शहरं
Join us  
Trending Stories
1
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
2
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
3
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video
4
१५ वर्ष भारतीय सेनेत देशसेवा केली, केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत आला मृत्यू; कोण होते पायलट राजवीर सिंह?
5
कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर सुप्रिया सुळे घटनास्थळी; जखमींना दिला धीर, मदतीचे निर्देश
6
नागरिकांनी अपघाताची केली होती, शक्यता व्यक्त;सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासनाने केले दुर्लक्ष
7
कुंडमळा येथे क्षणात कोसळला पूल..! रांजणखळग्यांमुळे शोध मोहिमेत अडथळे
8
राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या पुतळ्याला पुन्हा धोका?; चबुतऱ्याजवळील माती खचली
9
Pune Bridge Collapse: पूल दुर्घटनेत २ मृत्यू, ३२ जखमी, ६ जणांना वाचवले, मात्र आणखी काही...; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
10
Bridge Collapse: कुंडमाळ्याजवळील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला; अनेक पर्यटक बुडाल्याची भीती
11
Pune Bridge Collapse: दोन महिन्यांपूर्वी इंद्रायणी नदीवरील पूल बंद झाला होता, बचाव मोहिम सुरू, व्हिडीओ आला समोर
12
नवरी जोमात, नवरा कोमात! लग्नानंतर १० दिवसांनी शॉपिंगच्या नावाने पत्नी फरार, पती पाहतोय वाट
13
एका दिवसात किती भाविक हेलिकॉप्टरने केदारनाथला जातात? किती वेळ लागतो? जाणून घ्या...
14
कुंडमळा दुर्घटनेत पहिला बळी..! बचाव कार्यादरम्यान महिलेचा मृतदेह सापडला
15
शिवसेना फुटीमागे कोण होतं जबाबदार?; मंत्री भरत गोगावले यांचा खळबळजनक दावा
16
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "मला बाबांशी बोलायचंय..."; विमान अपघातात ८ वर्षांच्या मुलाने गमावले वडील
17
तुमचा EMI कमी होणार! RBI च्या निर्णयानंतर 'या' बँका देतायत सर्वात स्वस्त कर्ज, पाहा संपूर्ण यादी!
18
पाठवणी होताच झालं नवरीचं अपहरण; शोधाशोध करताच समोर आलं धक्कादायक सत्य! नवराही शॉक
19
"महेश सापडेल अशी आशा..!" अहमदाबाद विमान दुर्घटनेत लोकप्रिय संगीतकार बेपत्ता, शेवटचं लोकेशन सापडलं, पण...
20
Neha Marda : 'बालिका वधू'मधील 'गेहना' कुठे झाली गायब? अभिनेत्री बनली बिझनेसवुमन, आता करणार कमबॅक

पूर्वहंगामी बीटी कापूस बियाणे १५ मे नंतर मिळणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2018 14:54 IST

जिल्ह्यात बीटी कापसाचे बियाणे पुरवठा १५ मेनंतरच करण्याची तयारी आहे. पेरणीच्या काळात बाजारात बियाणे नसल्याने शेतकऱ्यांना त्याची पेरणी करता येणार नाही.

ठळक मुद्दे यावर्षी १ लाख २० हजार हेक्टरवर कापसाची पेरणी होणार असल्याचा अंदाज आहे. त्यासाठी २७०० क्विंटल बियाण्यांची मागणी आहे. २६९५ क्विंटल बियाण्यांचा पुरवठा खासगी कंपन्यांकडून होणार आहे.

अकोला : बोंडअळीच्या हल्ल्याने गारद होणारे कापसाचे पीक वाचविण्यासाठीचा प्रयत्न म्हणून यावर्षी पूर्वहंगामी कापसाची पेरणी होऊच द्यायची नाही, असे प्रयत्न शासनाकडून सुरू आहेत. त्यामुळे अकोला जिल्ह्यात बीटी कापसाचे बियाणे पुरवठा १५ मेनंतरच करण्याची तयारी आहे. पेरणीच्या काळात बाजारात बियाणे नसल्याने शेतकऱ्यांना त्याची पेरणी करता येणार नाही.पश्चिम विदर्भात महत्त्वाचे पीक असलेल्या कापूस पिकाला गेल्यावर्षी बोंडअळीने चांगलाच हिसका दाखविला. विशेष म्हणजे, बीटी कापूस बियाणे असतानाही पिकावर बोंडअळीचा हल्ला झाला, ही बाब त्यापेक्षाही भयंकर घडली. या प्रकाराने सर्वच कापूस उत्पादक शेतकरी गर्भगळीत झाले. शासनाने बोंडअळीने नुकसान झालेल्या कापूस पिकाला मदत देण्याची घोषणा केली. दरम्यानच्या काळात बोंडअळीचा हल्ला रोखणे, कीटकनाशकांचा वाजवी वापर करण्यासाठी राष्ट्रीय पातळीवर दखल घेण्यात आली. त्यानुसार प्रत्येक टप्प्यावर खबरदारी घेण्याचा पवित्रा शासनाच्या कृषी विभागाने घेतला आहे.पूर्वहंगामी कापूस पिकाची पेरणी केल्यास किडींच्या जीवनचक्रानुसार या पिकावर त्यांचे पोषण होण्याएवढा काळ उपलब्ध होतो. त्या पोषक काळात त्यांचा टिकाव लागल्यास पुढील काळात पेरणी झाल्यास इतर पिकांवर हल्ला करण्यास कीड सक्षम होते. त्या किडीचे जीवनचक्र बाधित करण्यासाठी कापसाची पूर्वहंगामी पेरणी रोखणे आवश्यक असल्याचा उपाय शासनाकडून केला जात आहे. पावसाच्या पाण्यावर उगवलेल्या पिकांमध्ये किडींच्या प्रादुर्भावाची शक्यता कमी असते, असे शास्त्रज्ञांचे मत आहे. त्यानुसार सिंचनाच्या पाण्यावर कापूस पिकाची पेरणी रोखली जात आहे. त्यासाठी दरवर्षी बीटी कापूस बियाणे १५ मेपर्यंत बाजारात बियाणे उपलब्ध केले जाते. यावर्षी ते मिळणार नसल्याची माहिती आहे. त्यामुळे शेतकºयांना पूर्वहंगामी पेरणीसाठी आवश्यक काळात बियाणे बाजाराबाहेर ठेवले जाणार आहे.गेल्यावर्षी जिल्ह्यात कापसाची पेरणी १ लाख ४२ हजार ४८२ हेक्टरवर झाली होती. यावर्षी ती १ लाख २० हजार हेक्टरवर होणार असल्याचा अंदाज आहे. त्यासाठी २७०० क्विंटल बियाण्यांची मागणी आहे. त्यापैकी २६९५ क्विंटल बियाण्यांचा पुरवठा खासगी कंपन्यांकडून होणार आहे. गुलाबी बोंडअळीच्या परिणामाने ही घट होण्याचा अंदाज आहे.

टॅग्स :Akolaअकोलाagricultureशेतीcottonकापूस