शहरं
Join us  
Trending Stories
1
Shiv Sena UBT MNS Alliance: सध्या मुंबईपुरती उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा, जागावाटपावर सस्पेन्स; इतर महापालिकांचे काय?
2
काँग्रेस-उद्धवसेनेचे फाटले! उद्धव ठाकरेंनी 'मविआ'च्या शक्यतांना दिला पूर्ण विराम, पवारांच्या राष्ट्रवादीबद्दल काय बोलले?
3
आता जर चुकाल तर संपाल, मराठी माणसांना आवाहन; उद्धवसेना-मनसे युतीची अधिकृत घोषणा
4
Vijay Hazare Trophy: कॅप्टनची वैभवपेक्षा जलद सेंच्युरी! बिहारनं ५७४ धावांसह सेट केला वर्ल्ड रेकॉर्ड
5
H-1B व्हिसा आता 'मेरिट'वर! १ लाख डॉलर अतिरिक्त फी अन् पगाराची अट; पाहा काय आहे नवीन नियम
6
Eclipse 2026: २०२६ मध्ये ४ ग्रहणांची मालिका, विशेषतः होळीला चंद्रग्रहण वेधणार जगाचं लक्ष?
7
"नेमके कशासाठी आज घालताय एकमेकांच्या गळ्यात गळे?"; युती होताच भाजपाचा खोचक सवाल
8
...म्हणून उद्धव आणि राज ठाकरेंनी जागावाटप, उमेदवार याबाबत काहीच घोषणा केली नाही; कारण सांगताच सगळे हसले
9
२६ डिसेंबरपासून आणखी एका कंपनीचा IPO उघडणार; आतापासून GMP ₹१२५ वर, कोणती आहे कंपनी?
10
Shiv Sena UBT & MNS Alliance: 'शिवतीर्थ'वर राज-उद्धव! बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर संपूर्ण ठाकरे कुटुंबाचं अभिवादन
11
शिवसेनेनं 'करून दाखवलं', मनसेचं 'इंजिन' घसरलं! पाहा, मागील दोन निवडणुकांमध्ये नेमकं काय घडलं?
12
अतिश्रीमंतांचा 'आक्रमक' गुंतवणुकीवर भर! 'या' क्षेत्रात लावतात ७०% पैसे; सोन्याकडे मात्र पाठ
13
IND W vs SL W: भारताच्या 'लेडी सेहवाग'चा मोठा पराक्रम; स्मृती मानधना, दिप्ती शर्मा, जेमिमालाही टाकलं मागं!
14
'आम्ही भारतातील सर्वात मोठे फरार', ललित मोदी आणि विजय मल्ल्या यांचा सरकारवर हल्लाबोल; व्हिडीओ व्हायरल
15
सोने-चांदी-हिरे काही कमी नाही, राममूर्ती घडवायला दिले ३० कोटी; अयोध्येतील राम मंदिराला भेट दिली
16
कुणीही एकत्र आले तरी मुंबईत भाजपाचा महापौर बसेल; मंत्री बावनकुळेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा
17
फास्ट फूडमुळे खरंच झाला विद्यार्थिनीचा मृत्यू? डॉक्टर आणि कुटुंबीयांनी सांगितलं धक्कादायक 'सत्य'
18
DCM शिंदे पोहोचले बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर; ठाकरे बंधूंच्या यूतीपूर्वी घडामोडींना वेग
19
बांग्लादेशात हिंदूंवरील अत्याचार वाढले; चिटगावमध्ये कट्टरतावाद्यांनी हिंदूंची घरे जाळली
20
Vijay Hazare Trophy स्पर्धेतील पहिल्याच सामन्यात वैभव सूर्यवंशीचा धमाका! वादळी शतकासह रचला इतिहास
Daily Top 2Weekly Top 5

स्वतंत्र पाणीपुरवठा योजनाही वांध्यात येण्याची शक्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2017 01:48 IST

अकोला : महान धरणातून ६४ खेडी योजनेचा पाणीपुरवठा बंद आहे. त्यामुळे आता भर पावसाळ्यात योजनेतील ५५ गावांना दगडपारवा धरण, सुकळी तलावाच्या स्रोतातून पाणी देण्याची शक्यता तपासली जात आहे. त्यासाठी मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत जिल्हा परिषद प्रशासन, वरिष्ठ भूवैज्ञानिकांना पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी आदेश दिले आहेत. दरम्यान जिल्ह्यातील ५३५ स्वतंत्र पाणीपुरवठा योजनांचे स्त्रोत अपुर्‍या पावसाअभावी कोरडे पडण्याचीही शक्यता निर्माण झाली आहे.  

ठळक मुद्देपाणीटंचाईवर नियोजन ‘६४ खेडी’साठी दगडपारवा, सुकळी तलावातून पाणी घेणार!स्वतंत्र पाणीपुरवठा योजनेने स्त्रोत आटण्याची शक्यता 

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : महान धरणातून ६४ खेडी योजनेचा पाणीपुरवठा बंद आहे. त्यामुळे आता भर पावसाळ्यात योजनेतील ५५ गावांना दगडपारवा धरण, सुकळी तलावाच्या स्रोतातून पाणी देण्याची शक्यता तपासली जात आहे. त्यासाठी मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत जिल्हा परिषद प्रशासन, वरिष्ठ भूवैज्ञानिकांना पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी आदेश दिले आहेत. दरम्यान जिल्ह्यातील ५३५ स्वतंत्र पाणीपुरवठा योजनांचे स्त्रोत अपुर्‍या पावसाअभावी कोरडे पडण्याचीही शक्यता निर्माण झाली आहे.  खारपाणपट्टय़ातील ५५ गावांना ६४ खेडी पाणीपुरवठा केला जातो; मात्र ही योजना आता बंद पडली आहे. त्यामुळे या गावात भर पावसाळ्यात पाण्यासाठी भटकण्याची वेळ आली आहे. त्याचवेळी जिल्हा परिषदेने या गावांना पाणीपुरवठा होण्यासाठी नदीपात्रातून पुरवठा करण्याचा विभागाचा प्रस्ताव जिल्हाधिकार्‍यांकडे सादर केला; मात्र नदीपात्रातून पाणी सोडताना नासाडी प्रचंड होणार आहे, त्यामुळे त्यावर कोणताच निर्णय झाला नाही. त्याचवेळी या गावांना पाणीपुरवठा कोठून करावा, ही समस्या कायम आहे. ग्रामीण भागात पाणीपुरवठय़ासाठी कुठेही हायड्रंट्सची सोय नाही. या समस्येवर पावसाळ्याच्या काळात उपाय करण्यासाठी सद्यस्थितीत दगडपारवा धरणातून पाणी घेण्याची तयारी आहे. धरणातील पाण्यावर महिनाभर योजना चालण्याची शक्यता आहे. त्यातही पुरवठय़ाचे नियोजन करावे लागेल. त्याशिवाय, सुकळी तलावात हायड्रंट्सची निर्मिती केली जाईल. त्यातून योजनेतील गावांना पुरवठा होईल. आणखी आठ दिवस पाऊस लांबल्यास ती उपाययोजना तातडीने करण्याचे आदेश पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी दिले. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस.रामामूर्ती, पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता किशोर ढवळे, वरिष्ठ भूवैज्ञानिक उपस्थित होते. 

स्वतंत्र पाणीपुरवठा योजनेने स्त्रोत आटण्याची शक्यता जिल्हय़ातील दोन मोठय़ा योजनांशिवाय तीन प्रादेशिक पाणीपुरवठा योजनांचीही स्थिती गंभीर होणार आहे. त्यामध्ये वझेगाव, लोहारा, कारंजा रमजानपूर योजनांचा समावेश आहे, तर ५३५ स्वतंत्र नळ पाणीपुरवठा योजनांपैकी ५0 टक्के स्रोत आटण्याची शक्यताही निर्माण झाली आहे. त्याचा फटका जिल्हय़ातील चार लाखांपेक्षाही अधिक लोकसंख्येला बसणार आहे. 

योजना बंद पडल्याने टंचाईग्रस्त गावेअकोला तालुक्यातील सांगवी खुर्द, गोपालखेड, वल्लभनगर, गांधीग्राम, सांगवी बुद्रूक, हिंगणा तामसवाडी, फरार्मदाबाद, निंभोरा, नवथळ, खेकडी, परितवाडा, पाळोदी, निराट, वैराट, गोत्रा, धामणा, राजापूर, बादलापूर, कंचनपूर, आगर, कासली बुद्रूक, कासली खुर्द, म्हातोडी, घुसर, अलिमाबाद, अनकवाडी, दापुरा, मारोडी, एकलारा, खोबरखेड, आपातापा, आखतवाडा, शामाबाद, सुलतान आजमपूर, आपोती बुद्रूक, आपोती खुर्द, अंबिकापूर, मजलापूर, जलालाबाद, गोणापूर, रामगाव, गोंदापूर, दहिगाव, पळसो खुर्द, धोतर्डी, सांगळूद खुर्द, वरोडी, वाकी, नावखेड, सांगळूद बुद्रूक, कौलखेड गोमासे, कौलखेड, लाखोंडा बुद्रूक, लाखोंडा खुर्द ही गावे टंचाईग्रस्त आहेत.