शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

बदल्या केलेले पोलीस कर्मचारी मूळ पोलीस ठाण्यातच!

By admin | Updated: July 17, 2017 03:09 IST

पाच व दहा वर्षे सेवाकाळ झालेल्या १६२ पोलीस कर्मचाऱ्यांच्या बदल्या केल्या; परंतु अर्ध्याधिक पोलीस कर्मचाऱ्यांना ठाणेदारांनी मूळ ठाण्यातून रिलिव्हच केले नाही.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : पोलीस अधीक्षक राकेश कलासागर यांनी जिल्ह्यातील पोलीस ठाण्यांमध्ये पाच व दहा वर्षे सेवाकाळ झालेल्या १६२ पोलीस कर्मचाऱ्यांच्या बदल्या केल्या; परंतु अर्ध्याधिक पोलीस कर्मचाऱ्यांना ठाणेदारांनी मूळ ठाण्यातून रिलिव्हच केले नाही. पोलीस कर्मचाऱ्यांनाही तत्काळ सोडण्याचे आदेश शनिवारी गुन्हे आढावा बैठकीत पोलीस अधीक्षकांनी दिल्यानंतरही त्याकडे दुर्लक्ष होत आहे. रमजान ईद उत्सव सण संपल्यानंतर पोलीस अधीक्षक राकेश कलासागर यांनी बदलीसाठी विनंती अर्ज केलेल्या १६२ पोलीस कर्मचाऱ्यांची यादी जाहीर करीत त्यांची पसंतीच्या ठिकाणी बदली केली आणि पोलीस कर्मचाऱ्यांना बदलीच्या पोलीस ठाण्यात रुजू होण्याचे आदेश दिले होते; परंतु अनेक पोलीस कर्मचाऱ्यांकडे गुन्हे तपासाची कामे असल्यामुळे संबंधित ठाणेदारांनी या कर्मचाऱ्यांना मूळ ठाण्यातूनच कार्यमुक्त केले नाही. जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांमध्ये कर्मचाऱ्यांची कमतरता असल्यामुळे गुन्हे तपास, बंदोबस्त करताना अडचणी निर्माण होत आहेत. अनेक कर्मचाऱ्यांना पसंतीच्या ठिकाणी जाण्याची इच्छा असतानाही ठाणेदार त्यांना सोडत नसल्यामुळे त्यांना मूळ पोलीस ठाण्यातच काम करावे लागत आहे. बदली झालेल्या कर्मचाऱ्यांना मूळ पोलीस ठाण्यातून मुक्त केले का, याबाबत आढावा नियंत्रण कक्षातून आढावा घेण्यात येत आहे; परंतु काही पोलीस ठाण्यांमधील बदली झालेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना ठाणेदार सोडत नसल्याची ओरड अनेक कर्मचारी करीत आहेत. पोलीस कर्मचाऱ्यांची बदली केल्यानंतर त्यांना लगेच कार्यमुक्त करून बदली केलेल्या पोलीस ठाण्यात रुजू होण्याचे आदेश दिले होते. गुन्हे आढावा बैठकीतसुद्धा ठाणेदारांना बदलीवरील कर्मचाऱ्यांना सोडण्यास बजावले. आदेशाचे पालन न करणाऱ्यांवर कारवाई करू. - राकेश कलासागर, पोलीस अधीक्षक.