शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC Exam 2025: विद्यार्थ्यांच्या मागणीला यश, एमपीएससी परीक्षा पुढे ढकलली! आयोगाकडून नवीन तारीख जाहीर
2
“६०० कोटींचा फंड, लोक मरत होते, पण एक पैसा खर्च केला नाही”; CM फडणवीसांचा ठाकरेंवर हल्लाबोल
3
'मोदी-पुतीन यांच्यात चर्चा नाही, नाटो प्रमुख खोटं बोलताहेत'; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटलं, "बोलताना जरा..."
4
"मंत्र्यांच्या दौऱ्यामुळे सरकारचे पंचनाम्याऐवजी राजशिष्टाचाराकडे लक्ष"; शरद पवारांनी शासनाला दिला सल्ला
5
VIDEO: पाकिस्तानच्या मंत्र्यांची 'आंतरराष्ट्रीय' फजिती, AI वर भाषण देताना अनेक उच्चार चुकले
6
“ओबीसी आरक्षण टिकवण्यासाठी आम्ही प्रयत्नांची पराकाष्ठा करणार आहोत, विजय मिळवणार”: छगन भुजबळ
7
PM मोदींशी १ तास नेमकी काय चर्चा झाली? CM फडणवीसांनी दिली सगळी माहिती; म्हणाले, “कर्जमाफी...”
8
“CM फडणवीसांनी शेतकऱ्यांसाठी दिल्लीतून भरीव पॅकेज घेऊनच यावे, अन्यथा तेथेच थांबावे”: सपकाळ
9
PPF, SSY आणि SCSS च्या व्याजदरांमध्ये वाढ होणार? कोट्यवधी अल्पबचतधारकांना उत्सुकता
10
फक्त 1999 रुपये EMI...! बाइक सोडून थेट कारच खरेदी करतायत लोक, Maruti नं 5 दिवसांत विकल्या 80000 कार
11
Sonam Wangchuk: थेट सोनम वांगचूक यांना अटक, लडाख हिंसाचार प्रकरणात पोलिसांची मोठी कारवाई
12
७ महिन्यातील सर्वात मोठी घसरण! गुंतवणूकदारांचे ६.६५ लाख कोटी पाण्यात, तब्बल १५४ शेअर्स नीचांकीवर
13
'क्रू २' ची तयारी सुरू! करीना कपूर-क्रिती सनॉन-तब्बू सुपरहिट त्रिकुट पुन्हा दिसणार का?, जाणून घ्या याबद्दल
14
Latur: 'मला वाचवा', आयुष्य संपवायचं म्हणून तरुणीने पाण्यात उडी मारली अन् पुन्हा जगण्याची इच्छा झाली
15
बँकिंग क्षेत्राला हादरवणारी बातमी! ३८ भारतीय बँकांचा डेटा लीक; पगार ट्रान्सफर, लोनचे हफ्ते सगळेच...
16
मुंबईत बेकायदेशीर भाडे आकारणाऱ्या अ‍ॅप-आधारित टॅक्सी, रिक्षा आणि वाहनांवर कारवाईचा बडगा
17
जीएसटी कपातीचा उलटा फेरा! वह्या, पुस्तके महागणार; शिक्षणासोबत काय खेळ केला पहा...
18
सिमेंटची गोणी ४२५ वरून ३७५ रुपयांवर! पण, कंपन्या करू शकतात चलाखी? ग्राहकांना लाभ मिळणार का?
19
"तो काय बोलतो तुम्हाला तरी कळतं का?", भार्गवला हिणावणाऱ्यांना भावाचं सणसणीत उत्तर, म्हणाला...
20
बिहारमध्ये महिला मंडळ खूश...! 'लाडकी बहीण नाही', सुरू करण्यात आली ही खास योजना; खात्यात धडा-धड जमा झाले 10-10 हजार; PM मोदी म्हणाले...

एकात्मिक रस्ते विकास प्रकल्पातील पूल अधांतरी

By admin | Updated: May 24, 2014 01:10 IST

अकोला शहराच्या लोकसंख्येत दिवसेंदिवस वाढ होत असली तरी पायाभूत सुविधा निर्माण करण्यात महापालिका प्रशासनाला अपयश आल्याचे चित्र आहे. अरुंद रस्ते, वाहनांची बेसुमार वाढलेली संख्या, ऑटो-रिक्षा चालकांनी गुंडाळून ठेवलेले वाहतुकीचे नियम आदी प्रकार लक्षात घेतल्यास शहरातून प्रवास करणे असुरक्षित झाले आहे.

अकोला : शहराच्या लोकसंख्येत दिवसेंदिवस वाढ होत असली तरी पायाभूत सुविधा निर्माण करण्यात महापालिका प्रशासनाला अपयश आल्याचे चित्र आहे. अरुंद रस्ते, वाहनांची बेसुमार वाढलेली संख्या, ऑटो-रिक्षा चालकांनी गुंडाळून ठेवलेले वाहतुकीचे नियम आदी प्रकार लक्षात घेतल्यास शहरातून प्रवास करणे असुरक्षित झाले आहे.

या समस्यांवर मात करण्यासाठी सन २००७-०८ मध्ये एकात्मिक रस्ते विकास प्रकल्प मंजूर करण्यात आला. प्रकल्पात मोर्णा नदीवरील दोन पुलांचा समावेश होता; परंतु भूमिगत गटार योजनेमुळे रस्ते विकास प्रकल्प रखडल्याने वाहतुकीची समस्या कायम असल्याची वस्तुस्थिती आहे.महापालिका क्षेत्रात जुने शहर आणि नवीन शहर, अशी विभागणी आपसुकच झाली आहे. जुने शहरात जाण्यासाठी महाराणा प्रताप बागेजवळील लोखंडी पूल तसेच दगडी पुलाचा वापर केला जातो. या दोन्ही पुलावरून जाताच जुने शहरात अरुंद रस्ते, चिंचोळ्या गल्ल्यातून वाहनधारकांना प्रवास करावा लागतो. मागील पंधरा वर्षांमध्ये लोकसंख्येत वाढ झाल्याने वाहनधारकांची संख्यासुद्धा वाढली आहे. दोन्ही पूल वाढत्या गर्दीसाठी पुरेसे नसल्याने सन २००८ मध्ये मंजूर झालेल्या एकात्मिक रस्ते विकास प्रकल्पात दोन पुलांचा समावेश करण्यात आला. बांधा, वापरा आणि हस्तांतरित करा, या निकषावर १५० कोटींची योजना मंजूर झाली. यापैकी पहिल्या टप्प्यात ८७ कोटी मंजूर झाले. यामध्ये शहरात प्रशस्त रस्ते, फुटपाथ, नाले-गटार बांधणे, दोन उड्डाण पूल, मोर्णा नदीवर दोन पूल आदींसह विविध कामांचा समावेश होता. योजनेच्या कामाची जबाबदारी शासनाने सार्वजनिक बांधकाम विभागाकडे दिली. त्यानुषंगाने शहराचा प्रकल्प अहवालसुद्धा तयार करण्यात आला होता; परंतु त्यानंतर भूमिगत गटार योजना मंजूर होताच, एकात्मिक रस्ते विकास प्रकल्पाला बाजूला सारण्यात आले. भूमिगत गटार योजनेत शहरात तब्बल साडेचारशे किलोमीटरपर्यंत खोदकाम होणार असल्याने रस्त्यांचे संभाव्य नुकसान टाळण्यासाठी रस्ते विकास प्रकल्प थंडबस्त्यात आहे. यामुळे जुने शहराला जोडणारे दोन पूलदेखील अधांतरी सापडले. परिणामी आजही नागरिकांना विस्कळीत वाहतुकीचा व गर्दीचा प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.