शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

खासदार धोत्रे बाहेरगावी असल्याने समेटाचे अंदाज कोलमडले!

By atul.jaiswal | Updated: March 3, 2018 16:56 IST

अकोला : खासदार संजय धोत्रे हे कौटुंबिक सोहळ्यानिमित्त जिल्ह्याबाहेर असल्याने मुख्यमंत्र्यांच्या स्वागतासाठी विमानतळावर उपस्थित राहू शकले नाही. त्यामुळे उभय नेत्यांमधील समेट घडवून आणण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या प्रयत्नांवर पाणी फिरल्याची खमंग चर्चा शनिवारी अकोल्याच्या राजकीय वर्तुळात होती.

ठळक मुद्दे मुख्यमंत्र्यांच्या स्वागतासाठी विमानतळावर भाजप नेत्यांची मांदियाळी.खासदार संजय धोत्रे हे कौटुंबिक सोहळ्यानिमित्त जिल्ह्याबाहेर असल्याने मुख्यमंत्र्यांच्या स्वागतासाठी विमानतळावर उपस्थित राहू शकले नाही.उभय नेत्यांमधील समेट घडवून आणण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या प्रयत्नांवर पाणी फिरल्याची खमंग चर्चा शनिवारी अकोल्याच्या राजकीय वर्तुळात होती.

 

अकोला : बुलडाणा येथे एका कार्यक्रमाला उपस्थिती लावण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी औरंगाबाद मार्गे ठरलेल्या नियोजित दौºयात बदल करून अकोला मार्गे जाण्याचा निर्णय घेतल्यानंतर अकोला विमानतळावर ते गृह राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील आणि खासदार संजय धोत्रे यांच्यात समेट घडवून आणतील अशी अटकळ  बांधली जात होती.  परंतु, खासदार संजय धोत्रे हे कौटुंबिक सोहळ्यानिमित्त जिल्ह्याबाहेर असल्याने मुख्यमंत्र्यांच्या स्वागतासाठी विमानतळावर उपस्थित राहू शकले नाही. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यातील बदलाबाबत व्यक्त करण्यात येत असलेले राजकीय अंदाज सपशेल कोलमडले, दरम्यान, उभय नेत्यांमधील समेट घडवून आणण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या प्रयत्नांवर पाणी फिरल्याची खमंग चर्चा शनिवारी अकोल्याच्या राजकीय वर्तुळात होती.अकोल्याचे खासदार संजय धोत्रे व गृह राज्यमंत्री डॉ. रणजीत पाटील यांच्यातील कुरघोडीचे राजकारण जिल्ह्यासाठी नवीन नाही. काल-परवापर्यंत एक सीमारेषेपर्यंत मर्यादीत असलेली या दोन्ही नेत्यांमधील धूसफूस गुरुवारी डॉ. पाटील यांचे गाव असलेल्या घुंगशी येथील ग्रामपंचायत निवडणुकीतील वादाच्या निमित्ताने चव्हाट्यावर आली. डॉ. रणजीत पाटील यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी; अन्यथा १५ दिवसांनंतर आपण आपली भूमिका जाहीर करू, असा निवाणीर्चा इशारा  खासदार संजय धोत्रे यांनी दिला होता. होळीच्या एक दिवस घडलेल्या या राजकीय धुळवडीने या दोन नेत्यांमधील वादाचे विविध रंग समोर आले. या प्रकाराने गल्लीपासून दिल्लीपर्यंत सत्तेत असलेल्या भाजपमध्ये अस्वस्थता निर्माण झाली. दोन बड्या नेत्यांमधील संघर्षामुळे पक्षाची प्रतिमा मलिन होऊन त्यामुळे पक्षाचे नुकसान होऊ नये, यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उभय नेत्यांमध्ये समेट घडवून आणण्याचे ठरविले होते. शनिवारी बुलडाणा येथे भारतीय जैन संघटनेच्या महाराष्ट्र दुष्काळमुक्त अभियानाच्या उद्घाटनसाठी जाण्याकरीता औरंगाबाद मार्गे न जाता अकोला मार्गे जाऊन विमानतळावर खासदार संजय धोत्रे व डॉ. रणजीत पाटील यांच्याशी चर्चा करून दोघांमध्ये समेट घडवून आणावी, अशी मुख्यमंत्र्यांची योजना असून, त्यासाठीच त्यांनी दौºयात बदल करून घेतला होता, असे भाजपच्या अंतस्थ सूत्रांकडून समजले होते. शनिवारी, मुख्यमंत्र्यांचे विमान अकोला विमानतळावर उतरले त्यावेळी त्यांच्यासोबत केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी व इतर मान्यवर उपस्थित होते. या नेत्यांच्या स्वागतासाठी अकोल्यातील भाजपचे झाडून सारेच नेते व पदाधिकारी उपस्थित राहिले. डॉ. रणजीत पाटील, आमदार गोवर्धन शर्मा, आमदार रणधीर सावरकर, जिल्हाध्यक्ष तेजराव थोरात, महानगराध्यक्ष किशोर मांगटे पाटील, महापौर विजय अग्रवाल, उप महापौर वैशाली शेळके, माजी महापौर उज्ज्वला देशमुख, माजी आमदार नारायणराव गव्हाणकर, नगरसेवक गोपी ठाकरे,  जिल्हाधिकारी आस्तीककुमार पांडेय, उपविभागीय अधिकार प्रा. संजय खडसे आदींची उपस्थिती होती. यावेळी भाजप नेत्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. खासदार संजय धोत्रे हे मात्र कौटुंबिक कार्यक्रमामुळे जिल्ह्याबाहेर गेलेले असल्याने, ते मुख्यमंत्र्यांच्या स्वागतासाठी उपस्थित राहू शकले नाहीत. त्यामुळे डॉ. रणजित पाटील व संजय धोत्रे यांच्यात समेट घडवून आणण्याची मुख्यमंत्र्यांची योजना निष्फळ ठरल्याची चर्चा अकोल्यातील राजकीय वर्तुळात दिवसभर होती.

टॅग्स :AkolaअकोलाDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसSanjay Dhotreसंजय धोत्रेguardian ministerपालक मंत्री