शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

बाळासाहेब आंबेडकरांना पोलीस संरक्षण द्या; देवळी ग्रामपंचायतने घेतला एकमताने ठराव!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2018 02:34 IST

अकोला : भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू व भारिप-बहुजन महासंघाचे राष्ट्रीय नेते बाळासाहेब आंबेडकर हे बहुजनांच्या कल्याणासाठी भारतभर फिरून रात्रंदिवस झटत असतात. ते बहुजनांच्या हितासाठी आंदोलने करतात. बहुजनविरोधी समाजकंटकांकडून त्यांच्या जीवास धोका होऊ शकतो. त्यामुळे केंद्र व राज्य शासनाने त्यांना पोलीस संरक्षण द्यावे, असा ऐतिहासिक ठराव अकोला तालुक्यातील देवळी ग्रामपंचायतच्या सदस्यांनी १२ जानेवारी रोजी ग्रामपंचायतच्या आयोजित सभेत एकमताने पारित केला.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू व भारिप-बहुजन महासंघाचे राष्ट्रीय नेते बाळासाहेब आंबेडकर हे बहुजनांच्या कल्याणासाठी भारतभर फिरून रात्रंदिवस झटत असतात. ते बहुजनांच्या हितासाठी आंदोलने करतात. बहुजनविरोधी समाजकंटकांकडून त्यांच्या जीवास धोका होऊ शकतो. त्यामुळे केंद्र व राज्य शासनाने त्यांना पोलीस संरक्षण द्यावे, असा ऐतिहासिक ठराव अकोला तालुक्यातील देवळी ग्रामपंचायतच्या सदस्यांनी १२ जानेवारी रोजी ग्रामपंचायतच्या आयोजित सभेत एकमताने पारित केला.देवळीच्या उपसरपंच वैशाली विकास सदांशिव यांनी या ठरावाची सूचना मांडली. ग्रामपंचायत सदस्य देवानंद सदांशिव यांनी अनुमोदन दिले. सरपंचासह ग्रामपंचायतच्या सर्व सदस्यांनी हा ठराव एकमताने पारित केला. या ठरावाच्या सुचक असलेल्या ग्रामपंचायतच्या उपसरपंच वैशाली विकास सदांशिव या भारिप-बमसं पक्षाचे अकोला जिल्हा उपाध्यक्ष विकास सदांशिव यांच्या पत्नी आहेत. बाळासाहेब आंबेडकर यांच्याप्रती श्रद्धा ठेवून केंद्र व राज्य सरकारने त्यांना पोलीस संरक्षण देण्याची मागणी करणारी देवळी ही राज्यातील कदाचित पहिलीच ग्रामपंचायत असावी.कोरेगाव भीमा प्रकरण बाळासाहेब आंबेडकर यांनी अतिशय आक्रमकपणे लावून धरले. त्यामुळे त्यांच्या सुरक्षिततेची काळजी सर्वांनाच आहे. त्यानुसार हा ठराव घेतला आहे. या ठरावानुसार केंद्र व राज्य शासन बाळासाहेब आंबेडकरांना पोलीस संरक्षण देणार का, याकडे लोकांचे लक्ष लागले आहे.     

 

टॅग्स :Akola Ruralअकोला ग्रामीणgram panchayatग्राम पंचायत