शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातचे 'टायटन्स' बुडता बुडता वाचले! हार्दिकच्या चुकीमुळे MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
2
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
3
पांड्या तुला सूर्यावर भरवसा नाय काय? मुंबई इंडियन्सनेच जिंकली असती मॅच, पण... (VIDEO)
4
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
5
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
6
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
7
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
8
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
9
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
10
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
11
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
12
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
13
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
14
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
15
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
16
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
17
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
18
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
19
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
20
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक

‘प्रहार’चा मुक्काम मोर्चा: आश्वासन मिळाले; मुक्काम टळला!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2018 14:32 IST

अकोला : शेतकरी, बेरोजगार, कष्टकरी, आदिवासींच्या विविध प्रलंबित प्रश्नांवर प्रहार जनशक्ती पक्षाच्यावतीने शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मुक्काम मोर्चा काढण्यात आला.

अकोला : शेतकरी, बेरोजगार, कष्टकरी, आदिवासींच्या विविध प्रलंबित प्रश्नांवर प्रहार जनशक्ती पक्षाच्यावतीने शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मुक्काम मोर्चा काढण्यात आला. त्यामध्ये शासन स्तरावरील मुद्यांवर विधान भवनात बैठक घेण्याचे आश्वासन कृषी मंत्री यांनी दिले, तसेच जिल्हा स्तरावरील मुद्यांवर जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेणार असल्याचे आश्वासन जिल्हाधिकाºयांनी आमदार बच्चू कडू यांना दिले. जिल्हाधिकारी व कृषी मंत्र्यांकडून आश्वासन मिळाल्याने ‘प्रहार’चा जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील शुक्रवारी रात्रीचा मुक्काम टळला.गतवर्षी तूर विकलेल्या शेतकºयांना भावांतर योजनेंतर्गत प्रतिक्विंटल एक हजार रुपये तफावतीची रक्कम शेतकºयांना अद्याप मिळाली नाही. हरभरा, सोयाबीनचे प्रलंबित अनुदान, तूर खरेदीतील घोळ, जिल्ह्यातील अकोट व तेल्हारा तालुक्यातील पुनर्वसित गावांमध्ये सुविधांचा अभाव, विजेचे भारनियमन व नादुरुस्त रोहित्रांमुळे शेतकºयांचे होणारे नुकसान यासह इतर प्रश्नांवर प्रहार जनशक्ती पक्षाच्यावतीने अकोल्यातील स्वराज्य भवन येथून जिल्हाधिकारी कार्यालयावर मुक्काम मोर्चा काढण्यात आला. प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वात काढण्यात आलेला मुक्काम मोर्चा गांधी रोड, पंचायत समिती समोरून मार्गक्रमण करीत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धडकला. आ. बच्चू कडू यांच्यासह एका शिष्टमंडळाने शेतकºयांच्या विविध प्रश्नांवर जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांच्याशी चर्चा केली. त्यामध्ये जिल्हा स्तरावरील प्रश्नांवर १९ नोव्हेंबरपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेणार असल्याचे आश्वासन जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी आ. बच्चू कडून यांना दिले. त्यानंतर शासन स्तरावरील प्रश्नांच्या मुद्यावर विधिमंडळाच्या अधिवेशन कालावधीत १९ ते २४ नोव्हेंबर दरम्यान विधान भवनातील कृषी मंत्र्यांच्या कार्यालयात संबंधितांसोबत बैठक घेण्यात येणार असल्याचे आश्वासन कृषी मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आ. बच्चू कडू यांना भ्रमणध्वनीवरून बोलताना दिले. यासंदर्भात कृषी मंत्र्यांचे विशेष कार्य अधिकारी अतुल खानोलकर यांच्यामार्फत कृषी मंत्र्यांचे लेखी आश्वासनही आ. बच्चू कडू यांना मिळाले. त्यामुळे विविध प्रलंबित प्रश्नांवर प्रहार जनशक्ती पक्षाच्यावतीने आ. बच्चू कडू यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गुरुवारी रात्री होणारा मुक्काम मागे घेण्यात आला. यावेळी प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाप्रमुख तुषार पुंडकर, प्रदेश कार्याध्यक्ष बल्लू जवंजाळ, जिल्हा संपर्क प्रमुख गजानन कुबडे, मंगेश देशमुख, प्रवीण हेंडवे,युवक आघाडी जिल्हाध्यक्षयोगेश पाटील, नीलेश ठोकळ यांच्यासह इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. ‘प्रहार’च्या मुक्काम मोर्चात जिल्ह्यातील पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी झाले होते.

 

टॅग्स :AkolaअकोलाBacchu Kaduबच्चू कडू