शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
3
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
4
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
5
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
6
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
7
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
8
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
9
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
10
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
11
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
12
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
13
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
14
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
15
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
16
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
17
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
18
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
19
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

तेल्हारा तालुक्यातील रस्त्यांची दुरवस्था; वाहनचालकांची कसरत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2021 04:23 IST

प्रशांत विखे तेल्हारा: तालुक्यातील ग्रामीण भागासह शहराला जोडणाऱ्या सर्वच मुख्य रस्त्यांची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. रस्त्यांच्या कामाकरिता दोन ...

प्रशांत विखे

तेल्हारा: तालुक्यातील ग्रामीण भागासह शहराला जोडणाऱ्या सर्वच मुख्य रस्त्यांची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. रस्त्यांच्या कामाकरिता दोन महिन्यांपूर्वी विशाल नांदोकार या युवकाने बेमुदत उपोषण केले होते. पाच दिवसांनंतर पालकमंत्री बच्चू कडू यांनी उपोषणस्थळी भेट देऊन उपोषणकर्त्यास तीन दिवसांत काम सुरु करण्याचे आश्वासन दिले होते; मात्र दोन महिने उलटूनही अद्याप रस्त्याला सुरुवात झाली नाही. त्यामुळे शुक्रवार, दि.३ सप्टेंबर रोजी रस्ता देखरेख समितीने तहसीलदारांमार्फत पालकमंत्र्यांना निवेदन देऊन रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी केली आहे. येत्या आठ दिवसात कामाला सुरुवात न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही रस्ता देखरेख समितीने निवेदनातून दिला आहे.

रखडलेल्या विकासकामांमुळे शहराला जोडणाऱ्या चारही बाजूंच्या रस्त्यांवर मोठमोठ्या खड्ड्यांमुळे झालेल्या अपघातात १२ जणांना जीव गमवावा लागला असून, अनेकांना अपंगत्व आले आहे. रस्त्यावर टाकण्यात आलेल्या पिवळ्या मातीमुळे पावसाळ्यात वाहन घसरून अपघात घडत आहेत, तर वाहनचालकास वाहन चालविताना कसरत करावी लागत आहे. रस्त्यावरील धुळीमुळे अनेकांना आजार जडत आहेत. खड्डेमय रस्त्यांमुळे अनेकांची वाहने तसेच एसटी महामंडळाच्या बसेस सुद्धा खिळखिळ्या झाल्या आहेत. रस्त्याचे काम त्वरित सुरू करण्याची मागणी करीत रस्ता देखरेख समितीने निवेदन दिले आहे. निवेदनावर रस्ता देखरेख समितीचे विशाल नांदोकार, सचिन थाटे, डॉ. शहेजाद खान, आनंद राठी, दादा टोहरे, उज्वल दबडघाव, प्रवीण पोहरकार, गजानन गायकवाड, रामभाऊ फाटकर, स्वप्नील फोकमारे, धीरज बजाज, आशिष जयस्वाल यांच्या सह्या आहेत.

---------

पालकमंत्र्यांनी दिलेले आश्वासन फोल ठरले

रस्त्यांची कामे विनाविलंब सुरू व्हावी, अशी मागणी करीत अनेकांनी आंदोलने केली. विशाल नांदोकार या युवकाने काही दिवसांपूर्वी बेमुदत उपोषण केले होते. हे उपोषण सोडविण्यासाठी पालकमंत्री बच्चू कडू यांनी उपोषणस्थळी जाऊन रस्त्याचे काम लवकरच सुरू होणार, असे आश्वासन दिले होते. या संदर्भात संबंधित कंत्राटदारांना तसे आदेश सुद्धा दिले होते, परंतु, आश्वासन दिल्यानंतर संबंधित कंत्राटदारांनी कुठल्याही प्रकारचे ठोस काम केलेले दिसून येत नाही. त्यामुळे आजही रस्त्यांची परिस्थिती ‘जैसे थे’ आहे.

--------------

आठ दिवसात रस्त्यांचे काम सुरू करा

रस्ता देखरेख समितीने तहसीलदारांना निवेदन देऊन आठ दिवसांच्या आत रस्त्यांचे काम सुरू करण्याची मागणी केली आहे. काम सुरू न झाल्यास रस्ता देखरेख समितीच्या वतीने नागरिकांना सोबत घेऊन तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे. आंदोलनादरम्यान काही अनुचित प्रकार घडल्यास त्याला सर्वस्वी शासन जबाबदार राहणार, असाही निवेदनातून इशारा दिला आहे.

-------------