शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Tiwari : "शिवीगाळ केली, वाहनांवर हल्ला"; मनोज तिवारींच्या रोड शोमध्ये प्रचंड गोंधळ, RJD वर गंभीर आरोप
2
मल्लिकार्जुन खर्गे यांच्या RSS वर बंदी घालण्याच्या मागणीवर अमित शाह यांची पहिली प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले
3
शाहरुख खानचा वाढदिवस, 'मन्नत'बाहेर चाहत्यांची तुफान गर्दी; युके-जपानवरुनही आले फॅन्स
4
विशेष लेख | फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरण: आफ्टर डेथ पॉलिटिकल स्टोरी !
5
"मी अवतारात आले आहे...'; शर्ट परिधान करुन रेड कार्पेटवर आली प्राजक्ता माळी, व्हिडीओ व्हायरल
6
दुलारचंद यादव हत्याकांड: नाट्यमय घडामोडींनंतर अनंत सिंह यांना अटक, रात्री पोहोचले पोलीस, त्यानंतर...
7
कार्तिक सोमप्रदोष व्रत २०२५: महादेव प्रसन्न होतील, सर्व मनोकामना पूर्ण करतील; ‘असे’ करा व्रत!
8
इस रात की सुबह नही ! मुंबईतील 'ओलीस नाट्य' म्हणजे आभासी वेडेपणाचे भेसूर प्रतिबिंब
9
आजचे राशीभविष्य, ०२ नोव्हेंबर २०२५: हाती पैसा, यश-कीर्ती लाभेल; पण हट्टीपणा सोडावा
10
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभच लाभ, पद-पैसा वाढ; ६ राशींना काहीसा ताप, तुमची रास कोणती?
11
एक काेटी वाहनांना नाही ‘हाय सिक्युरिटी नंबरप्लेट’! एकूण ६८.२४ लाख चालकांनी दिला प्रतिसाद
12
महिला वर्ल्डकप: आज घडणार इतिहास; प्रथमच जिंकेल भारत किंवा दक्षिण आफ्रिका; उत्सुकता शिगेला
13
कुष्ठरोगाचे निदान झाले रे झाले की, रुग्णनाेंद बंधनकारक; सार्वजनिक आरोग्य विभागाचा निर्णय
14
कसली थंडी..? आता अनुभवा ‘नोव्हेंबर हीट’! मुंबईसह राज्यभरात अवकाळी पावसाचीही शक्यता
15
आयोगाचा सर्व्हर कुणाच्या कार्यालयात? कुणाची नावे काढायची, कुठली टाकायची हा कट सुरू: ठाकरे
16
चार हजार ग्राहकांनी वाढवली २२ मेगावॅट क्षमता; २ हजार ४६० औद्योगिक ग्राहकांचाही समावेश
17
मूक आंदोलन करून भाजपने केला पलटवार! ...हा तर मविआचा नवा कट- रवींद्र चव्हाण
18
जय हरी विठ्ठल.. एकनाथ शिंदे यांनी सपत्नीक केली विठ्ठल-रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
19
दुबार मतदार दिसताच बडवा; मविआ-मनसेचा महाएल्गार! मतदार यादीतील घोळाबाबत मुंबईत निषेध मोर्चा
20
गाव पोटा.. व्यवसाय शेती अन् वालेगावकर दाम्पत्याला मिळाला उपमुख्यमंत्र्यांसोबत महापूजेचा मान

घरकुलांसाठी गावातील स्रोतांतूनच वाळू देण्याची तयारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2019 14:55 IST

अकोला: नद्यांमधील वाळू घाटातून उपसा करण्यास पर्यावरण विभागाने अद्याप मंजुरी दिलेली नाही. त्यामुळे राज्यातील घरकुलांची कामे अपूर्ण असून, ती निवडणुकीपूर्वी पूर्ण करण्यासाठी गावशिवारातील नद्यांचे शेतामधून पडलेले प्रवाह, नाले, तलावातून वाळू देण्याची तयारी शासनाने केली.

अकोला: नद्यांमधील वाळू घाटातून उपसा करण्यास पर्यावरण विभागाने अद्याप मंजुरी दिलेली नाही. त्यामुळे राज्यातील घरकुलांची कामे अपूर्ण असून, ती निवडणुकीपूर्वी पूर्ण करण्यासाठी गावशिवारातील नद्यांचे शेतामधून पडलेले प्रवाह, नाले, तलावातून वाळू देण्याची तयारी शासनाने केली. त्यासाठी वाळू उपशाची ठिकाणे, गावनिहाय लाभार्थी संख्येचा ताळमेळ अद्याप तयार नाही. ते काम तातडीने करण्यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी संबंधितांना निर्देश दिले आहेत.ग्रामस्थांना स्वत:च्या वापरासाठी वाळू काढण्यासाठी शासनाने १७ आॅक्टोबर २०१८ रोजी अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. त्यानुसार ज्या वाळू घाटांना पर्यावरण विभागाने उपसा करण्यासाठी मंजुरी दिली आहे; मात्र त्या वाळू घाटांचा लिलाव शासनाने ठरविलेल्या किमतीत झाला नाही, त्या घाटातील वाळू ग्रामस्थांना देण्याचा निर्णय शासनाने घेतला. गावातील कोणालाही वाळूची गरज असल्यास त्यांना पाच ब्रासपर्यंत वाळूचा उपसा त्या घाटातून करता येईल. त्या घाटातून वाळू घेण्यासाठी प्रचलित दरानुसार पाच ब्रासची रॉयल्टी जमा करावी लागणार आहे. वाळूची वाहतूक स्वखर्चाने करावी लागणार आहे.त्याशिवाय, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी शासनाच्या कोणत्याही गृहनिर्माण योजनेचा लाभ घेणाऱ्या व्यक्तीस कोणतेही शुल्क न घेता घराच्या बांधकामासाठी पाच ब्रासपर्यंत वाळू काढण्यास परवानगी दिली जाणार आहे. संबंधितांनी वाळू उपसा करण्यासाठी अर्ज केल्यानंतर तहसीलदार १५ दिवसांत परवानगी देणार आहेत. घाटातून वाळूचा उपसा, वाहतूक लाभार्थींना करण्याचे ठरले; मात्र पर्यावरण विभागाची मंजुरीच न मिळाल्याने वाळू घाटांंचा लिलावच झाला नाही. परिणामी, कोणत्या घाटातून वाळू द्यावी, हेही निश्चित झाले नाही.- विभागीय आयुक्तांचा तोडगात्यावर अमरावती विभागीय आयुक्तांनी ४ फेब्रुवारी रोजी सर्व जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकाºयांना पत्र देत घरकुलासाठी वाळू देण्याचा नवा पर्याय सांगितला. त्यानुसार गाव स्तरावर वाळू उपसा करता येणारी ठिकाणे तहसीलदारांनी निश्चित करावी, गटविकास अधिकाºयांनी लाभार्थींची यादी तयार ठेवावी, वाळूची उपलब्धता आणि लाभार्थींच्या संख्येचा ताळमेळ घेऊन लाभार्थींना वाळू उपसा करण्याची परवानगी द्यावी, असे निर्देश दिले आहेत.- सहा हजार घरकुले अपूर्ण!गेल्या तीन वर्षांत ग्रामीण भागातील लाभार्थींसाठी प्रधानमंत्री आवास योजनेतून १८८३६ घरकुले मंजूर आहेत. त्यापैकी ६५०० घरकुले अपूर्ण आहेत. सोबतच रमाई आवाससाठी चार हजार लाभार्थींची निवडही या वर्षात झाली. त्या सर्वांना वाळूची गरज आहे.

 

टॅग्स :Akolaअकोलाsandवाळू