शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीयांनी घाम गाळून ज्या वस्तू बनवल्या, त्याच तुम्ही खरेदी करा; व्यापाऱ्यांनीही पुढाकार घ्यावा; पंतप्रधान मोदींचं आवाहन
2
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
3
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
4
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
5
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
6
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
7
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
8
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
9
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
10
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
11
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
12
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
13
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
14
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
15
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
16
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
17
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
18
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
19
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
20
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना

शेवटच्या घटकापर्यंत पोषण आहार पोेहोचविण्यावर भर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2018 12:56 IST

अकोला: बहुसंख्य कमकुवत घटकांना भरपूर प्रथिने असलेली अन्नधान्य मिळावेत, या दृष्टीने केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयाने लक्ष केंद्रित केले आहे.

अकोला: बहुसंख्य कमकुवत घटकांना भरपूर प्रथिने असलेली अन्नधान्य मिळावेत, या दृष्टीने केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयाने लक्ष केंद्रित केले असून, देशातील पर्जन्यश्रीत भागात राहणाऱ्या छोट्या आणि सीमांत शेतकºयांच्या गरजा लक्षात घेऊन २०१८ हे राष्ट्रीय पौष्टिक अन्नधान्य वर्ष म्हणून साजरे करण्याचे ठरविले आहे.तृणधान्य पिकांना त्यातील विशेष पोषक मूल्यामुळे केंद्र शासनाने पौष्टिक अन्नधान्य म्हणून राजपत्राद्वारे अधिसूचित केले आहे. ही पौष्टिक अन्नधान्ये, विशेषत: बहुसंख्य कमकुवत लोकांना, लहान मुलांना, स्त्रियांना, गरीब शेतकरी वर्गातील लोकांना पोषण देतात. या पोषक अन्नधान्यात प्रथिने, तंतूमय पदार्थ आणि खनिज मूलद्रव्ये भरपूर प्रमाणात असल्याने आरोग्याच्या दृष्टिकोनातून विशेष महत्त्व आहे. या पौष्टिक अन्नधान्य पिकात हवामानाला सामोरे जाण्याचा गुणधर्म असल्याने विपरीत परिस्थिती जसे कमी पर्जन्यमानात, कमी निविष्ठा परिस्थितीतही वाजवी उत्पादन मिळू शकते. पोषक अन्नधान्य पिकांना प्रोत्साहन देण्यासाठी २०१८ पासून राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत एक वेगळे उप-अभियान सुरू केले आहे. संयुक्त राष्ट्र संघाच्या अन्न व कृषी संघटनेद्वारे २०१८ हे मिलेट वर्ष म्हणून घोषित करण्याचा केंद्र शासन प्रयत्न करीत आहे. त्याचबरोबर, सार्वजनिक वितरण व्यवस्थेद्वारे पोषक धान्याचा पुरवठा केला जात असून, शेतकºयांना योग्य मूल्य मिळण्याच्या दृष्टीने या पिकांच्या किमान आधारभूत किमतीतही केंद्र शासनाने लक्षणीय वाढ केली आहे. याबाबत पुण्यात २८ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय स्तरावरील पौष्टिक अन्नधान्य कार्यशाळा घेण्यात आली.यासंदर्भात राज्यात अभियान राबविण्यात येणार आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाCentral Governmentकेंद्र सरकार