शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
4
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
5
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
6
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
7
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
8
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
9
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
10
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
11
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
12
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
13
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
14
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
15
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
16
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
17
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
18
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
19
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
20
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...

पोलिसांच्या लवकरच बदल्या; यादी मागविली!

By admin | Updated: April 7, 2017 00:52 IST

अकोला- पोलीस दलातील कर्मचारी, अधिकाऱ्यांच्या लवकरच बदल्या होणार आहेत. पाच वर्षे सेवा झालेल्या पोलीस कर्मचाऱ्यांकडून १० एप्रिलपर्यंत अर्ज मागविले आहेत.

पोलीस कर्मचाऱ्यांना द्यावी लागणार पसंतीची तीन ठिकाणे

अकोला : पोलीस दलातील कर्मचारी, अधिकाऱ्यांच्या लवकरच बदल्या होणार आहेत. त्यानुषंगाने पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीणा यांनी पोलीस ठाण्यांमध्ये पाच वर्षे सेवा झालेल्या पोलीस कर्मचाऱ्यांकडून १० एप्रिलपर्यंत अर्ज मागविले आहेत. अर्ज प्राप्त झाल्यानंतरच पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या बदल्यांची प्रक्रिया सुरू होईल. पोलीस शिपाई ते सहायक पोलीस उपनिरीक्षक संवर्गाच्या वार्षिक सर्वसाधारण बदल्या करण्याचे प्रस्तावित आहे. महाराष्ट्र शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे विनियमन अधिनियम २००५ नुसार बदल्या करण्यात येणार आहेत. पोलीस कर्मचाऱ्यांना एका पोलीस ठाण्यामध्ये नेमणुकीच्या तारखेपासून ३१ मे २०१७ पर्यंत पाच वर्षांचा कालावधी पूर्ण झालेला आहे. अशा पोलीस कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात येणार आहेत, तसेच स्थानिक गुन्हे शाखा व जिल्हा विशेष शाखा येथे तीन वर्षे सेवा झालेल्या पोलीस कर्मचाऱ्यांच्याही बदल्या होणार आहेत. पोलीस कर्मचाऱ्यांच्या त्यांच्या स्वग्राम असलेल्या तालुक्याच्या ठिकाणी नेमणूक, बदली करण्यात येणार नाही. पोलीस मुख्यालयात काम करीत असलेल्या संवर्गातील कर्मचाऱ्यांसाठी हा नियम लागू राहणार नाही. यासोबतच एका पोलीस स्टेशनमधील खंडित, अखंडित सेवा धरून पाच वर्षे पूर्ण झालेल्या आणि एका तालुक्यात खंडित, अखंडित दहा वर्षे पूर्ण झालेल्या कर्मचाऱ्यांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. बदली प्रक्रिया राबविताना पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांनी पसंतीच्या ठिकाणी बदली मागण्याचा अधिकार राहणार नसल्याचे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे. बदलीपात्र पोलीस कर्मचाऱ्यांव्यतिरिक्त बदलीसाठी विनंती अर्जासोबत सहपत्र ब नमुन्यात पोलीस अधीक्षक कार्यालयाकडे १० एप्रिलपर्यंत पाठविण्याचे आदेश देण्यात आले आहेत. बदलीसाठी पोलिसांना पसंतीची तीन ठिकाणे द्यावी लागणार आहेत. बदलीसंदर्भात गैरवर्तन केल्यास त्या पोलीस कर्मचाऱ्याविरुद्ध कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारासुद्धा देण्यात आला आहे.