शहरं
Join us  
Trending Stories
1
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
2
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
3
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
4
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
5
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
6
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
7
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
8
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
9
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
10
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
11
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
12
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
13
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
14
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
15
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
16
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
17
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
18
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
19
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
20
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 

एकात्मिक रस्ते विकास प्रकल्पातील पूल अधांतरी

By admin | Updated: May 24, 2014 01:10 IST

अकोला शहराच्या लोकसंख्येत दिवसेंदिवस वाढ होत असली तरी पायाभूत सुविधा निर्माण करण्यात महापालिका प्रशासनाला अपयश आल्याचे चित्र आहे. अरुंद रस्ते, वाहनांची बेसुमार वाढलेली संख्या, ऑटो-रिक्षा चालकांनी गुंडाळून ठेवलेले वाहतुकीचे नियम आदी प्रकार लक्षात घेतल्यास शहरातून प्रवास करणे असुरक्षित झाले आहे.

अकोला : शहराच्या लोकसंख्येत दिवसेंदिवस वाढ होत असली तरी पायाभूत सुविधा निर्माण करण्यात महापालिका प्रशासनाला अपयश आल्याचे चित्र आहे. अरुंद रस्ते, वाहनांची बेसुमार वाढलेली संख्या, ऑटो-रिक्षा चालकांनी गुंडाळून ठेवलेले वाहतुकीचे नियम आदी प्रकार लक्षात घेतल्यास शहरातून प्रवास करणे असुरक्षित झाले आहे.

या समस्यांवर मात करण्यासाठी सन २००७-०८ मध्ये एकात्मिक रस्ते विकास प्रकल्प मंजूर करण्यात आला. प्रकल्पात मोर्णा नदीवरील दोन पुलांचा समावेश होता; परंतु भूमिगत गटार योजनेमुळे रस्ते विकास प्रकल्प रखडल्याने वाहतुकीची समस्या कायम असल्याची वस्तुस्थिती आहे.महापालिका क्षेत्रात जुने शहर आणि नवीन शहर, अशी विभागणी आपसुकच झाली आहे. जुने शहरात जाण्यासाठी महाराणा प्रताप बागेजवळील लोखंडी पूल तसेच दगडी पुलाचा वापर केला जातो. या दोन्ही पुलावरून जाताच जुने शहरात अरुंद रस्ते, चिंचोळ्या गल्ल्यातून वाहनधारकांना प्रवास करावा लागतो. मागील पंधरा वर्षांमध्ये लोकसंख्येत वाढ झाल्याने वाहनधारकांची संख्यासुद्धा वाढली आहे. दोन्ही पूल वाढत्या गर्दीसाठी पुरेसे नसल्याने सन २००८ मध्ये मंजूर झालेल्या एकात्मिक रस्ते विकास प्रकल्पात दोन पुलांचा समावेश करण्यात आला. बांधा, वापरा आणि हस्तांतरित करा, या निकषावर १५० कोटींची योजना मंजूर झाली. यापैकी पहिल्या टप्प्यात ८७ कोटी मंजूर झाले. यामध्ये शहरात प्रशस्त रस्ते, फुटपाथ, नाले-गटार बांधणे, दोन उड्डाण पूल, मोर्णा नदीवर दोन पूल आदींसह विविध कामांचा समावेश होता. योजनेच्या कामाची जबाबदारी शासनाने सार्वजनिक बांधकाम विभागाकडे दिली. त्यानुषंगाने शहराचा प्रकल्प अहवालसुद्धा तयार करण्यात आला होता; परंतु त्यानंतर भूमिगत गटार योजना मंजूर होताच, एकात्मिक रस्ते विकास प्रकल्पाला बाजूला सारण्यात आले. भूमिगत गटार योजनेत शहरात तब्बल साडेचारशे किलोमीटरपर्यंत खोदकाम होणार असल्याने रस्त्यांचे संभाव्य नुकसान टाळण्यासाठी रस्ते विकास प्रकल्प थंडबस्त्यात आहे. यामुळे जुने शहराला जोडणारे दोन पूलदेखील अधांतरी सापडले. परिणामी आजही नागरिकांना विस्कळीत वाहतुकीचा व गर्दीचा प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.