शहरं
Join us  
Trending Stories
1
Tariff on Pharma: डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा तडाखा! औषधांवर १०० टक्के टॅरिफ, भारतीय कंपन्यांची चिंता वाढली
2
‘मला बळीचा बकरा बनवला जातोय’ सोनम वांगचूक यांचा आरोप; केंद्रीय गृहमंत्रालयाकडून कारवाई सुरूच
3
पंजाब राज्य एका हेक्टरला ५० हजार देते मग महाराष्ट्राने ८५०० का? ओमराजे निंबाळकरांचा सरकारला सवाल
4
मदतीच्या आड आता निकषांचा डोंगर! हातातोंडाशी आलेल्या पिकांचा चिखल, शेतीचे वाळवंट अन् हताश शेतकरी
5
आजचे राशीभविष्य- २६ सप्टेंबर २०२५, मान- सन्मान व प्राप्तीत वाढ होईल;वाद होण्याच्या शक्यतेमुळे वाणी संयमित ठेवा
6
मदत करा...मदत करा...! आपत्तीग्रस्तांचा नेत्यांसमोर टाहो, बांधावर फुटले अश्रूंचे बांध
7
का होतेय ढगफुटी..? दिवसा बाष्पीभवन वेगाने होतेय; ढग जमतात अन् रात्रीतून सुरू होतो कहर
8
मुंबई महानगरातील विकास कामांना ९५४ कोटींचा ‘बुस्टर’; MMRDA ला राज्य सरकारची मदत
9
PAK vs BAN: Live मॅचमध्ये कॉमेडी! दोन्हीं बॅटर स्ट्राइक एन्डला; तरी Run Out करायला नाही जमलं (VIDEO)
10
‘शक्ती’रूप! धावत्या रेल्वेतून मिसाइल लॉन्च; अशी कामगिरी करणारा भारत ठरला जगातील चौथा देश
11
पावसाने गावे खरडली, नेत्यांची धुंदी कधी उतरेल?; निदान पंधरा दिवस राजकारणाला फुलस्टॉप द्या
12
केवळ मुंबईच नव्हे, तर राज्यभर सर्वच शहरांमध्ये जाहिरात फलक (पुन्हा) कोसळण्याच्या आत जागे व्हा
13
भैरप्पा गेले, पण हे लेखनपर्व कधीच काळाच्या पडद्याआड जाणार नाही
14
एलएलबी ३ वर्षे अभ्यासक्रमासाठी यंदा विक्रमी प्रवेश; आतापर्यंत २२ हजार जणांनी प्रवेश घेतले
15
पिके पाण्यात, स्वप्न वाहून गेले; कर्जाचा फास कसा सोडवायचा, पुढे शेती करायला पैसा कुठून आणायचा?
16
एससी उपवर्गीकरणाचा निर्णय तीन महिन्यांत घेऊ; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
17
अवैध बांधकामांवर कारवाई न करणाऱ्या अधिकाऱ्यांची चौकशी का नाही केली?; हायकोर्टाचा एसआयटीला सवाल
18
Maharashtra Flood: “महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना पूर्ण मदत करावी, मदतकार्याला गती द्यावी”; राहुल गांधींचे आवाहन
19
लालबागचा राजा संकटात धावून आला; शेतकरी बांधव, पूरग्रस्तांना मंडळाकडून ५० लाखांची मदत घोषित
20
17 पैकी 12 जणांची मंत्रिमंडळातून होणार 'सुट्टी'! या राज्यात भाजप करणार मोठी 'सर्जरी'? मंत्रीपदासाठी या नव्या नावांची चर्चा!

धान्य दुकानांत बियाणे मिळण्याची शक्यता धूसर

By admin | Updated: April 17, 2017 01:51 IST

शेकडो दुकानांपैकी केवळ दहा दुकानदारांचे अर्ज

सदानंद सिरसाट - अकोलास्वस्त धान्य दुकानदारांना प्रमाणित बी-बियाणे विक्री करण्याची संधी शासनाने दिली. त्यातून ग्रामीण भागातील गावांमध्येच शेतकऱ्यांना बियाणे मिळण्याची सोय होणार असताना, त्यासाठी जिल्ह्यातून केवळ नऊ दुकानदारांनी पुरवठा विभागाकडे अर्ज सादर केले. परवाना मिळण्याच्या प्रक्रियेबद्दल न सांगता पुरवठा विभागाने ते अर्ज थेट कृषी विभागाकडे पाठविल्याने त्यामध्ये कागदपत्रांच्या पूर्ततेचा गोंधळ वाढण्याची शक्यता आहे. ग्रामीण भागात सर्व सोयींचे ठिकाण म्हणून स्वस्त धान्य दुकानांमध्ये बी-बियाणे विक्रीसाठी शासनाने मंजुरी दिली आहे. त्यासाठी ३ मार्च २०१७ रोजी अन्न व नागरी पुरवठा विभागाने आदेश दिले. त्यामध्ये स्वस्त धान्य दुकानदारांना कृषी विभागाचा परवाना घेऊन हा व्यवसाय सुरू करण्याचे सांगितले; मात्र दुकानदारांनी थेट पुरवठा विभागाकडेच अर्ज सादर केले आहेत. त्यामध्ये मूर्तिजापूर तालुक्यातील नऊ दुकानदार आहेत. स्वस्त धान्य दुकानदारांनी आॅनलाइन धान्य वाटपाला विरोध केल्यानंतर त्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी शासनाने विविध व्यवसाय करण्यासाठी त्यांनी पर्याय उपलब्ध केले आहेत. त्यापैकी बी-बियाणे विक्रीचाही पर्याय आहे; मात्र जिल्ह्यात एकूण १०३६ स्वस्त धान्य दुकाने आहेत. त्यापैकी अकोला शहरातील १२७ च्या जवळपास दुकाने वगळता नऊशेपेक्षाही अधिक दुकानदारांना व्यवसायाची ही संधी आहे. कृषी विभागाच्या अटी व शर्तींचे पालन करून परवाना मिळण्यास किती पात्र आहेत, यावरच दुकानदारांचा या व्यवसायातील शिरकाव निश्चित होणार आहे. प्रस्ताव सादर करण्यातच गोंधळशासनाने अत्यंत त्रोटक स्वरूपात आदेश दिला आहे. त्यानुसार दुकानदारांनी पुरवठा विभागाकडेच अर्ज सादर करणे सुरू केले आहे. ज्यांच्याकडे स्वस्त धान्य दुकान आहे, त्यांनी कृषी विभागाकडून परवाना मिळण्यासाठी सर्व कागदपत्रांसह प्रस्ताव सादर करणे आवश्यक आहे. त्याऐवजी पुरवठा विभागाकडे प्राप्त अर्ज एकगठ्ठा पद्धतीने कृषी विभागात सादर केले आहेत. त्यातून कृषी विभागाचा गोंधळ वाढला आहे. परवान्यासाठी थेट प्रस्तावांची गरजस्वस्त धान्य दुकानदारांनी पुरवठा विभागामार्फत अर्ज केल्याने त्याबाबतचा पत्रव्यवहार त्या विभागाशी करावी की अर्जदारांशी, त्यावरून कृषी विभागाचे काम वाढणार आहे. त्यामुळे पुरवठा विभागाने अर्ज सादर केले तरी नमुन्यात आणि आवश्यक त्या कागदपत्रांसह प्रस्ताव आल्याशिवाय कृषी विभागाचा त्यावर निर्णयच होणार नसल्याची माहिती आहे. केवळ बी-बियाणे विक्रीचा परवाना शासनाने दुकानदारांना केवळ प्रमाणित बी-बियाणे विक्री करण्यास मंजुरी दिली आहे. त्या आधारावर कोणत्याही परिस्थितीत दुकानदारांना रासायनिक खते, कीटकनाशके, कीडनाशकांची विक्री करता येणार नाही. एक टक्का दुकानदारच तयारजिल्ह्यातील शहरी भाग वगळता नऊशेपेक्षाही अधिक स्वस्त धान्य दुकाने आहेत. त्या सर्वच दुकानदारांना बियाणे विक्रीचा परवाना मिळाल्यास शेतकऱ्यांची सोय होईल; मात्र गेल्या महिनाभरात केवळ नऊ दुकानदारांनी परवान्यासाठी अर्ज केले आहेत. हे प्रमाण केवळ एक टक्का आहे.अनेक गावांत कृषी सेवा केंद्राचीही भरमारस्वस्त धान्य दुकानदारांना व्यवसायाची संधी असली, तरी अनेक गावांमध्ये कृषी सेवा केंद्रांची संख्याही मोठी आहे. त्यांच्या स्पर्धेत स्वस्त धान्य दुकानदारांचा टिकाव लागेल का, या भीतीनेही दुकानदार अद्याप पुढे आलेले नाहीत.