शहरं
Join us  
Trending Stories
1
"PM मोदी खूप मोठी चूक करतायेत, जाणूनबुजून..."; इस्त्रायल-इराण तणावावर अबू आझमी संतापले
2
सुधाकर बडगुजरांच्या भाजप प्रवेशाला लागणार मुहूर्त; पदाधिकाऱ्यांचा विरोध मावळला
3
विहीण बाईंवर जीव जडला, बायको वाटू लागली अडचण! पतीने केलेलं कृत्य ऐकून बसेल धक्का 
4
इराण-इस्रायल संघर्षामुळे सोन्याचे दर भडकले! आठवड्यात ३,६४५ रुपयांची वाढ; आजचे दर काय?
5
मैत्रीला धोका? ७३% मित्र पैसेच परत करत नाहीत; तुम्हीही 'या' चुकीला बळी पडलाय का?
6
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
7
Mumbai: मुंब्रा दुर्घटनेची माहिती असल्यास रेल्वेला कळवा, प्रशासनाचे नागरिकांना आवाहन!
8
सोमनाथसोबत खरंच लग्न केलं? अखेर राजेश्वरी खरातचा मोठा खुलासा, म्हणाली- "लवकरच मी गुड न्यूज.."
9
'टीम इंडिया'तून वगळलेल्या सरफराज खानचे 'वनडे स्टाईल' शतक, बुमराहला एकही विकेट नाही, ऋतुराजही अपयशी
10
दिवसा काम, रात्री अभ्यास! मोबाईल कव्हर विकणारा रोहित होणार डॉक्टर; NEETमध्ये रचला इतिहास
11
दोन्ही पत्नी अन् आता गर्लफ्रेंडही हिंदू, मग मुलांची नावं मुस्लिमच का? आमिर खान म्हणाला...
12
काव्या मारनसोबतच्या अफेअरच्या चर्चांवर संगीतकार रविचंदरने सोडलं मौन; म्हणाला, "लग्न...?"
13
'फादर्स डे': विराट कोहलीसाठी लेक वामिकाने बनवलं खास ग्रिटींग कार्ड, लिहिलाय खास संदेश
14
परिसरात किती पाणी भरलंय? लगेच कळणार; शहरात रडार लेव्हल ट्रान्समीटर बसवले!
15
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
16
इराण-इस्त्रायल युद्धात पाकिस्ताननं घेतली भूमिका; मुस्लीम देशांना एकजूट होण्याचं आवाहन
17
जावेसमोर पतीची चप्पल मांडीखाली लपवली अन् फसली; पतीची हत्या करुन मृतदेहाचे तुकडे लपवले खड्ड्यात
18
बेडरूममधल्या 'या' ३ गोष्टी लगेचच फेका; श्वास घेण्यास त्रास आणि रात्रीची झोपही होईल खराब
19
Mumbai Local: मुंबई लोकलमध्ये आता ज्येष्ठ नागरिकांचा डबा
20
पाक सीमेजवळ विमानांचे उड्डाण धोक्याचे, ४६५ वेळा जीपीएसमध्ये छेडछाडीच्या घटना!

शब्दांची आनंदयात्रा घडवणारा कवी..

By admin | Updated: July 21, 2015 01:10 IST

आनंदयात्री प्रसाद कुलकर्णी यांची लोकमतशी दिलखुलास बातचीत.

नितीन गव्हाळे / अकोला : बालपणापासून त्याला शब्दांचे वेड होतं. रद्दीच्या कागदातसुद्धा तो कविता शोधायचा. त्याला कविता कळू लागल्यापासून त्याने कवीच व्हायचं ठरवलं. कविता, तिचे शब्द त्याच्या रक्तपेशींमध्ये धावायला लागले. प्रसादरूपी शब्द त्याच्या हातातून बाहेर पडून कागदांवर उमटू लागले. कविता ही ईश्‍वराची देण आहे. तिला दु:खाचा मुलामा न चढविता, आनंदाचा, हर्षाचा, प्रेमाचा, सौंदर्याचा आणि भव्यतेचा मुलामा चढविला आणि रसिकमनांना शब्दांची आनंदयात्रा घडवून आणली. शब्दांमधुनी आनंद पेरणारा, खळखळून हसवणारा कवी आहे, प्रसिद्ध कवी, प्रसाद कुलकर्णी. शुभेच्छांचा सौदागर, आनंदयात्री, शुभेच्छा एक्स्प्रेस अशा कितीतरी नावांनी महाराष्ट्राला परिचित असणारा प्रसाद कुलकर्णी सोमवारी कलर्स प्रस्तुत सखी मंच ह्यरिमझिम गाणी झलक सुहानीह्ण कार्यक्रमासाठी अकोल्यात आला होता. यावेळी प्रसादने लोकमतशी दिलखुलास बातचीत केली. प्रसाद मूळचा कोकणातील कणकवलीचा. प्रसादचे वडील मोहन कुलकर्णी पोस्टमास्तर आणि आई प्रतिभा एक शिक्षिका. प्रसादमागे आज मोठमोठी विशेषणं लागतात. यामागे त्याची साधना, तपश्‍चर्या मोठी आहे. आनंदाचा ध्यास घेत त्याने संकटं, दु:ख, विवंचना, शारीरिक व्याधी, अपघात आणि संघर्षाचा सामना केला. रसिकांच्या मनात आनंद, हर्ष निर्माण करायचा ध्यासच त्याने घेतला. त्याच्या कवितेतील शब्द रसिकांच्या मनाला आनंद देऊ लागले. त्याच्या एकेक कविता रसिकांना आनंदयात्रा घडवू लागल्या. प्रसादने आतापर्यंत आनंदयात्रेचे ५५0 प्रयोग केले. मराठी साहित्याच्या अत्युच्च शिखरावर प्रसाद जाऊन पोहोचला. शब्दांमध्ये परिवर्तनाची एक ताकद आहे. शब्दांनी मन बदलल्याचा अनुभव त्याने घेतला. शब्दांमुळे माणूस बदलत असेल तर त्याहून दुसरे मोठे कर्म ते कोणते..?

असा बनला शुभेच्छांचा सौदागर..

प्रसादला बालपणी लग्न, वाढदिवस, निरोप समारंभात गेल्यावर मराठी माणसांच्या हातात इंग्रजी शुभेच्छापत्र पाहून आश्‍चर्य वाटायचं. या शुभेच्छापत्रांच्या आड तो निरागस शब्दांची गुंफण असलेली कविता लपवायचा. सुरुवातीला नामांकित ग्रिटिंग्ज कंपन्यांकडे प्रसाद गेला; पण त्याला अक्षरश: हुसकावून लावले. मराठी शुभेच्छापत्र असू शकतं हेच त्यांना पटत नव्हते. १९९८ मध्ये किरण जैन या मित्राने मराठी शुभेच्छापत्रांची संकल्पना त्याच्यासमोर मांडली. तेव्हा या दोघांनाही ही कल्पना भन्नाट लोकप्रिय होईल, असे वाटले नाही. सगळय़ात पहिलं शुभेच्छापत्र त्यानं आईच्या वाढदिवसाला लिहिलं. मग त्याने वडिलांसाठी लिहिलं. साशंक मनाने किरण जैन यांनी शुभेच्छापत्र बाजारपेठेत आणलं आणि आश्‍चर्य म्हणजे वाचकांच्या उड्या पडू लागल्या.

स्मार्टफोनमुळे लिखित शुभेच्छापत्रांची क्रेझ कमी झाली

     काळाची पाऊले तुम्ही थोपवू शकत नाही. काळाच्या ओघात बदल होणारच. स्मार्टफोन आल्यामुळे लिखित शुभेच्छापत्रांची क्रेझ कमी झाली खरी; परंतु मागणी कमी झालेली नाही. स्मार्टफोनवरही मराठी शुभेच्छापत्र आपलं स्थान टिकवून असल्याचं प्रसाद म्हणतो. स्मार्टफोनवरही मराठी शुभेच्छापत्रांच्या माध्यमातून त्याचे शब्द रसिकांना साद घालतातच. कविता, गाणी, माणसं, प्रेम आणि तुटलेली मने जुळविण्यामध्ये त्याचे शब्द मोलाची भूमिका वठवित असल्याचं प्रसाद ठासून सांगतो.