शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain Alert: रेड अलर्ट! महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यांना अत्यंत मुसळधार पावसाचा इशारा
2
Lufthansa Flight : 'Lufthansa'च्या विमानाला हैदराबादमध्ये उतरण्याची परवानगी नाकारली, जर्मनीला परतलं; नेमकं प्रकरण काय?
3
Mumbai: गिरगावमध्ये रस्त्याला भगदाड, बेस्ट बस पाच फूट खोल खड्यात, व्हिडीओ बघा
4
डोनाल्ड ट्रम्प यांनी वर्षभरात कमावले ₹५,१०० कोटी, कुठून आला त्यांच्याकडे इतका पैसा?
5
माकडाच्या हाती लागलं नोटांचं बंडल, झाडावर चढून केली ५००-५०० रुपयांच्या नोटांची उधळण, व्हिडीओ व्हायरल
6
इराण-इस्रायल संघर्षामुळे पाकिस्तानवर रडण्याची वेळ! पेट्रोल-डिझेलचे भाव भडकले, काय आहेत दर?
7
तुमच्या अनुभवाचा राज्याला काय उपयोग? कुंडमाळा पूल दुर्घटनेवरुन राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल
8
Ritual: अकाली मृत्यू येऊ नये म्हणून रोज झोपण्यापूर्वी करा 'ही' दोन ओळींची प्रार्थना!
9
आमदार, खासदार विकत घ्यायला पैसे आहेत पूल बांधायला नाही? मावळ दुर्घटनेवरुन राऊतांचा सवाल
10
Post Office च्या 'या' स्कीममध्ये हवी तितकी खाती उघडू शकता, हमी परताव्यासह मिळेल Tax मध्येही सूट
11
इंग्लंडविरूद्धच्या टेस्टसाठी शार्दुल ठाकूरला 'प्लेइंग ११'मध्ये संधीची शक्यता, 'या' खेळाडूला डच्चू?
12
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
13
Israel-Iran War : भारताला अडकवण्याचा प्रयत्न करणारा चीनच स्वत:च अडकला, इस्रायलच्या इराणवरील हल्ल्यानं ड्रॅगनलाही फटका
14
"आई कुठे काय करते मला सोडायची नव्हती पण...", संजनाची भूमिका साकारलेल्या दिपाली पानसरेने सांगितलं नेमकं कारण
15
"मंत्रालयातून उडी मारावी लागेल अशी वेळ.."; ज्येष्ठ मराठी अभिनेत्याची बिकट अवस्था, म्हणाला- "वय झाल्यामुळे.."
16
तुमचा पैसा तयार ठेवा! 'या' आठवड्यात ६ नवे IPO बाजारात, बंपर कमाईची संधी?
17
Navi Mumbai Suicide: १२ हजार रुपयांत संपूर्ण कुटुंबाचा खर्च चालवायचा कसा? तरुणीने संपवले जीवन
18
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
19
१०-१५ हजारांत संसाराचा गाडा हाकायचा कसा? राज्यातील शिक्षणसेवकांचा सवाल
20
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?

जिल्हा परिषदेला निधी देण्यात राजकारण; जि.प.सदस्य कोल्हे यांचा आरोप 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2019 14:46 IST

अकोला : जिल्हा परिषदेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील सर्वसामान्यांशी निगडित समस्या सोडविल्या जातात. त्यासाठी जिल्हा नियोजन समितीकडून पुरेसा निधी मिळणे अपेक्षित असताना त्यामध्ये राजकारण केले जाते.

अकोला : जिल्हा परिषदेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील सर्वसामान्यांशी निगडित समस्या सोडविल्या जातात. त्यासाठी जिल्हा नियोजन समितीकडून पुरेसा निधी मिळणे अपेक्षित असताना त्यामध्ये राजकारण केले जाते. त्यामुळे सर्वसामान्यांच्या समस्या ‘जैसे थे’ राहतात. किमान त्यांचा विचार करून तरी जिल्हा परिषदेने मागणी केलेला निधी द्यावा, असा ठराव शासनाकडे सादर करावा, यासाठी गोपाल कोल्हे यांनी मंगळवारी स्थायी समितीच्या सभेत मांडला.जिल्हा परिषद अध्यक्ष संध्या वाघोडे, उपाध्यक्ष जमिरउल्लाखा, शिक्षण सभापती पुंडलिकराव अरबट, समाजकल्याण सभापती रेखा अंभोरे, कृषी सभापती माधुरी गावंडे, महिला व बालकल्याण सभापती देवका पातोंड, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विलास खिल्लारे यांच्यासह अधिकारी सभेत उपस्थित होते.त्यावेळी सदस्य कोल्हे यांनी ग्रामीण भागात आवश्यक कामे करण्यासाठी नियोजन समितीकडे किती निधीची मागणी करण्यात आली, त्या तुलनेत किती निधी प्राप्त होणार आहे, याची माहिती मागविली. त्यामध्ये बांधकाम विभागाची ४४ कोटींची मागणी आहे. नियोजन समितीकडून त्यापैकी पाच कोटी देण्याची तयारी असल्याचे सांगण्यात आले. पंचायत विभागाने जिल्ह्यातील १२० ग्रामपंचायत भवनासाठी १२ कोटींची मागणी केली आहे. त्यावर समितीने काहीच दिले नाही. जनसुविधा कामांसाठी मागणी केलेले चार कोटी मिळणार असल्याचे सांगण्यात आले. शिक्षण विभागाने विविध कामांसाठी ३ कोटी ५२ लाख मागितले. किती निधी मिळणार, हे स्पष्ट झाले नाही. यावरून जिल्हा नियोजन समितीचे पदाधिकारी पक्षीय आणि सुडाचे राजकारण करीत असल्याचा आरोप कोल्हे यांनी केला. पक्षभेद बाजूला ठेवून सर्वसामान्यांच्या समस्या सोडविण्यासाठी तरी निधी द्यावा, असे आवाहन करीत त्यांनी सभेचा ठराव शासनाकडे पाठविण्याची मागणी केली.सभेत अधिकारी, गटविकास अधिकारी उपस्थित नाहीत. त्यांच्यामुळे मांडलेल्या समस्या निकाली निघत नाहीत. हा प्रकार टाळण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना सभेत स्वत: उपस्थित राहण्याची समज द्यावी, अशी मागणी सदस्य रामदास लांडे यांनी केली. सोबतच पारस ग्रामपंचायतमध्ये खोट्या तक्रारी करून सरपंच, सचिवांना वेठीस धरले जात आहे. त्यांना पायबंद घालण्याच्या उपाययोजना जिल्हा परिषदेने कराव्या, असेही ते म्हणाले.

रमाई घरकुल लाभार्थींची लूट थांबवा!रमाई घरकुलाच्या लाभार्थींकडून दहा हजार रुपयांपर्यंत रक्कम वसूल केली जाते, तसेच बांधकामाचे धनादेश काढण्यासाठी ५०० रुपये मागणी केली जाते. हे प्रकार तातडीने बंद करण्यासाठी संबंधितांना निर्देश देण्याचेही सभेत सांगण्यात आले.

 

टॅग्स :AkolaअकोलाAkola ZPअकोला जिल्हा परिषद