शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

अकोला : ‘कासोधा’च्या आश्‍वासनपूर्तीसाठी पुन्हा आंदोलनाची तयारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2018 01:02 IST

अकोला : कासोधा परिषदेनंतर माजी केंद्रीय अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांच्या नेतृत्वात झालेल्या आंदोलनाला देशव्यापी प्रसिद्धी मिळाली. या आंदोलनाची तीव्रता लक्षात घेता, थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दखल घेत आंदोलनकर्त्यांशी चर्चा केली व सर्व मागण्यांवर सकारात्मक भूमिका घेत त्या मान्य केल्या.

ठळक मुद्देशत्रुघ्न सिन्हांचाही होकार शेतकरी जागर मंचने  दिली माहिती

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : कासोधा परिषदेनंतर माजी केंद्रीय अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांच्या नेतृत्वात झालेल्या आंदोलनाला देशव्यापी प्रसिद्धी मिळाली. या आंदोलनाची तीव्रता लक्षात घेता, थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दखल घेत आंदोलनकर्त्यांशी चर्चा केली व सर्व मागण्यांवर सकारात्मक भूमिका घेत त्या मान्य केल्या. १५ जानेवारीपर्यंत या मागण्यांची पूर्तता होईल, असे  पत्रही  प्रशासनाने आंदोलकांना दिले. मात्र, आंदोलनातील मागण्यांच्या पूर्ततेच्या दिशेने एकही पाऊल उचलले नाही. याबाबत आता सरकाराला जाब विचारण्यासाठी यशवंत सिन्हा पुन्हा अकोल्यात येणार असून, त्यांच्या सोबतीला शत्रुघ्न सिन्हाही असतील, अशी माहिती शेतकरी जागर मंचच्यावतीने देण्यात आली आहे.  स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राज्याचे नेते रविकांत तुपकर, शेतकरी जागर मंचच्या कार्यकर्त्यांसोबत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या चर्चेदरम्यान शेतकर्‍यांच्या मागण्या मान्य असल्याचे जिल्हाधिकार्‍यांनी लेखी दिले होते. आंदोलनाचे हे मोठे यश होते. आंदोलनाची वाढलेली व्याप्ती, सत्ताधारी भाजपा वगळता सर्वच पक्षांनी दिलेला पाठिंबा पाहता, या मागण्यांबाबत शासन तत्परतेने कारवाई करेल, अशी अपेक्षा होती. प्रत्यक्षात मात्र या मागण्यांसंदर्भात कुठलीही कार्यवाही झाली नाही. मंगळवारी दिल्ली येथे यशवंत सिन्हा यांच्या नेतृत्वात ‘राष्ट्रमंच’ची पायाभरणी झाली आहे. या बैठकीसाठी अकोल्यातून दिल्ली येथे गेलेल्या शेतकरी जागर मंचच्या पदाधिकार्‍यांसोबत यशवंत सिन्हा यांनी चर्चा केली. या चर्चेमध्ये कासोधाच्या आश्‍वासनांची पूर्तता करण्यासाठी सरकारवर दबाव निर्माण करण्याचे ठरविण्यात आले आहे. त्यासाठी यशवंत सिन्हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी आधी संवाद साधणार असून, त्यानंतर आंदोलनाची भूमिका घेणार असल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे प्रख्यात अभिनेते व भाजपाचे नेते शत्रुघ्न सिन्हा यांनीही सदर आंदोलनासाठी अकोल्यात येणार असल्याचे सांगितले आहे. 

कासोधा आंदोलनाच्या सांगतेप्रसंगी प्रशासनामार्फत शासनाने दिलेले आश्‍वासन पूर्ण करण्याची नैतिक जबाबदारी सरकारची आहे. मात्र, सरकारकडून जाणीवपूर्वक टाळाटाळ केली जात आहे. त्यामुळे आता सरकारवर दबाव निर्माण करण्याची भूमिका घेणार आहोत. दिल्ली येथे यशवंत सिन्हा व शत्रुघ्न सिन्हा यांच्या उपस्थितीत चर्चा झाली व दोघांनीही अकोल्यात आंदोलनासाठी येण्याची तयारी दर्शविली आहे. - प्रशांत गावंडे, शेतकरी जागर मंच

टॅग्स :Kasodha Parishadकासोधा परिषदAkola cityअकोला शहरShatrughan Sinhaशत्रुघ्न सिन्हाYashwant Sinhaयशवंत सिन्हा