शहरं
Join us  
Trending Stories
1
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
2
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत
3
कौतुकास्पद! दहावीच्या परीक्षेत ६५ वर्षीय आजी आणि नातू एकत्र झाले पास, मिळवलं घवघवीत यश
4
"आमच्या २६ बहिणींचं कुंकू पुसलं ते दहशतवादी कुठे आहेत?"; काँग्रेस नेत्याचा भाजपावर निशाणा
5
Solapur Accident: वडिलांचा अंत्यविधी उरकून परतताना लेकालाही मृत्यूनं गाठलं, सोलापुरातील घटना!
6
भारताचे २ वेगवेगळे संघ निवडले जाणार; इंग्लंड दौऱ्यापूर्वी सिलेक्टर्सचा मोठा निर्णय, पण का?
7
पाकला पुन्हा मिळाली आर्थिक मदत; भारतासोबतच्या तणावादरम्यान IMF ने दिले ₹8400 कोटी
8
तुर्कस्तान आणि अझरबैजानला विमाने पाठवणार का? इंडिगो कंपनीने दिली मोठी अपडेट
9
Tejasvee Ghosalkar : "भाजपात जाण्याबाबत मी..."; तेजस्वी घोसाळकरांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट
10
Surya Gochar 2025: सूर्य होणार अधिक प्रखर, मात्र 'या' राशींसाठी ठरणार सुखकर; कसा ते पहा!
11
'तुझा मुलगा जिन्न आहे' मांत्रिकाचं ऐकून १२ वर्षांनी झालेल्या मुलाला कालव्यात फेकलं!
12
भारतात Trump Towerचा जलवा, ८ ते १५ कोटींचे फ्लॅट्स; १२५ कोटींचं पेंटहाऊस, पहिल्याच दिवशी सोल्ड आऊट
13
ICC Test Rankings : 'तलवारबाज' जड्डूचा मोठा पराक्रम! टेस्टमध्ये अव्वलस्थान कायम राखत सेट केला नवा विक्रम
14
३६ युद्धनौका, ७ विनाशिका, फ्रिगेट आणि पाणबुड्या..., त्या रात्री नौदलाने केली होती कराची बेचिराख करण्याची तयारी   
15
Mumbai: मुंबईतील महिलेची सातव्या मजल्यावरून उडी, सुसाईड नोटमध्ये लिहिले मृत्युचे कारण
16
दहशतवादी मसूद अजहरला पाकिस्तानी सरकार १४ कोटी रुपये देणार? कारण ऐकून व्हाल हैराण!
17
India Pakistan conflict : मोठा खुलासा! तुर्कीचे सैनिक भारतावर ड्रोन हल्ला करत होते; सीमेपलिकडे काय घडत होते?
18
'आली रे आली चीनची बारी आली'; आता मोदी सरकार चीनची नांगी ठेचण्याच्या तयारीत, प्रकरण काय?
19
भारताविरोधातील कट उधळला! शोपियान चकमकीत ठार झालेल्या ३ दहशतवाद्यांकडून मोठा शस्त्रसाठा जप्त
20
प्रसिद्ध सेलिब्रिटीचा व्हिसा रिजेक्ट, कान्सला जाण्याचं स्वप्न भंगलं; पोस्ट शेअर करत म्हणाली...

बदल्या केलेले पोलीस कर्मचारी मूळ पोलीस ठाण्यातच!

By admin | Updated: July 17, 2017 03:09 IST

पाच व दहा वर्षे सेवाकाळ झालेल्या १६२ पोलीस कर्मचाऱ्यांच्या बदल्या केल्या; परंतु अर्ध्याधिक पोलीस कर्मचाऱ्यांना ठाणेदारांनी मूळ ठाण्यातून रिलिव्हच केले नाही.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : पोलीस अधीक्षक राकेश कलासागर यांनी जिल्ह्यातील पोलीस ठाण्यांमध्ये पाच व दहा वर्षे सेवाकाळ झालेल्या १६२ पोलीस कर्मचाऱ्यांच्या बदल्या केल्या; परंतु अर्ध्याधिक पोलीस कर्मचाऱ्यांना ठाणेदारांनी मूळ ठाण्यातून रिलिव्हच केले नाही. पोलीस कर्मचाऱ्यांनाही तत्काळ सोडण्याचे आदेश शनिवारी गुन्हे आढावा बैठकीत पोलीस अधीक्षकांनी दिल्यानंतरही त्याकडे दुर्लक्ष होत आहे. रमजान ईद उत्सव सण संपल्यानंतर पोलीस अधीक्षक राकेश कलासागर यांनी बदलीसाठी विनंती अर्ज केलेल्या १६२ पोलीस कर्मचाऱ्यांची यादी जाहीर करीत त्यांची पसंतीच्या ठिकाणी बदली केली आणि पोलीस कर्मचाऱ्यांना बदलीच्या पोलीस ठाण्यात रुजू होण्याचे आदेश दिले होते; परंतु अनेक पोलीस कर्मचाऱ्यांकडे गुन्हे तपासाची कामे असल्यामुळे संबंधित ठाणेदारांनी या कर्मचाऱ्यांना मूळ ठाण्यातूनच कार्यमुक्त केले नाही. जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांमध्ये कर्मचाऱ्यांची कमतरता असल्यामुळे गुन्हे तपास, बंदोबस्त करताना अडचणी निर्माण होत आहेत. अनेक कर्मचाऱ्यांना पसंतीच्या ठिकाणी जाण्याची इच्छा असतानाही ठाणेदार त्यांना सोडत नसल्यामुळे त्यांना मूळ पोलीस ठाण्यातच काम करावे लागत आहे. बदली झालेल्या कर्मचाऱ्यांना मूळ पोलीस ठाण्यातून मुक्त केले का, याबाबत आढावा नियंत्रण कक्षातून आढावा घेण्यात येत आहे; परंतु काही पोलीस ठाण्यांमधील बदली झालेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना ठाणेदार सोडत नसल्याची ओरड अनेक कर्मचारी करीत आहेत. पोलीस कर्मचाऱ्यांची बदली केल्यानंतर त्यांना लगेच कार्यमुक्त करून बदली केलेल्या पोलीस ठाण्यात रुजू होण्याचे आदेश दिले होते. गुन्हे आढावा बैठकीतसुद्धा ठाणेदारांना बदलीवरील कर्मचाऱ्यांना सोडण्यास बजावले. आदेशाचे पालन न करणाऱ्यांवर कारवाई करू. - राकेश कलासागर, पोलीस अधीक्षक.