शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतावर २४ तासांत ‘टॅरिफ बॉम्ब’? अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पुन्हा बरळले, म्हणाले...
2
जे स्वतःची कबर खोदताहेत, त्यांना का थांबवायचे? पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर घणाघात
3
पालिका निवडणुकांचा दिवाळीनंतर उडणार बार; ‘स्थानिक’ निवडणुकीत व्हीव्हीपॅटचा वापर नाही
4
ढगफुटीने प्रलय; अनेक लोक, घरे वाहून गेली; बचावकार्यासाठी उतरले जवान
5
१९५४ पासून पाकला शस्त्रांची मदत करतोय अमेरिका, भारतीय लष्कराने ट्रम्पना आरसा दाखवला
6
विदर्भ-मराठवाड्यातील माल जाणार समुद्रमार्गे, समृद्धी महामार्गाला जोडणार वाढवण बंदर
7
‘माधुरी’ला परत आणण्यासाठी सरकार सुप्रीम कोर्टात जाणार; मुख्यमंत्री फडणवीस यांची ग्वाही
8
‘खरा भारतीय’ ठरविण्याचे अधिकार न्यायमूर्तींना नाहीत; प्रियांका गांधी म्हणाल्या, राहुल गांधी सैन्याविरोधात बोलले नाहीत
9
"भारतासारख्या कणखर सहकाऱ्यासोबतचे संबंध खराब करू नका"; ट्रम्प यांना निकी हेली यांनी सुनावले
10
खेड प्रेम प्रकरण: "मठाच्या नावाखाली अनेक..."; प्राजक्ताच्या वडिलांचे विश्वनाथ गोसावीवर गंभीर आरोप
11
Video: "आता मी हिंदीत बोलू????"; मराठीत बोलत असतानाच काजोल भडकली, बघा काय घडलं?
12
Palghar Video : कामगारांनी कार अडवली, संतापलेल्या मालकिणीने थेट अंगावरच घातली; प्रकरण का चिघळलं? 
13
हीरक महोत्सवी महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी
14
खूशखबर... नागपूर-पुणे वंदे भारत एक्स्प्रेसचा लवकरच शुभारंभ; PM मोदी दाखविणार हिरवा झेंडा 
15
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
16
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
17
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
18
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
19
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
20
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात

बीटी कपाशी खाल्याने ५० गायींना विषबाधा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2020 12:10 IST

५० काठेवाडी गायींना बीटी कपाशीच्या बोंड्या खाल्ल्याने विषबाधा झाल्याची घटना १८ फेब्रुवारी रोजी उघडकीस आली.

पारस : येथील संग्राम राठोड या पशुपालकांच्या ५० काठेवाडी गायींना बीटी कपाशीच्या बोंड्या खाल्ल्याने विषबाधा झाल्याची घटना १८ फेब्रुवारी रोजी उघडकीस आली. त्यामुळे पशुपालकावर संकट ओढवले आहे.पारस येथील संग्राम राठोड यांचा काठेवाडी गोपालनाचा वडिलोपार्जित व्यवसाय आहे. गत अनेक वर्षांपासून पारस येथे स्थायिक झालेल्या संग्राम राठोड व त्यांचे बंधू यांनी जवळपास शंभर काठेवाडी जनावरांचे पालन केले आहे. सदर पालनातून राठोड कुटुंबीय दूध व्यवसाय करतात. बीटी कपाशी पेरलेल्या शेतामध्ये त्यांनी १८ फेब्रुवारी रोजी गायी चारायला नेल्या. घरी आल्यानंतर त्यातील काही गायींना विषबाधा झाल्याचे लक्षात आले. जवळपास ५० गायी बाधित झाल्याने संग्राम राठोड यांच्यावर संकट कोसळले. त्यांनी पशू चिकित्सक अधिकाऱ्यांकडे धाव घेऊन औषधोपचार सुरू केला. सध्या काही गायी या मरणावस्थेत असून, काही गायींच्या प्रकृतीत सुधारणा झाली आहे.काही जनावरे दुधाळ असून, दुधाळ जनावरांचे दूध देणे बंद झाले आहे. त्यामुळे राठोड यांच्या दूध व्यवसायावरही फरक पडला आहे. राठोड यांचे नुकसान झाल्याने त्यांना मदत देण्याची मागणी होत आहे. (वार्ताहर)

टॅग्स :Akolaअकोला