शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प प्रशासनाचा नवा नियम! नवीन व्हिसा ऑर्डरनुसार, लठ्ठपणा किंवा मधुमेहामुळे अमेरिकेत प्रवेश मिळणार नाही; इतर आजारांचाही उल्लेख
2
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
3
हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासूनच, दोन आठवड्यांचे कामकाज; २८ नोव्हेंबरपासून सचिवालय नागपुरात, पत्र आले
4
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
5
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
6
Women's World Cup : भारताच्या लेकींसह प्रेक्षकांनीही रचला इतिहास; ते पाहून ICC चा ऐतिहासिक निर्णय!
7
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
8
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
9
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
10
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
11
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
12
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
13
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
14
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
15
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
16
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
17
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
18
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
19
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
20
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट

जिल्हा परिषदेत अडकला पाणीटंचाई निवारणाचा आराखडा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2020 10:57 IST

पाणीटंचाई निवारणासाठी करावयाच्या उपाययोजनांचा आराखडा जिल्हा परिषदेत अडकल्याने, प्रशासकीय मान्यतेची प्रक्रिया रखडली आहे

- संतोष येलकर  लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : जिल्ह्यातील ग्रामीण भागात संभाव्य पाणीटंचाई निवारणासाठी दुसऱ्या व तिसºया टप्प्यातील पाणीटंचाई निवारणाचा कृती आराखडा जिल्हा परिषदेमार्फत अद्याप तयार करण्यात आला नाही. पाणीटंचाई निवारणासाठी करावयाच्या उपाययोजनांचा आराखडा जिल्हा परिषदेत अडकल्याने, प्रशासकीय मान्यतेची प्रक्रिया रखडली आहे. त्यामुळे पाणीटंचाई निवारणाचा कृती आराखडा तातडीने सादर करण्याचा आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्हा परिषदेला दिला आहे.यावर्षीच्या पावसाळ्यात समाधानकारक पाऊस झाल्याने जिल्ह्यातील धरणे, विहिरी, तलावांमध्ये पुरेसा जलसाठा उपलब्ध झाला असला तरी, पिण्यायोग्य पाण्याचे स्रोत उपलब्ध नसलेल्या जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये येत्या उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यानुषंगाने जिल्ह्यातील संभाव्य पाणीटंचाई निवारणासाठी जानेवारी ते मार्च आणि एप्रिल ते जून अखेरपर्यंत या दुसºया व तिसºया टप्प्यातील पाणीटंचाई निवारणाचा कृती आराखडा तयार करून मान्यतेसाठी सादर करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत गत १९ आॅक्टोबर व २ डिसेंबर रोजीच्या पत्राद्वारे जिल्हा परिषदेला देण्यात आले; परंतु जिल्हा परिषदेमार्फत पाणीटंचाई निवारणाचा कृती आराखडा अद्याप तयार करण्यात आला नसल्याने, कृती आराखड्यास जिल्हाधिकाºयांकडून प्रशासकीय मान्यता देण्याची प्रक्रिया रखडली. त्यामुळे पाणीटंचाई निवारणाचा कृती आराखडा तातडीने तयार करून, मान्यतेसाठी सादर करण्याचा आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी ४ जानेवारी रोजी जिल्हा परिषदेला पत्राद्वारे दिला आहे.मुदत संपली; पण सादर केला नाही आराखडा!जिल्ह्यातील पाणीटंचाई निवारणासाठी दुसºया व तिसºया टप्प्यातील पाणीटंचाई निवारणाचा कृती आराखडा तयार करून ६ जानेवारीपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयास सादर करण्याचा आदेश जिल्हाधिकाºयांमार्फत ४ जानेवारी रोजीच्या पत्राद्वारे जिल्हा परिषदेला देण्यात आला. त्यानुसार पाणीटंचाई निवारणाचा कृती आराखडा जिल्हाधिकारी कार्यालयास सादर करण्याची मुदत संपून चार दिवस उलटले; मात्र जिल्हा परिषदेमार्फत १० जानेवारीपर्यंत पाणीटंचाई निवारणाचा कृती आराखडा जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सादर करण्यात आला नाही.जिल्ह्यातील पाणीटंचाई निवारणाचा कृती आराखडा तयार करण्यासाठी सातही पंचायत समित्यांच्या गटविकास अधिकाºयांकडून (बीडीओ) उपाययोजनांचे प्रस्ताव मागविण्यात आले आहेत. प्रस्ताव प्राप्त झाल्यानंतर जिल्ह्यातील पाणीटंचाई निवारणाचा कृती आराखडा तयार करण्यात येणार आहे व मान्यतेसाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सादर करण्यात येणार आहे.-किशोर ढवळे,कार्यकारी अभियंता, जि. प. ग्रामीण पाणी पुरवठा विभाग.

टॅग्स :AkolaअकोलाAkola ZPअकोला जिल्हा परिषद