शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
2
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
3
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
4
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
5
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
6
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
7
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
8
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
9
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
10
आता उपराजधानीत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थ, १२० कोटींचा निधी मंजूर
11
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
12
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
13
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
14
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
15
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
16
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
17
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
18
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
19
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
20
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

तेल्हारा तालुक्यातील रस्त्यांची दुरवस्था; वाहनचालकांची कसरत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2021 04:23 IST

प्रशांत विखे तेल्हारा: तालुक्यातील ग्रामीण भागासह शहराला जोडणाऱ्या सर्वच मुख्य रस्त्यांची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. रस्त्यांच्या कामाकरिता दोन ...

प्रशांत विखे

तेल्हारा: तालुक्यातील ग्रामीण भागासह शहराला जोडणाऱ्या सर्वच मुख्य रस्त्यांची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. रस्त्यांच्या कामाकरिता दोन महिन्यांपूर्वी विशाल नांदोकार या युवकाने बेमुदत उपोषण केले होते. पाच दिवसांनंतर पालकमंत्री बच्चू कडू यांनी उपोषणस्थळी भेट देऊन उपोषणकर्त्यास तीन दिवसांत काम सुरु करण्याचे आश्वासन दिले होते; मात्र दोन महिने उलटूनही अद्याप रस्त्याला सुरुवात झाली नाही. त्यामुळे शुक्रवार, दि.३ सप्टेंबर रोजी रस्ता देखरेख समितीने तहसीलदारांमार्फत पालकमंत्र्यांना निवेदन देऊन रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी केली आहे. येत्या आठ दिवसात कामाला सुरुवात न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही रस्ता देखरेख समितीने निवेदनातून दिला आहे.

रखडलेल्या विकासकामांमुळे शहराला जोडणाऱ्या चारही बाजूंच्या रस्त्यांवर मोठमोठ्या खड्ड्यांमुळे झालेल्या अपघातात १२ जणांना जीव गमवावा लागला असून, अनेकांना अपंगत्व आले आहे. रस्त्यावर टाकण्यात आलेल्या पिवळ्या मातीमुळे पावसाळ्यात वाहन घसरून अपघात घडत आहेत, तर वाहनचालकास वाहन चालविताना कसरत करावी लागत आहे. रस्त्यावरील धुळीमुळे अनेकांना आजार जडत आहेत. खड्डेमय रस्त्यांमुळे अनेकांची वाहने तसेच एसटी महामंडळाच्या बसेस सुद्धा खिळखिळ्या झाल्या आहेत. रस्त्याचे काम त्वरित सुरू करण्याची मागणी करीत रस्ता देखरेख समितीने निवेदन दिले आहे. निवेदनावर रस्ता देखरेख समितीचे विशाल नांदोकार, सचिन थाटे, डॉ. शहेजाद खान, आनंद राठी, दादा टोहरे, उज्वल दबडघाव, प्रवीण पोहरकार, गजानन गायकवाड, रामभाऊ फाटकर, स्वप्नील फोकमारे, धीरज बजाज, आशिष जयस्वाल यांच्या सह्या आहेत.

---------

पालकमंत्र्यांनी दिलेले आश्वासन फोल ठरले

रस्त्यांची कामे विनाविलंब सुरू व्हावी, अशी मागणी करीत अनेकांनी आंदोलने केली. विशाल नांदोकार या युवकाने काही दिवसांपूर्वी बेमुदत उपोषण केले होते. हे उपोषण सोडविण्यासाठी पालकमंत्री बच्चू कडू यांनी उपोषणस्थळी जाऊन रस्त्याचे काम लवकरच सुरू होणार, असे आश्वासन दिले होते. या संदर्भात संबंधित कंत्राटदारांना तसे आदेश सुद्धा दिले होते, परंतु, आश्वासन दिल्यानंतर संबंधित कंत्राटदारांनी कुठल्याही प्रकारचे ठोस काम केलेले दिसून येत नाही. त्यामुळे आजही रस्त्यांची परिस्थिती ‘जैसे थे’ आहे.

--------------

आठ दिवसात रस्त्यांचे काम सुरू करा

रस्ता देखरेख समितीने तहसीलदारांना निवेदन देऊन आठ दिवसांच्या आत रस्त्यांचे काम सुरू करण्याची मागणी केली आहे. काम सुरू न झाल्यास रस्ता देखरेख समितीच्या वतीने नागरिकांना सोबत घेऊन तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे. आंदोलनादरम्यान काही अनुचित प्रकार घडल्यास त्याला सर्वस्वी शासन जबाबदार राहणार, असाही निवेदनातून इशारा दिला आहे.

-------------