शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
3
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
4
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
5
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
6
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
7
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
8
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
9
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
10
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
11
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
12
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
13
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
14
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
15
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
16
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
17
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश
18
खंडाळ्यात जुन्या वैमनस्यातून दोन गटात हिंसक हाणामारी; एकाचा मृत्यू, दोन जण जखमी
19
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
20
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI

लोकसंख्या पाच लाखांवर, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था मात्र गॅसवर; शहर बससेवा चार वर्षांपासून बंद

By atul.jaiswal | Updated: July 10, 2023 17:59 IST

पश्चिम विदर्भातील महत्त्वाचे शहर असलेल्या अकोल्याचा गत काही वर्षांत झपाट्याने विस्तार झाला.

अकोला : छोट्याशा शहराचा विस्तार होऊन महानगरात रूपांतर झालेल्या अकोल्याची लोकसंख्या आज रोजी ५ लाखांपेक्षाही अधिक झाली असली तरी स्थानिक प्रशासनाला अजूनही दर्जेदार सार्वजनिक वाहतूक व्यवस्था उभारता आली नाही. महानगरपालिकेची शहर बससेवा गत चार वर्षांपासून बंद असल्याने स्वत:चे वाहन वापरणे किंवा ऑटोरिक्षाची कास धरण्याशिवाय दुसरा पर्यायच नागरिकांपुढे नसल्याने त्यांच्या खिशाला नाहक कात्री लागत आहे. 

पश्चिम विदर्भातील महत्त्वाचे शहर असलेल्या अकोल्याचा गत काही वर्षांत झपाट्याने विस्तार झाला. महानगरपालिकेची हद्दवाढ होऊन लगतच्या २४ गावांचा शहरात समावेश करण्यात आला. परिणामी, शहराच्या भौगोलिक क्षेत्रासोबतच व लोकसंख्येतही भर पडली. शहरातील नागरिकांना वाहतूक व्यवस्था म्हणून महापालिकेने २००४ मध्ये शहर बससेवा सुरू केली होती. एका स्थानिक संस्थेने कंत्राट घेऊन काही वर्षे ही सेवा सुरळीत चालू ठेवली. त्यानंतर मात्र संस्था अवसायनात निघाल्यामुळे बससेवा कोलमडली. अखेर २०१३ मध्ये शहर वाहतूक सेवा बंद झाली. त्यानंतर तत्कालीन मनपा आयुक्त अजय लहाने यांनी २०१७ मध्ये पुन्हा शहर बससेवा सुरू केली. श्रीकृपा ट्रॅव्हल्स नामक कंपनीने १५ ते २० गाड्यांच्या मदतीने शहर बससेवा सुरू केली, मात्र कंपनीच्या संचालकांनी बँकेच्या कर्जाचे कारण पुढे करत ही सेवा पुढे सुरू ठेवण्यात असमर्थतता दर्शविली. त्यामुळे जून २०१९ मध्ये शहर बससेवा बंद पडली. त्यानंतर २०२१ मध्ये शहर बससेवा पुन्हा सुरू करण्याचे प्रयत्न करण्यात आले; परंतु त्याला यश न आल्यामुळे अकोलेकर अजूनही सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेपासून वंचितच आहेत.

सात किलोमीटरसाठी ४० रुपयेशहरातील विविध मार्गांवर सिटी बससेवा सुरू होती, तेव्हा नागरिकांना शहराच्या एका कोपऱ्यातून दुसऱ्या कोपऱ्यापर्यंत जाण्यासाठी १० ते २० रुपयांपेक्षा अधिक खर्च करावा लागत नव्हता. आता मात्र ही सेवा बंद झाल्यापासून ऑटोरिक्षाचालकांनी मनमानी करत दर वाढविले आहेत. रेल्वे स्थानकावरून बसस्थानक एक टप्पा व बसस्थानकावरून वेगवेगळे नगर हा दुसरा टप्पा, असे दोन टप्प्याचे एका प्रवाशाकडून ४० रुपये घेतले जातात. शहरात सात ते आठ किलोमीटरच्या प्रवासासाठी ४० रुपये मोजावे लागत असल्याने ग्राहकांच्या खिशाला कात्री लागत आहे.

टॅग्स :Akolaअकोला