शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
5
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
6
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
7
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
8
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
9
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
10
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
11
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
12
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
13
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
14
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
15
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
16
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
17
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
18
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
19
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
20
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून

शिधापत्रिका नसलेल्या गरिबांना हवे धान्याचे कवच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2020 14:25 IST

जिल्ह्यातील गरीब कुटुंबांना रास्त भावाच्या धान्याचे कवच देण्याची मागणी होत आहे.

- संतोष येलकर लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी शासनामार्फत ‘लॉकडाउन’ जाहीर करण्यात आले असून, गोरगरीब मजुरांच्या हाताला काम नाही आणि सार्वजनिक वितरण व्यवस्था अंतर्गत शिधापत्रिका नसल्याने धान्य मिळत नाही. त्यामुळे पोटाची खळगी भरणार तरी कशी, असा प्रश्न शिधापत्रिका नसलेल्या गरीब कुटुंबांसमोर निर्माण झाला आहे. त्यानुषंगाने शिधापत्रिका नसलेल्या जिल्ह्यातील गरीब कुटुंबांना रास्त भावाच्या धान्याचे कवच देण्याची मागणी होत आहे. लॉकडाउनच्या कालावधीत शासनामार्फत सार्वजनिक वितरण व्यवस्था अंतर्गत राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजना अंतर्गत प्राधान्य गटातील शिधापत्रिकाधारक लाभार्थी आणि अंत्योदय अन्न योजना अंतर्गत शिधापत्रिकाधारक लाभार्थींना दरमहा वितरित करण्यात येत असलेल्या धान्यासह एप्रिल, मे व जून या तीन महिन्यांच्या कालावधीत प्रत्येक लाभार्थीला दरमहा ५ किलो मोफत तांदूळ वितरित करण्यात येत आहे. यासोबतच केशरी शिधापत्रिकाधारकांनाही मे व जून या दोन महिन्यांच्या कालावधीत सवलतीच्या दरात धान्य वितरित करण्यात येणार आहे; परंतु अकोला शहरासह जिल्ह्यात अनेक गरीब, मजूर कुटुंबांकडे शिधापत्रिका नाहीत. जवळ पैसा नाही आणि शिधापत्रिका नसल्याने रास्त भाव दुकानांमधून धान्य मिळत नाही. त्यामुळे जिल्ह्यातील शिधापत्रिका नसलेल्या गरीब कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे. त्या अनुषंगाने जिल्ह्यातील शिधापत्रिका नसलेल्या गरीब व गरजू कुटुंबांना सार्वजनिक वितरण व्यवस्था अंतर्गत रास्त भाव दुकानांमधून धान्याचे वितरण करण्यासंदर्भात उपाययोजनेची गरज असल्याची मागणी होत आहे.

अकोला शहरासह जिल्ह्यातील अनेक गरीब कुटुंबांकडे पत्रिका नाहीत. लॉकडाउनच्या परिस्थितीत जिल्ह्यातील शिधापत्रिका नसलेल्या गरीब व गरजू कुटुंबांना सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत धान्य वितरित करण्याची गरज आहे .- शत्रुघ्न मुंडे, जिल्हाध्यक्ष,      

  रास्त भाव दुकानदार संघटना 

जिल्ह्यात शिधापत्रिका नसलेल्या गरीब व गरजू कुटुंबांना धान्य वितरित करण्यासाठी पाययोजना प्रस्तावित आहे.- बी.यू. काळे, जिल्हा पुरवठा अधिकारी

टॅग्स :Akolaअकोला