शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?...
2
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
3
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
4
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
5
Maharashtra Nagaradhyaksha Winners List: महाराष्ट्रातील २४६ नगरपरिषदांमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
6
Muktainagar Nagar Panchayat Election Result 2025: “रक्षा खडसे भाजपात एकाकी पडल्या”; मुक्ताईनगरातील शिंदेसेनेच्या विजयानंतर एकनाथ खडसेंचा दावा
7
"पैसे भरा, मृतदेह न्या", पोटच्या पोरासाठी बापाने मागितली भीक; घर गहाण ठेवलं, कर्ज काढलं, पण...
8
धारुरमध्ये हे काय घडलं? भाजपचे सर्व उमेदवार आपटले...! पंकजा मुंडे यांना मोठा धक्का, म्हणाल्या...
9
रेल्वे प्रवासासाठी आता मोजावे लागणार जादा पैसे! जास्त सामान नेण्यावरही अतिरिक्त शुल्क लागू होणार
10
Sangamner Nagar Parishad Election Result 2025: संगमनेरमध्ये पुन्हा 'तांबे-थोरात' पॅटर्न; डॉ. मैथिली तांबे महाराष्ट्रात सर्वाधिक मताधिक्याने विजयी
11
Khed Nagar Parishad Election Result 2025: “कोकणातील विजय हा मुंबई मनपा विजयाची नांदी”; एकनाथ शिंदे यांच्या शिलेदाराचे मोठे भाकित
12
एका आठवड्यात चांदी १६ हजारांनी महागली; वर्षात दिला १२६% परतावा, सोन्याची काय स्थिती?
13
Amul: नोकरीची चिंता सोडा आणि स्वतःच मालक व्हा! अमूलसोबत दरमहा कमवा १.५ लाख रुपये, कसे?
14
IND vs PAK U19 Asia Cup: कोण आहे Sameer Minhas? ज्यानं दोन वेळा मोडला वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड
15
सावधान! तुमचं बँक खातंही होऊ शकतं रिकामं! आधार कार्ड सुरक्षित ठेवण्यासाठी करा 'बायोमॅट्रिक लॉक'
16
Maharashtra Election Results 2025: भाजपाचं 'शतक', ठाकरेसेना सगळ्यात मागे; सर्वाधिक नगराध्यक्ष कुणाचे? शिंदे-अजितदादांमध्ये 'टफ फाइट'
17
Loha Nagar Parishad Election Result 2025: लोह्यात भाजपाला घराणेशाहीचा मोठा फटका; एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव
18
'आता तरी आपली लायकी ओळखावी' ; परळीतील विजयानंतर धनंजय मुंडेंची खा. सोनवणेंवर टीका
19
भोकरदनमध्ये दानवे पिता-पुत्रांना मोठा धक्का, शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या समरीन मिर्जा विजयी; भाजपला किती जागा मिळाल्या? 
20
Nitesh Rane: निवडणुका संपल्या, आता...; सिंधुदुर्गातील निकाल स्पष्ट होताच नितेश राणे म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

लोकसंख्या पाच लाखांवर, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था मात्र गॅसवर; शहर बससेवा चार वर्षांपासून बंद

By atul.jaiswal | Updated: July 10, 2023 17:59 IST

पश्चिम विदर्भातील महत्त्वाचे शहर असलेल्या अकोल्याचा गत काही वर्षांत झपाट्याने विस्तार झाला.

अकोला : छोट्याशा शहराचा विस्तार होऊन महानगरात रूपांतर झालेल्या अकोल्याची लोकसंख्या आज रोजी ५ लाखांपेक्षाही अधिक झाली असली तरी स्थानिक प्रशासनाला अजूनही दर्जेदार सार्वजनिक वाहतूक व्यवस्था उभारता आली नाही. महानगरपालिकेची शहर बससेवा गत चार वर्षांपासून बंद असल्याने स्वत:चे वाहन वापरणे किंवा ऑटोरिक्षाची कास धरण्याशिवाय दुसरा पर्यायच नागरिकांपुढे नसल्याने त्यांच्या खिशाला नाहक कात्री लागत आहे. 

पश्चिम विदर्भातील महत्त्वाचे शहर असलेल्या अकोल्याचा गत काही वर्षांत झपाट्याने विस्तार झाला. महानगरपालिकेची हद्दवाढ होऊन लगतच्या २४ गावांचा शहरात समावेश करण्यात आला. परिणामी, शहराच्या भौगोलिक क्षेत्रासोबतच व लोकसंख्येतही भर पडली. शहरातील नागरिकांना वाहतूक व्यवस्था म्हणून महापालिकेने २००४ मध्ये शहर बससेवा सुरू केली होती. एका स्थानिक संस्थेने कंत्राट घेऊन काही वर्षे ही सेवा सुरळीत चालू ठेवली. त्यानंतर मात्र संस्था अवसायनात निघाल्यामुळे बससेवा कोलमडली. अखेर २०१३ मध्ये शहर वाहतूक सेवा बंद झाली. त्यानंतर तत्कालीन मनपा आयुक्त अजय लहाने यांनी २०१७ मध्ये पुन्हा शहर बससेवा सुरू केली. श्रीकृपा ट्रॅव्हल्स नामक कंपनीने १५ ते २० गाड्यांच्या मदतीने शहर बससेवा सुरू केली, मात्र कंपनीच्या संचालकांनी बँकेच्या कर्जाचे कारण पुढे करत ही सेवा पुढे सुरू ठेवण्यात असमर्थतता दर्शविली. त्यामुळे जून २०१९ मध्ये शहर बससेवा बंद पडली. त्यानंतर २०२१ मध्ये शहर बससेवा पुन्हा सुरू करण्याचे प्रयत्न करण्यात आले; परंतु त्याला यश न आल्यामुळे अकोलेकर अजूनही सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेपासून वंचितच आहेत.

सात किलोमीटरसाठी ४० रुपयेशहरातील विविध मार्गांवर सिटी बससेवा सुरू होती, तेव्हा नागरिकांना शहराच्या एका कोपऱ्यातून दुसऱ्या कोपऱ्यापर्यंत जाण्यासाठी १० ते २० रुपयांपेक्षा अधिक खर्च करावा लागत नव्हता. आता मात्र ही सेवा बंद झाल्यापासून ऑटोरिक्षाचालकांनी मनमानी करत दर वाढविले आहेत. रेल्वे स्थानकावरून बसस्थानक एक टप्पा व बसस्थानकावरून वेगवेगळे नगर हा दुसरा टप्पा, असे दोन टप्प्याचे एका प्रवाशाकडून ४० रुपये घेतले जातात. शहरात सात ते आठ किलोमीटरच्या प्रवासासाठी ४० रुपये मोजावे लागत असल्याने ग्राहकांच्या खिशाला कात्री लागत आहे.

टॅग्स :Akolaअकोला