शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: 'कोयता काढला अन्...'; पुण्यातील बिबवेवाडीत भररस्त्यात थरकाप उडवणारी घटना, व्हिडीओ व्हायरल
2
लईराई देवीच्या जत्रोत्सवात चेंगराचेंगरी; ६ भाविकांचा मृत्यू, ४० जण जखमी, उत्सवाला गालबोट
3
अक्षय्य तृतीयेला येणार होते, पण अजून ‘लाडकी बहीण’चे पैसे आले नाहीत; नेमका का होतोय उशीर?
4
"हेच कारण आहे पहलगाममध्ये जे झालं ते..," असं काय म्हणाला सोनू निगम; दाखल झाला FIR
5
५०० वर्षांनी गुरु अतिचारी गोचर: ६ राशींना लाभ, गुरु करेल मालामाल; अच्छे दिन येणार, शुभ घडणार!
6
मस्क यांच्या स्टारलिंक कंपनीचं पाकिस्तान-बांगलादेश कनेक्शन; भारतानं मागवली कामकाजाची माहिती, प्रकरण काय?
7
दहशतवाद्यांना पोसल्याचा पाकला त्रास; माझ्या आईला त्यांनीच गोळ्या घातल्या
8
पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या यु ट्यूब चॅनलवर भारतात बंदी, मंत्र्याचे X अकाऊंटही ब्लॉक
9
Home Loan: १५ लाखही वाचतील आणि ६० महिने आधीच होम लोनचं टेन्शन संपेल, कसं? जाणून घ्या
10
पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड पाकच; लष्कर, आयएसआय व आर्मीने रचला कट; एनआयएच्या अहवालात दावा
11
भारतीय सैन्यदलामध्ये व्यापक फेरबदल; पाकिस्तानला धडकी
12
Today Horoscope: आजचे राशीभविष्य, ३ मे २०२५: धनलाभ होऊन उत्पन्नात होईल वाढ
13
कांजूर डम्पिंग ग्राउंड बेकायदा, उच्च न्यायालयाचा राज्य सरकार, महापालिकेला झटका; तीन महिन्यांत जैसे थे करा
14
पाकला उत्तर देण्यासाठी गंगा एक्स्प्रेस-वेवरून झेपावतील लढाऊ विमाने; लँडिंग ड्रिल यशस्वी : देशाच्या संरक्षण तयारीत ऐतिहासिक टप्पा
15
विझिनजम बंदरामुळे आर्थिक प्रगती; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले उद्घाटन
16
चोंडीत ६०० व्हीव्हीआयपी, दोन हजार पाहुण्यांचा खास पाहुणचार; ६ मे रोजी मंत्रिमंडळाची पहिल्यांदा हाेणार बैठक
17
भारताविरुद्ध पाकिस्तानचे सायबर युद्ध, आठवडाभरात १० लाख हल्ले
18
उत्तरेत अवकाळीचा कहर; वादळात सापडून १० ठार; २०० विमानांना उशीर; राजस्थानात कुठे पाऊस तर कुठे उष्णतेची लाट
19
‘त्या’ बाळांच्या उपचारासाठी २४ लाख रुपये; बाळांचे वजन खूपच कमी, अतिदक्षता विभागात उपचार सुरू
20
भरपाईशिवाय जमीन ताब्यात घेण्याचे कृत्य बेकायदा; उच्च न्यायालयाची सरकारवर टीका

धान्य दुकानांत बियाणे मिळण्याची शक्यता धूसर

By admin | Updated: April 17, 2017 01:51 IST

शेकडो दुकानांपैकी केवळ दहा दुकानदारांचे अर्ज

सदानंद सिरसाट - अकोलास्वस्त धान्य दुकानदारांना प्रमाणित बी-बियाणे विक्री करण्याची संधी शासनाने दिली. त्यातून ग्रामीण भागातील गावांमध्येच शेतकऱ्यांना बियाणे मिळण्याची सोय होणार असताना, त्यासाठी जिल्ह्यातून केवळ नऊ दुकानदारांनी पुरवठा विभागाकडे अर्ज सादर केले. परवाना मिळण्याच्या प्रक्रियेबद्दल न सांगता पुरवठा विभागाने ते अर्ज थेट कृषी विभागाकडे पाठविल्याने त्यामध्ये कागदपत्रांच्या पूर्ततेचा गोंधळ वाढण्याची शक्यता आहे. ग्रामीण भागात सर्व सोयींचे ठिकाण म्हणून स्वस्त धान्य दुकानांमध्ये बी-बियाणे विक्रीसाठी शासनाने मंजुरी दिली आहे. त्यासाठी ३ मार्च २०१७ रोजी अन्न व नागरी पुरवठा विभागाने आदेश दिले. त्यामध्ये स्वस्त धान्य दुकानदारांना कृषी विभागाचा परवाना घेऊन हा व्यवसाय सुरू करण्याचे सांगितले; मात्र दुकानदारांनी थेट पुरवठा विभागाकडेच अर्ज सादर केले आहेत. त्यामध्ये मूर्तिजापूर तालुक्यातील नऊ दुकानदार आहेत. स्वस्त धान्य दुकानदारांनी आॅनलाइन धान्य वाटपाला विरोध केल्यानंतर त्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी शासनाने विविध व्यवसाय करण्यासाठी त्यांनी पर्याय उपलब्ध केले आहेत. त्यापैकी बी-बियाणे विक्रीचाही पर्याय आहे; मात्र जिल्ह्यात एकूण १०३६ स्वस्त धान्य दुकाने आहेत. त्यापैकी अकोला शहरातील १२७ च्या जवळपास दुकाने वगळता नऊशेपेक्षाही अधिक दुकानदारांना व्यवसायाची ही संधी आहे. कृषी विभागाच्या अटी व शर्तींचे पालन करून परवाना मिळण्यास किती पात्र आहेत, यावरच दुकानदारांचा या व्यवसायातील शिरकाव निश्चित होणार आहे. प्रस्ताव सादर करण्यातच गोंधळशासनाने अत्यंत त्रोटक स्वरूपात आदेश दिला आहे. त्यानुसार दुकानदारांनी पुरवठा विभागाकडेच अर्ज सादर करणे सुरू केले आहे. ज्यांच्याकडे स्वस्त धान्य दुकान आहे, त्यांनी कृषी विभागाकडून परवाना मिळण्यासाठी सर्व कागदपत्रांसह प्रस्ताव सादर करणे आवश्यक आहे. त्याऐवजी पुरवठा विभागाकडे प्राप्त अर्ज एकगठ्ठा पद्धतीने कृषी विभागात सादर केले आहेत. त्यातून कृषी विभागाचा गोंधळ वाढला आहे. परवान्यासाठी थेट प्रस्तावांची गरजस्वस्त धान्य दुकानदारांनी पुरवठा विभागामार्फत अर्ज केल्याने त्याबाबतचा पत्रव्यवहार त्या विभागाशी करावी की अर्जदारांशी, त्यावरून कृषी विभागाचे काम वाढणार आहे. त्यामुळे पुरवठा विभागाने अर्ज सादर केले तरी नमुन्यात आणि आवश्यक त्या कागदपत्रांसह प्रस्ताव आल्याशिवाय कृषी विभागाचा त्यावर निर्णयच होणार नसल्याची माहिती आहे. केवळ बी-बियाणे विक्रीचा परवाना शासनाने दुकानदारांना केवळ प्रमाणित बी-बियाणे विक्री करण्यास मंजुरी दिली आहे. त्या आधारावर कोणत्याही परिस्थितीत दुकानदारांना रासायनिक खते, कीटकनाशके, कीडनाशकांची विक्री करता येणार नाही. एक टक्का दुकानदारच तयारजिल्ह्यातील शहरी भाग वगळता नऊशेपेक्षाही अधिक स्वस्त धान्य दुकाने आहेत. त्या सर्वच दुकानदारांना बियाणे विक्रीचा परवाना मिळाल्यास शेतकऱ्यांची सोय होईल; मात्र गेल्या महिनाभरात केवळ नऊ दुकानदारांनी परवान्यासाठी अर्ज केले आहेत. हे प्रमाण केवळ एक टक्का आहे.अनेक गावांत कृषी सेवा केंद्राचीही भरमारस्वस्त धान्य दुकानदारांना व्यवसायाची संधी असली, तरी अनेक गावांमध्ये कृषी सेवा केंद्रांची संख्याही मोठी आहे. त्यांच्या स्पर्धेत स्वस्त धान्य दुकानदारांचा टिकाव लागेल का, या भीतीनेही दुकानदार अद्याप पुढे आलेले नाहीत.