शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
3
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
4
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
5
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
6
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
7
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
8
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
9
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
10
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
11
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
12
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
13
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
14
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
15
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
16
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
17
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
18
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
19
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
20
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल

बदल्या केलेले पोलीस कर्मचारी मूळ पोलीस ठाण्यातच!

By admin | Updated: July 17, 2017 03:09 IST

पाच व दहा वर्षे सेवाकाळ झालेल्या १६२ पोलीस कर्मचाऱ्यांच्या बदल्या केल्या; परंतु अर्ध्याधिक पोलीस कर्मचाऱ्यांना ठाणेदारांनी मूळ ठाण्यातून रिलिव्हच केले नाही.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : पोलीस अधीक्षक राकेश कलासागर यांनी जिल्ह्यातील पोलीस ठाण्यांमध्ये पाच व दहा वर्षे सेवाकाळ झालेल्या १६२ पोलीस कर्मचाऱ्यांच्या बदल्या केल्या; परंतु अर्ध्याधिक पोलीस कर्मचाऱ्यांना ठाणेदारांनी मूळ ठाण्यातून रिलिव्हच केले नाही. पोलीस कर्मचाऱ्यांनाही तत्काळ सोडण्याचे आदेश शनिवारी गुन्हे आढावा बैठकीत पोलीस अधीक्षकांनी दिल्यानंतरही त्याकडे दुर्लक्ष होत आहे. रमजान ईद उत्सव सण संपल्यानंतर पोलीस अधीक्षक राकेश कलासागर यांनी बदलीसाठी विनंती अर्ज केलेल्या १६२ पोलीस कर्मचाऱ्यांची यादी जाहीर करीत त्यांची पसंतीच्या ठिकाणी बदली केली आणि पोलीस कर्मचाऱ्यांना बदलीच्या पोलीस ठाण्यात रुजू होण्याचे आदेश दिले होते; परंतु अनेक पोलीस कर्मचाऱ्यांकडे गुन्हे तपासाची कामे असल्यामुळे संबंधित ठाणेदारांनी या कर्मचाऱ्यांना मूळ ठाण्यातूनच कार्यमुक्त केले नाही. जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांमध्ये कर्मचाऱ्यांची कमतरता असल्यामुळे गुन्हे तपास, बंदोबस्त करताना अडचणी निर्माण होत आहेत. अनेक कर्मचाऱ्यांना पसंतीच्या ठिकाणी जाण्याची इच्छा असतानाही ठाणेदार त्यांना सोडत नसल्यामुळे त्यांना मूळ पोलीस ठाण्यातच काम करावे लागत आहे. बदली झालेल्या कर्मचाऱ्यांना मूळ पोलीस ठाण्यातून मुक्त केले का, याबाबत आढावा नियंत्रण कक्षातून आढावा घेण्यात येत आहे; परंतु काही पोलीस ठाण्यांमधील बदली झालेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना ठाणेदार सोडत नसल्याची ओरड अनेक कर्मचारी करीत आहेत. पोलीस कर्मचाऱ्यांची बदली केल्यानंतर त्यांना लगेच कार्यमुक्त करून बदली केलेल्या पोलीस ठाण्यात रुजू होण्याचे आदेश दिले होते. गुन्हे आढावा बैठकीतसुद्धा ठाणेदारांना बदलीवरील कर्मचाऱ्यांना सोडण्यास बजावले. आदेशाचे पालन न करणाऱ्यांवर कारवाई करू. - राकेश कलासागर, पोलीस अधीक्षक.