्णालयात येतात; परंतु डॉक्टरांनी संप पुकारल्यामुळे बाहेरगावहून आलेल्या रुग्णांना उपचार व औषधोपचार घेतल्याविनाच परतावे लागले.मार्डच्या आंदोलनाला आयएमएने पाठिंबा दिला असून, शहरातील खासगी रुग्णालये बेमुदत बंद ठेवण्यात येणार आहेत. यातून अत्यावश्यक सेवा वगळण्यात आल्या आहेत. मार्डने संप मागे घेतला नाही. डॉक्टरांना संरक्षण मिळावे, ही आमची मागणी आहे. - डॉ. जुगल चिराणिया, सचिव, आयएमए

वैद्यकीय महाविद्यालयातील डॉक्टर रजेवर गेल्यामुळे रुग्णालयातील रुग्णसेवेवर कोणताही परिणाम पडलेला नाही. आमच्याकडे डॉक्टर, परिचारिका आणि इतर कर्मचारी यांचे पुरेसे मनुष्यबळ आहे. त्यामुळे रुग्णांवरील उपचार व औषधोपचारात कोणतीही कुचराई नाही. आम्ही नेहमीप्रमाणेच रुग्णांना सेवा देऊ. - डॉ. कुसुमाकर घोरपडे, प्रभारी अधिष्ठाता,शासकीय वैद्यकीय महाविद्यालय.