शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
3
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
4
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
5
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
6
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
7
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
8
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
9
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
10
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
11
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
12
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
13
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
14
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
15
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
16
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
17
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
18
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
19
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
20
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...

महाआरोग्य शिबिराची तयारी पूर्ण - रणजित पाटील यांची माहिती  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2018 13:37 IST

अकोला: जिल्ह्यातील जनसामान्यांच्या आरोग्यासाठी रविवार, ३० डिसेंबर रोजी अकोल्यातील शास्त्री स्टेडियम येथे महाआरोग्य रोगनिदान व उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

अकोला: जिल्ह्यातील जनसामान्यांच्या आरोग्यासाठी रविवार, ३० डिसेंबर रोजी अकोल्यातील शास्त्री स्टेडियम येथे महाआरोग्य रोगनिदान व उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. त्यासाठी २० हजार लोकांची नोंदणी करण्यात आली असून, शिबिराची तयारी पूर्ण करण्यात आली आहे, अशी माहिती पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी शुक्रवारी दिली. गेल्या चार वर्षातील जिल्ह्यातील विकासकामांचा लेखा-जोखाही पालकमंत्र्यांनी यावेळी मांडला.शासकीय विश्रामगृह येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. सर्वांसाठी विनामूल्य महाआरोग्य शिबिरात तज्ज्ञ डॉक्टरांमार्फत विविध आजारांच्या तपासणीसह चाचण्या, औषधोपचाराच्या सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. जिल्हा प्रशासन व आरोग्य विभागाच्यावतीने आयोजित या शिबिरात सरकारी आणि विविध खासगी रुग्णालयांच्या तज्ज्ञ डॉक्टरांचे सहकार्य घेण्यात येणार आहे. तसेच दुर्धर आजारांचे निदान झालेल्या रुग्णांना मुंबई येथील रुग्णालयांत उपचार उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. महाआरोग्य शिबिरात ३० बाह्य रुग्ण स्टॉल्स राहणार असून, सर्व प्रकारच्या तपासण्या करण्यात येणार आहेत, असे पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी सांगीतले. गत चार वर्षातील जिल्ह्यातील विविध विकासकामांची माहिती त्यांनी यावेळी दिली. त्यामध्ये प्रामुख्याने जिल्ह्यातील रखडलेल्या सिंचन प्रकल्पांची कामे मार्गी लागली असून, घुंगशी प्रकल्पासाठी पंपहाऊस व बंद पाइपलाइनचे डिझाइन प्राप्त झाले आहे. तसेच नेरधामना, कवठा बॅरेज, अंदुरा प्रकल्पाचे कामही लवकरच पूर्ण होणार आहे. सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे काम ८० टक्के पूर्ण झाले असून, यंत्रसामग्री खरेदीसाठी लवकरच निविदा काढण्यात येणार आहे. सांस्कृतिक भवनाचे काम पूर्णत्वास आले असून, अतिरिक्त सुविधांसाठी १५ कोटींचा निधी प्राप्त झाला. जिल्हा न्यायालयाच्या नवीन इमारतीमध्ये फर्निचरसाठी साडेचार कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला. न्यू तापडिया नगर येथील रेल्वे उड्डाण पुलाच्या कामासाठी निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्याचे सांगत इतर विकासकामांची माहिती पालकमंत्र्यांनी दिली. यावेळी माजी आमदार वसंतराव खोटरे, डॉ. जगन्नाथ ढोणे उपस्थित होते.‘नेकलेस रोड’चे काम मार्गी; पासपोर्ट कार्यालय चार महिन्यात!शहरातील वर्दळीच्या ‘नेकलेस रोड’चे काम मार्गी लागले असून, या रस्त्यावरील भूमिगत वीज वाहिनी टाकण्यात येणार आहे. तसेच अकोल्यात पासपोर्ट कार्यालयाचे काम चार महिन्यात पूर्ण करण्यात येणार असल्याचे डॉ. रणजित पाटील यांनी सांगितले.

 

टॅग्स :AkolaअकोलाDr. Ranjit patilडॉ. रणजित पाटील