शहरं
Join us  
Trending Stories
1
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
2
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
3
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
4
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
5
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
6
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
7
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
8
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
9
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
10
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
11
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
12
ED: बेटिंग ॲप प्रकरणी युवराज सिंग, रॉबिन उथप्पा यांची मालमत्ता जप्त; ईडीची मोठी कारवाई
13
“सत्य लपून राहत नाही, आता दुसरा मंत्रीही राजीनामा देणार”; उद्धव ठाकरेंचा रोख कुणाकडे?
14
'सेबीची कारवाई म्हणजे आर्थिक मृत्यूदंड' अवधूत साठेंच्या वकिलांचा 'सॅट'मध्ये युक्तिवाद; काय दिला निर्णय?
15
Anurag Dwivedi : २०० रुपयांपासून सुरुवात, आता कोट्यवधींची कमाई; ९ वर्षांत युट्यूबर अनुराग द्विवेदी कसा बनला धनकुबेर?
16
IND vs SL, U19 Asia Cup Semi Final 1 : वनडेत टी-२० ट्विस्ट! श्रीलंकेनं टीम इंडियासमोर ठेवलं १३९ धावांच लक्ष्य
17
राज ठाकरे एक्शन मोडवर! मनपा निवडणुकीपूर्वी शाखा भेटींवर जोर; २ दिवस मुंबई शहर पिंजून काढणार
18
राज आणि उद्धव ठाकरे मुंबईतील 'या' ११३ जागांवर विशेष लक्ष देणार, जागावाटपात ‘MaMu’ फॉर्म्युला वापरणार  
19
बाजारात पुन्हा 'बुल्स'चे पुनरागमन! सलग ४ दिवसांच्या घसरणीला ब्रेक; 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर्स
20
Viral Video: धैर्य आणि प्रसंगावधान! अचानक केसांनी पेट घेतला तरी शाळकरी मुलगी डगमगली नाही...
Daily Top 2Weekly Top 5

बायोगॅसवर अकोल्यात वीज निर्मिती प्रकल्प!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2020 18:33 IST

या प्रकल्पातून दररोज २४ युनिट वीज निर्मिती होत असल्याने विजेच्या बाबतीत हा विभाग स्वयंपूर्ण झाला आहे.

- राजरत्न सिरसाट

अकोला: डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने जैववायू (बायोगॅस)चे नवे तंत्रज्ञान विकसित केले असून, या बायोगॅसपासून कृषी विद्यापीठाच्या पशुसंवर्धन विभागात वीज निर्मितीचा प्रकल्प सुरू केला आहे. या प्रकल्पातून दररोज २४ युनिट वीज निर्मिती होत असल्याने विजेच्या बाबतीत हा विभाग स्वयंपूर्ण झाला आहे.डॉ. पंदेकृविच्या नवीन तंत्रज्ञानातून ३० टक्के जादा जैववायू निर्मिती केली जात आहे. गॅस सिलिंडर व रॉकेलला सक्षम पर्याय असलेल्या या तंत्रज्ञानाच्या प्रसारावर या कृषी विद्यापीठाने भर दिला असून, विविध प्रकारच्या जैववायू मॉडेल्सचा प्रचार व प्रसार करण्यात येत आहे. कौटुंबिक पद्धतीने उभारलेल्या जैववायू सयंत्रामध्ये गायी, बैल, म्हैस इत्यादी प्राण्यांच्या शेणाचा वापर करण्यात येतो. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने विकसित केलेल्या नवीन जैववायू सयंत्रामध्ये ओले शेण पाचन करण्याचे तंत्रज्ञान विकसित केल्याने हे सयंत्र वर्षभर कार्यरत राहून जैववायू, विजेची गरज पूर्ण करण्याचे काम करीत आहे. या सयंत्राचे डिझाइन, मूल्यांकन, तंत्रज्ञान, कुशलता आदींचे यशस्वी परीक्षण या कृषी विद्यापीठाच्या कृषी अभियांत्रिकी विभागाने केले आहे.

५० घनमीटरचे जनता बायोगॅसडॉ. पंदेकृविच्या अपारंपरिक ऊर्जा स्रोत आणि विद्युत अभियांत्रिकी विभागांतर्गत राष्टÑीय कृषी उच्च शिक्षण प्रकल्प, भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या माध्यमातून येथील पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय विभागाच्या प्रक्षेत्रावर ५० घनमीटरचे सुधारित जनता बायोगॅस सयंत्र बांधण्यात आले आहे. यात दररोज एक हजार किलो शेण वापरण्यात येत आहे. याला सहा किलो वॉटचे इंजीन आणि जनिंत्र लावण्यात आले आहे. याला आठ घनमीटर गॅस लागतो. पाच तास हे इंजीन चालते. प्रति तास सहा युनिट वीज यातून निर्माण होत असून, ही वीज गुराचे गोठे व या परिसरात वापरण्यात येत आहे. तीन एचपी पाण्याची मशीनही या बायोगॅसवर चालते. 

 या सुधारित सयंत्राचा धारणाकाळ सामान्य सयंत्रापेक्षा जास्त असल्यामुळे जैववायू उत्पादनात वाढ झाली आहे. या पाचीत मळी बाहेर येण्यासाठी संशोधन करण्यात आले आहे. सध्या दिवसाला २४ युनिट वीज निर्मिती होत आहे. कृषी विद्यापीठात हा पथदर्शक प्रकल्प असून, शेतकऱ्यांना माहिती देण्यात येत आहे. यातील शेण नंतर सेंद्रिय शेतीसाठी खत म्हणूनही वापरता येते.- डॉ. सुरेंद्र काळबांडे,विभाग प्रमुख,अपारंपरिक ऊर्जा स्रोत आणि विद्युत अभियांत्रिकी,डॉ.पंदेकृवि,अकोला.फोटो -

 

टॅग्स :AkolaअकोलाDr. Punjabrao Deshmukh Krushi Vidhyapithडॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ