शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

‘प्रहार’चा मुक्काम मोर्चा: आश्वासन मिळाले; मुक्काम टळला!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2018 14:32 IST

अकोला : शेतकरी, बेरोजगार, कष्टकरी, आदिवासींच्या विविध प्रलंबित प्रश्नांवर प्रहार जनशक्ती पक्षाच्यावतीने शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मुक्काम मोर्चा काढण्यात आला.

अकोला : शेतकरी, बेरोजगार, कष्टकरी, आदिवासींच्या विविध प्रलंबित प्रश्नांवर प्रहार जनशक्ती पक्षाच्यावतीने शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मुक्काम मोर्चा काढण्यात आला. त्यामध्ये शासन स्तरावरील मुद्यांवर विधान भवनात बैठक घेण्याचे आश्वासन कृषी मंत्री यांनी दिले, तसेच जिल्हा स्तरावरील मुद्यांवर जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेणार असल्याचे आश्वासन जिल्हाधिकाºयांनी आमदार बच्चू कडू यांना दिले. जिल्हाधिकारी व कृषी मंत्र्यांकडून आश्वासन मिळाल्याने ‘प्रहार’चा जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील शुक्रवारी रात्रीचा मुक्काम टळला.गतवर्षी तूर विकलेल्या शेतकºयांना भावांतर योजनेंतर्गत प्रतिक्विंटल एक हजार रुपये तफावतीची रक्कम शेतकºयांना अद्याप मिळाली नाही. हरभरा, सोयाबीनचे प्रलंबित अनुदान, तूर खरेदीतील घोळ, जिल्ह्यातील अकोट व तेल्हारा तालुक्यातील पुनर्वसित गावांमध्ये सुविधांचा अभाव, विजेचे भारनियमन व नादुरुस्त रोहित्रांमुळे शेतकºयांचे होणारे नुकसान यासह इतर प्रश्नांवर प्रहार जनशक्ती पक्षाच्यावतीने अकोल्यातील स्वराज्य भवन येथून जिल्हाधिकारी कार्यालयावर मुक्काम मोर्चा काढण्यात आला. प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वात काढण्यात आलेला मुक्काम मोर्चा गांधी रोड, पंचायत समिती समोरून मार्गक्रमण करीत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धडकला. आ. बच्चू कडू यांच्यासह एका शिष्टमंडळाने शेतकºयांच्या विविध प्रश्नांवर जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांच्याशी चर्चा केली. त्यामध्ये जिल्हा स्तरावरील प्रश्नांवर १९ नोव्हेंबरपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेणार असल्याचे आश्वासन जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी आ. बच्चू कडून यांना दिले. त्यानंतर शासन स्तरावरील प्रश्नांच्या मुद्यावर विधिमंडळाच्या अधिवेशन कालावधीत १९ ते २४ नोव्हेंबर दरम्यान विधान भवनातील कृषी मंत्र्यांच्या कार्यालयात संबंधितांसोबत बैठक घेण्यात येणार असल्याचे आश्वासन कृषी मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आ. बच्चू कडू यांना भ्रमणध्वनीवरून बोलताना दिले. यासंदर्भात कृषी मंत्र्यांचे विशेष कार्य अधिकारी अतुल खानोलकर यांच्यामार्फत कृषी मंत्र्यांचे लेखी आश्वासनही आ. बच्चू कडू यांना मिळाले. त्यामुळे विविध प्रलंबित प्रश्नांवर प्रहार जनशक्ती पक्षाच्यावतीने आ. बच्चू कडू यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गुरुवारी रात्री होणारा मुक्काम मागे घेण्यात आला. यावेळी प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाप्रमुख तुषार पुंडकर, प्रदेश कार्याध्यक्ष बल्लू जवंजाळ, जिल्हा संपर्क प्रमुख गजानन कुबडे, मंगेश देशमुख, प्रवीण हेंडवे,युवक आघाडी जिल्हाध्यक्षयोगेश पाटील, नीलेश ठोकळ यांच्यासह इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. ‘प्रहार’च्या मुक्काम मोर्चात जिल्ह्यातील पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी झाले होते.

 

टॅग्स :AkolaअकोलाBacchu Kaduबच्चू कडू