शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
2
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
3
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
4
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
5
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
6
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
7
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
8
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
9
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
10
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
11
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
12
घटस्फोटानंतर पुन्हा प्रेम? 'या' क्रिकेटपटूंच्या अफेरच्या सर्वत्र चर्चा!
13
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
14
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
15
650 KM रेंज, 15 मिनिटात चार्ज अन्...BYD ने लॉन्च केली नवीन सील Seal EV
16
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
17
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
18
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
19
टी२० मुंबई लीगसाठी आयकॉन खेळाडूंची घोषणा; यादीत सूर्यकुमार, श्रेयससह ८ भारतीय खेळाडू
20
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी

स्वतंत्र पाणीपुरवठा योजनाही वांध्यात येण्याची शक्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2017 01:48 IST

अकोला : महान धरणातून ६४ खेडी योजनेचा पाणीपुरवठा बंद आहे. त्यामुळे आता भर पावसाळ्यात योजनेतील ५५ गावांना दगडपारवा धरण, सुकळी तलावाच्या स्रोतातून पाणी देण्याची शक्यता तपासली जात आहे. त्यासाठी मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत जिल्हा परिषद प्रशासन, वरिष्ठ भूवैज्ञानिकांना पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी आदेश दिले आहेत. दरम्यान जिल्ह्यातील ५३५ स्वतंत्र पाणीपुरवठा योजनांचे स्त्रोत अपुर्‍या पावसाअभावी कोरडे पडण्याचीही शक्यता निर्माण झाली आहे.  

ठळक मुद्देपाणीटंचाईवर नियोजन ‘६४ खेडी’साठी दगडपारवा, सुकळी तलावातून पाणी घेणार!स्वतंत्र पाणीपुरवठा योजनेने स्त्रोत आटण्याची शक्यता 

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : महान धरणातून ६४ खेडी योजनेचा पाणीपुरवठा बंद आहे. त्यामुळे आता भर पावसाळ्यात योजनेतील ५५ गावांना दगडपारवा धरण, सुकळी तलावाच्या स्रोतातून पाणी देण्याची शक्यता तपासली जात आहे. त्यासाठी मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत जिल्हा परिषद प्रशासन, वरिष्ठ भूवैज्ञानिकांना पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी आदेश दिले आहेत. दरम्यान जिल्ह्यातील ५३५ स्वतंत्र पाणीपुरवठा योजनांचे स्त्रोत अपुर्‍या पावसाअभावी कोरडे पडण्याचीही शक्यता निर्माण झाली आहे.  खारपाणपट्टय़ातील ५५ गावांना ६४ खेडी पाणीपुरवठा केला जातो; मात्र ही योजना आता बंद पडली आहे. त्यामुळे या गावात भर पावसाळ्यात पाण्यासाठी भटकण्याची वेळ आली आहे. त्याचवेळी जिल्हा परिषदेने या गावांना पाणीपुरवठा होण्यासाठी नदीपात्रातून पुरवठा करण्याचा विभागाचा प्रस्ताव जिल्हाधिकार्‍यांकडे सादर केला; मात्र नदीपात्रातून पाणी सोडताना नासाडी प्रचंड होणार आहे, त्यामुळे त्यावर कोणताच निर्णय झाला नाही. त्याचवेळी या गावांना पाणीपुरवठा कोठून करावा, ही समस्या कायम आहे. ग्रामीण भागात पाणीपुरवठय़ासाठी कुठेही हायड्रंट्सची सोय नाही. या समस्येवर पावसाळ्याच्या काळात उपाय करण्यासाठी सद्यस्थितीत दगडपारवा धरणातून पाणी घेण्याची तयारी आहे. धरणातील पाण्यावर महिनाभर योजना चालण्याची शक्यता आहे. त्यातही पुरवठय़ाचे नियोजन करावे लागेल. त्याशिवाय, सुकळी तलावात हायड्रंट्सची निर्मिती केली जाईल. त्यातून योजनेतील गावांना पुरवठा होईल. आणखी आठ दिवस पाऊस लांबल्यास ती उपाययोजना तातडीने करण्याचे आदेश पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी दिले. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस.रामामूर्ती, पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता किशोर ढवळे, वरिष्ठ भूवैज्ञानिक उपस्थित होते. 

स्वतंत्र पाणीपुरवठा योजनेने स्त्रोत आटण्याची शक्यता जिल्हय़ातील दोन मोठय़ा योजनांशिवाय तीन प्रादेशिक पाणीपुरवठा योजनांचीही स्थिती गंभीर होणार आहे. त्यामध्ये वझेगाव, लोहारा, कारंजा रमजानपूर योजनांचा समावेश आहे, तर ५३५ स्वतंत्र नळ पाणीपुरवठा योजनांपैकी ५0 टक्के स्रोत आटण्याची शक्यताही निर्माण झाली आहे. त्याचा फटका जिल्हय़ातील चार लाखांपेक्षाही अधिक लोकसंख्येला बसणार आहे. 

योजना बंद पडल्याने टंचाईग्रस्त गावेअकोला तालुक्यातील सांगवी खुर्द, गोपालखेड, वल्लभनगर, गांधीग्राम, सांगवी बुद्रूक, हिंगणा तामसवाडी, फरार्मदाबाद, निंभोरा, नवथळ, खेकडी, परितवाडा, पाळोदी, निराट, वैराट, गोत्रा, धामणा, राजापूर, बादलापूर, कंचनपूर, आगर, कासली बुद्रूक, कासली खुर्द, म्हातोडी, घुसर, अलिमाबाद, अनकवाडी, दापुरा, मारोडी, एकलारा, खोबरखेड, आपातापा, आखतवाडा, शामाबाद, सुलतान आजमपूर, आपोती बुद्रूक, आपोती खुर्द, अंबिकापूर, मजलापूर, जलालाबाद, गोणापूर, रामगाव, गोंदापूर, दहिगाव, पळसो खुर्द, धोतर्डी, सांगळूद खुर्द, वरोडी, वाकी, नावखेड, सांगळूद बुद्रूक, कौलखेड गोमासे, कौलखेड, लाखोंडा बुद्रूक, लाखोंडा खुर्द ही गावे टंचाईग्रस्त आहेत.