शहरं
Join us  
Trending Stories
1
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
2
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
3
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
4
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
5
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
6
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
7
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
8
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
9
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
10
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
11
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
12
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
13
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
14
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
15
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
16
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
17
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
18
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
19
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
20
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले

शेवटच्या घटकापर्यंत पोषण आहार पोेहोचविण्यावर भर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2018 12:56 IST

अकोला: बहुसंख्य कमकुवत घटकांना भरपूर प्रथिने असलेली अन्नधान्य मिळावेत, या दृष्टीने केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयाने लक्ष केंद्रित केले आहे.

अकोला: बहुसंख्य कमकुवत घटकांना भरपूर प्रथिने असलेली अन्नधान्य मिळावेत, या दृष्टीने केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयाने लक्ष केंद्रित केले असून, देशातील पर्जन्यश्रीत भागात राहणाऱ्या छोट्या आणि सीमांत शेतकºयांच्या गरजा लक्षात घेऊन २०१८ हे राष्ट्रीय पौष्टिक अन्नधान्य वर्ष म्हणून साजरे करण्याचे ठरविले आहे.तृणधान्य पिकांना त्यातील विशेष पोषक मूल्यामुळे केंद्र शासनाने पौष्टिक अन्नधान्य म्हणून राजपत्राद्वारे अधिसूचित केले आहे. ही पौष्टिक अन्नधान्ये, विशेषत: बहुसंख्य कमकुवत लोकांना, लहान मुलांना, स्त्रियांना, गरीब शेतकरी वर्गातील लोकांना पोषण देतात. या पोषक अन्नधान्यात प्रथिने, तंतूमय पदार्थ आणि खनिज मूलद्रव्ये भरपूर प्रमाणात असल्याने आरोग्याच्या दृष्टिकोनातून विशेष महत्त्व आहे. या पौष्टिक अन्नधान्य पिकात हवामानाला सामोरे जाण्याचा गुणधर्म असल्याने विपरीत परिस्थिती जसे कमी पर्जन्यमानात, कमी निविष्ठा परिस्थितीतही वाजवी उत्पादन मिळू शकते. पोषक अन्नधान्य पिकांना प्रोत्साहन देण्यासाठी २०१८ पासून राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत एक वेगळे उप-अभियान सुरू केले आहे. संयुक्त राष्ट्र संघाच्या अन्न व कृषी संघटनेद्वारे २०१८ हे मिलेट वर्ष म्हणून घोषित करण्याचा केंद्र शासन प्रयत्न करीत आहे. त्याचबरोबर, सार्वजनिक वितरण व्यवस्थेद्वारे पोषक धान्याचा पुरवठा केला जात असून, शेतकºयांना योग्य मूल्य मिळण्याच्या दृष्टीने या पिकांच्या किमान आधारभूत किमतीतही केंद्र शासनाने लक्षणीय वाढ केली आहे. याबाबत पुण्यात २८ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय स्तरावरील पौष्टिक अन्नधान्य कार्यशाळा घेण्यात आली.यासंदर्भात राज्यात अभियान राबविण्यात येणार आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाCentral Governmentकेंद्र सरकार