शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

आपत्कालीन पीक नियोजन तयार!

By admin | Updated: June 30, 2017 01:39 IST

पंदेकृवि: आता खरीप पिकांमध्ये करावा लागणार फेरबदल!

राजरत्न सिरसाट । लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: यावर्षी पावसाळा लांबल्याने विदर्भातील शेतकऱ्यांसह सर्वत्र चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने आपत्कालीन नियोजन केले आहे. ३० जूनपर्यंत पाऊस आला नाही तर खरिपातील काही पिकांमध्ये शेतकऱ्यांना फेरबदल करावे लागणार आहेत. त्यासाठीची शिफारस करण्यात आली आहे.खरीप हंगामात विदर्भात सोयाबीन, कापूस, तूर, मूग, उडीद, ज्वारी, भात आदी पिकांची पेरणी साधारणत: जूनच्या पहिल्या आठवड्यात केली जाते; परंतु यावर्षी जूनचा पहिला व दुसऱ्या आठवड्यात अद्याप पाऊस आला नसल्याने डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने आपत्कालीन पिकांचे नियोजन केले आहे. नियमित पावसाळा दोन आठवडे उशिरानेही सुरू न झाल्याने कृषी विद्यापीठाने पीक पेरणीसाठी काही सूचना केली आहे. सलग कपाशीसाठी कृषी विद्यापीठाच्या शिफारशीप्रमाणे आवश्यक तंत्रज्ञानाचा अवलंब शेतकऱ्यांना करावा लागेल तसेच कापूस अधिक तूर (६:२) आंतरपीक पद्धतीचा अवलंब करावा लागेल. यावर्षी सोयाबीन अधिक तूर (४:२/६:२) आंतरपीक लावल्यास त्याचा शेतकऱ्यांना फायदा होतो. सलग ज्वारी पिकासाठी शिफारशीसह ज्वारी अधिक तूर (३:३) आंतरपीक पद्धतीमुळे फायदा होतो. कापूस अधिक तूर (६:२) किंवा सोयाबीन अधिक तूर (४:२/६:२) आंतरपीक घ्यावे. मूग, उडीद पिके ही उथळ काळ््या जमिनीत लावावे, धान शिफारशीप्रमाणे रोवणी करावी, साकोली-६, पीकेव्ही मकरंद, पीकेव्ही गणेश, पीकेव्ही एचएमटी, सिंदेवाही २००१ या वाणांची निवड करावी.मूग, उडिदाचे दिवस गेले!मूग व उडीद पिकांची पेरणी याच आठवड्यात करणे आवश्यक होते. तथापि, पावसाने दडी मारल्याने या पिकांची पेरणी रखडली आहे. आता या पिकांच्या पेरणीचे दिवस संपल्यासारखेच आहेत.मूग, उडिदाची पेरणी या आठवड्यात होणे गरजेचे होते आता या पिकांच्या पेरणीचे दिवस गेले आहेत. सोयाबीन १५ जुलैपर्यंत पेरता येईल. कापूस पिकाला अद्याप अवधी आहे. पाऊस आणखी दोन, चार आठवडे लांबल्यास मात्र कृषी विद्यापीठाच्या शिफारशीनुसार पिकांचे नियोजन करावे लागेल.डॉ. दिलीप मानकर, संचालक संशोधन,डॉ. पंदेकृवि, अकोला.