शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
3
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
6
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
7
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
8
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
9
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
10
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
11
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
12
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
13
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
14
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
15
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
16
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
17
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
18
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
19
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
20
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
Daily Top 2Weekly Top 5

घरकुलांसाठी गावातील स्रोतांतूनच वाळू देण्याची तयारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2019 14:55 IST

अकोला: नद्यांमधील वाळू घाटातून उपसा करण्यास पर्यावरण विभागाने अद्याप मंजुरी दिलेली नाही. त्यामुळे राज्यातील घरकुलांची कामे अपूर्ण असून, ती निवडणुकीपूर्वी पूर्ण करण्यासाठी गावशिवारातील नद्यांचे शेतामधून पडलेले प्रवाह, नाले, तलावातून वाळू देण्याची तयारी शासनाने केली.

अकोला: नद्यांमधील वाळू घाटातून उपसा करण्यास पर्यावरण विभागाने अद्याप मंजुरी दिलेली नाही. त्यामुळे राज्यातील घरकुलांची कामे अपूर्ण असून, ती निवडणुकीपूर्वी पूर्ण करण्यासाठी गावशिवारातील नद्यांचे शेतामधून पडलेले प्रवाह, नाले, तलावातून वाळू देण्याची तयारी शासनाने केली. त्यासाठी वाळू उपशाची ठिकाणे, गावनिहाय लाभार्थी संख्येचा ताळमेळ अद्याप तयार नाही. ते काम तातडीने करण्यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी संबंधितांना निर्देश दिले आहेत.ग्रामस्थांना स्वत:च्या वापरासाठी वाळू काढण्यासाठी शासनाने १७ आॅक्टोबर २०१८ रोजी अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. त्यानुसार ज्या वाळू घाटांना पर्यावरण विभागाने उपसा करण्यासाठी मंजुरी दिली आहे; मात्र त्या वाळू घाटांचा लिलाव शासनाने ठरविलेल्या किमतीत झाला नाही, त्या घाटातील वाळू ग्रामस्थांना देण्याचा निर्णय शासनाने घेतला. गावातील कोणालाही वाळूची गरज असल्यास त्यांना पाच ब्रासपर्यंत वाळूचा उपसा त्या घाटातून करता येईल. त्या घाटातून वाळू घेण्यासाठी प्रचलित दरानुसार पाच ब्रासची रॉयल्टी जमा करावी लागणार आहे. वाळूची वाहतूक स्वखर्चाने करावी लागणार आहे.त्याशिवाय, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी शासनाच्या कोणत्याही गृहनिर्माण योजनेचा लाभ घेणाऱ्या व्यक्तीस कोणतेही शुल्क न घेता घराच्या बांधकामासाठी पाच ब्रासपर्यंत वाळू काढण्यास परवानगी दिली जाणार आहे. संबंधितांनी वाळू उपसा करण्यासाठी अर्ज केल्यानंतर तहसीलदार १५ दिवसांत परवानगी देणार आहेत. घाटातून वाळूचा उपसा, वाहतूक लाभार्थींना करण्याचे ठरले; मात्र पर्यावरण विभागाची मंजुरीच न मिळाल्याने वाळू घाटांंचा लिलावच झाला नाही. परिणामी, कोणत्या घाटातून वाळू द्यावी, हेही निश्चित झाले नाही.- विभागीय आयुक्तांचा तोडगात्यावर अमरावती विभागीय आयुक्तांनी ४ फेब्रुवारी रोजी सर्व जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकाºयांना पत्र देत घरकुलासाठी वाळू देण्याचा नवा पर्याय सांगितला. त्यानुसार गाव स्तरावर वाळू उपसा करता येणारी ठिकाणे तहसीलदारांनी निश्चित करावी, गटविकास अधिकाºयांनी लाभार्थींची यादी तयार ठेवावी, वाळूची उपलब्धता आणि लाभार्थींच्या संख्येचा ताळमेळ घेऊन लाभार्थींना वाळू उपसा करण्याची परवानगी द्यावी, असे निर्देश दिले आहेत.- सहा हजार घरकुले अपूर्ण!गेल्या तीन वर्षांत ग्रामीण भागातील लाभार्थींसाठी प्रधानमंत्री आवास योजनेतून १८८३६ घरकुले मंजूर आहेत. त्यापैकी ६५०० घरकुले अपूर्ण आहेत. सोबतच रमाई आवाससाठी चार हजार लाभार्थींची निवडही या वर्षात झाली. त्या सर्वांना वाळूची गरज आहे.

 

टॅग्स :Akolaअकोलाsandवाळू