शहरं
Join us  
Trending Stories
1
Mantha Cyclone: मोंथा चक्रीवादळ किनारपट्टीवर धडकले! वेग प्रतितास 100 किमी, विदर्भाला ऑरेंज अलर्ट
2
वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची खरंच चौकशी सुरू केली आहे का? मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले उत्तर
3
"निवडणुकीत लक्ष्मी दर्शन, कुणाला चपटी, कुणाला कोंबडं बकरू लागतं, तयारी ठेवा"; अजित पवारांच्या आमदाराचे विधान
4
पुण्यात भीषण अपघात! फरश्या घेऊन जाणाऱ्या ट्रकची तीन वाहनांना धडक,ट्रकचालकला पोलिसांच्या ताब्यात
5
१० हजारांचं जेवण करून बिल न भरता पळाले; ट्रॅफिकमध्ये झाला घोळ, रेस्टॉरंट मालकाने रस्त्यात गाठलं अन्...
6
वेळेत ब्लाऊज शिवून न देणे टेलरला पडलं महागात; ग्राहक कोर्टाने सुनावली शिक्षा, काय आहे प्रकार?
7
जळगाव जिल्ह्यात एसटी बसचा भीषण अपघात, चालकासह 8 प्रवाशी जखमी
8
"अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना आतापर्यंत ८ हजार कोटी वाटप, पुढील १५ दिवसांत ११ हजार कोटी देणार"
9
Mohammed Shami: "मी काही बोललो तर, वाद होईल!" संघ निवडीबाबत उपस्थित होणाऱ्या प्रश्नांवर शमीचं उत्तर
10
"त्यांना फाशीशिवाय दुसरी शिक्षा असूच शकत नाही"; डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणात उदयनराजेंनी लोकांना काय केले आवाहन?
11
Viral Video: फलंदाजाला 'असं' आउट होताना कधीच पाहिलं नसेल; षटकार मारूनंही पंचांनी वर केलं बोट!
12
अजबच! गावठी कुत्रा बनला ज्वेलरी शॉपचा रखवालदार, गळ्यात घालतो ५० तोळ्यांची सोन्याची चेन
13
Inspiring Story: तरुणीला किडनीची गरज, तरुणाला कर्करोग...; गोष्ट एका अनोख्या प्रेमाची!
14
'५० कोटींच्या धमकीला भीक घालत नाही', सुषमा अंधारेंनी रणजितसिंह नाईक निंबाळकरांविरोधात पुरावे दाखवले
15
4 दुचाकी, 6 सिलिंडर...बसमध्ये ठेवलेले 'हे' सामान; भडका उडाल्याने दोघांचा जागीच मृत्यू, डझनभर जखमी
16
UPSC Student Murder: लिव्ह पार्टनरची थंड डोक्याने हत्या, फॉरेन्सिक सायन्सची विद्यार्थिनी अमृताकडून 'ती' एक चूक झाली अन्...
17
'महायुती सरकारचे ११ हजार कोटींचे पॅकेजही ३२ हजार कोटींच्या पॅकेजसारखे फसवेच', हर्षवर्धन सपकाळ यांची टीका
18
मोठी बातमी! कर्जमाफीसाठी परभणी जिल्हाधिकाऱ्यांच्या गाडीवर शेतकऱ्याची दगडफेक
19
ट्रम्प आणि पुतिन यांच्यातील दरी वाढली, रशियन तेल साम्राज्याला मोठा झटका; परदेशी मालमत्ता विकण्यास सुरुवात
20
8th Pay Commission: १४०००, १५००० की १८०००...एक लाख सॅलरीवर किती होणार दरमहा वाढ?

‘पीएम’ आवास योजना ठरणार मृगजळ!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2017 01:40 IST

अकोला : केंद्र शासनाच्या पंतप्रधान आवास योजनेतील अटी व शर्ती ध्यानात घेता ही योजना पूर्णत्वास जाणार की नाही, अशी चिन्हे निर्माण झाली आहेत. गत वर्षभराच्या कालावधीत तांत्रिक सल्लागार म्हणून नियुक्त केलेल्या शून्य कन्सलटन्सीच्या माध्यमातून केवळ पाच घरांचे बांधकाम पूर्ण झाले आहे.

ठळक मुद्देक्लिष्ट निकषांमुळे लाभार्थी अडचणीतसत्ताधार्‍यांकडून आश्‍वासनांची खैरात

आशिष गावंडे । लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : केंद्र शासनाच्या पंतप्रधान आवास योजनेतील अटी व शर्ती ध्यानात घेता ही योजना पूर्णत्वास जाणार की नाही, अशी चिन्हे निर्माण झाली आहेत. गत वर्षभराच्या कालावधीत तांत्रिक सल्लागार म्हणून नियुक्त केलेल्या शून्य कन्सलटन्सीच्या माध्यमातून केवळ पाच घरांचे बांधकाम पूर्ण झाले आहे. योजनेचे निकष व नियमांत दुरुस्ती करण्याचे काम थेट केंद्र शासनाच्या पातळीवर होत असल्याने लाभार्थींच्या समस्या निकाली काढताना प्रशासकीय यंत्रणेच्या नाकीनऊ आले आहेत. एकूण चित्र पाहता ही योजना गरजू लाभार्थींसाठी मृगजळ ठरण्याची चिन्हे दिसत असली तरी सत्ताधार्‍यांकडून आश्‍वासनांची खैरात वाटली जात आहे, हे विशेष. केंद्र शासनाच्या पंतप्रधान आवास योजनेंतर्गत सन २0२२ पर्यंत ‘सर्वांसाठी घरे’ उभारण्याचे महापालिकांना निर्देश आहेत. योजनेचा आवाका मोठा असल्यामुळे मनपा प्रशासनाने योजनेचा ‘डीपीआर’ (प्रकल्प अहवाल) तयार करण्यासाठी शून्य कन्सलटन्सीची नियुक्ती केली; परंतु कन्सलटन्सीची नियुक्ती केवळ ‘डीपीआर’पुरती र्मयादित न ठेवता जोपर्यंत घरांचे बांधकाम पूर्ण होत नाही, तोपर्यंत तांत्रिक सल्लागार म्हणून याच कंपनीला नियुक्त करण्याचे निर्देश महापौर विजय अग्रवाल यांनी प्रशासनाला दिले होते. योजनेचा ‘डीपीआर’ तयार केल्यानंतर प्रत्यक्षात घरांचे बांधकाम करताना विविध अडचणींचा सामना करावा लागतो. त्यामुळे योजना पूर्ण झाल्यानंतरच उर्वरित देयक अदा करण्याची अट करारात नमूद करण्यात आली आहे. योजनेच्या निकषानुसार शून्य कन्सलटन्सीने सर्वप्रथम झोपडपट्टी भागात (शिवसेना वसाहत, माता नगर) सुमारे १ हजार २५१ घरांचा सर्व्हे केल्यानंतर ७९३ घरांचा ‘डीपीआर’ तयार केला. यातील ३१0 घरांचे बांधकाम मंजूर झाले. यापैकी ९२ लाभार्थींच्या घरांचे बांधकाम सुरू झाले असता मागील वर्षभराच्या कालावधीत केवळ पाच घरांचे बांधकाम पूर्ण झाल्याची परिस्थिती आहे. घरांचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतरही लाभार्थींना अद्यापही घराचा ताबा मिळाला नसल्याची माहिती आहे. यावर खुद्द भाजपाचेच पश्‍चिम झोन सभापती अमोल गोगे यांनी आक्षेप नोंदवत एजन्सीच्या कामकाजावर ताशेरे ओढले आहेत. भाजपाच्या अनेक नगरसेवकांकडे प्रभागातील लाभार्थींंच्या याद्या उपलब्ध नाहीत. अशी परिस्थिती असतानाही योजनेचा लाभ मिळणार असल्याचा दावा सत्ताधारी भाजपाकडून केला जात आहे. 

म्हणे ६0 हजार अर्जांची नोंद‘जीआयएस’ प्रणालीद्वारे शहरातील मालमत्तांचा सर्व्हे केला असता १ लाख ५ हजार २00 मालमत्ता आढळून आल्या. नवीन प्रभागांमध्ये किमान ४४ हजार मालमत्ता असल्याची माहिती आहे. अर्थात, संपूर्ण शहरात १ लाख ४९ हजार २00 मालमत्ता असताना शून्य कन्सलटन्सीकडे ६0 हजार घरांसाठी अर्ज आल्याची माहिती आहे. यामध्ये काही नागरिकांना जुन्या घराच्या जागेवर नवीन घर बांधायचे असले तरी अनेक जण भाडेकरू म्हणून वास्तव्य करतात. त्यांच्याकडे जागा उपलब्ध नसल्यामुळे त्यांना कोणत्या ठिकाणी घर उभारून देणार, या प्रश्नाचे उत्तर तूर्तास मनपा व कन्सलटन्सीकडे नाही.

सत्ताधारी मार्ग कसे काढणार?‘पीएम’आवास योजनेसाठी पहिल्या टप्प्यात मनपाला ५२ कोटींचा निधी प्राप्त झाला. लाभार्थ्यांंना ३२२ चौरस फुटाच्या घरासाठी अडीच लाखांचे अनुदान दिले जाईल. तर उर्वरित रकमेसाठी लाभार्थ्यांंना बँकेतून कर्जाची उचल करावी लागेल. कर्ज भरण्याची क्षमता नसणार्‍या लाभार्थ्यांंनाही घरे मंजूर करून त्यांची बांधकामे सुरु करण्यात आली आहेत. घराचे बांधकाम सुरु होताच लाभार्थ्यांंनी त्यांचे बस्तान इतरत्र भाड्याच्या खोल्यांमध्ये हलविले आहे. कर्जाची रक्कम न मिळाल्यास घराचे बांधकाम पूर्ण होणार नाही. अशा विचित्र गर्तेत अडकलेल्या लाभार्थ्यांंच्या समस्येवर सत्ताधारी पक्ष व लोकप्रतिनिधी कसा मार्ग काढणार, याकडे सर्वांंचे लक्ष लागून आहे.

टॅग्स :Akola cityअकोला शहर