शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain Alert: रेड अलर्ट! महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यांना अत्यंत मुसळधार पावसाचा इशारा
2
Lufthansa Flight : 'Lufthansa'च्या विमानाला हैदराबादमध्ये उतरण्याची परवानगी नाकारली, जर्मनीला परतलं; नेमकं प्रकरण काय?
3
Mumbai: गिरगावमध्ये रस्त्याला भगदाड, बेस्ट बस पाच फूट खोल खड्यात, व्हिडीओ बघा
4
डोनाल्ड ट्रम्प यांनी वर्षभरात कमावले ₹५,१०० कोटी, कुठून आला त्यांच्याकडे इतका पैसा?
5
माकडाच्या हाती लागलं नोटांचं बंडल, झाडावर चढून केली ५००-५०० रुपयांच्या नोटांची उधळण, व्हिडीओ व्हायरल
6
इराण-इस्रायल संघर्षामुळे पाकिस्तानवर रडण्याची वेळ! पेट्रोल-डिझेलचे भाव भडकले, काय आहेत दर?
7
तुमच्या अनुभवाचा राज्याला काय उपयोग? कुंडमाळा पूल दुर्घटनेवरुन राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल
8
Ritual: अकाली मृत्यू येऊ नये म्हणून रोज झोपण्यापूर्वी करा 'ही' दोन ओळींची प्रार्थना!
9
आमदार, खासदार विकत घ्यायला पैसे आहेत पूल बांधायला नाही? मावळ दुर्घटनेवरुन राऊतांचा सवाल
10
Post Office च्या 'या' स्कीममध्ये हवी तितकी खाती उघडू शकता, हमी परताव्यासह मिळेल Tax मध्येही सूट
11
इंग्लंडविरूद्धच्या टेस्टसाठी शार्दुल ठाकूरला 'प्लेइंग ११'मध्ये संधीची शक्यता, 'या' खेळाडूला डच्चू?
12
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
13
Israel-Iran War : भारताला अडकवण्याचा प्रयत्न करणारा चीनच स्वत:च अडकला, इस्रायलच्या इराणवरील हल्ल्यानं ड्रॅगनलाही फटका
14
"आई कुठे काय करते मला सोडायची नव्हती पण...", संजनाची भूमिका साकारलेल्या दिपाली पानसरेने सांगितलं नेमकं कारण
15
"मंत्रालयातून उडी मारावी लागेल अशी वेळ.."; ज्येष्ठ मराठी अभिनेत्याची बिकट अवस्था, म्हणाला- "वय झाल्यामुळे.."
16
तुमचा पैसा तयार ठेवा! 'या' आठवड्यात ६ नवे IPO बाजारात, बंपर कमाईची संधी?
17
Navi Mumbai Suicide: १२ हजार रुपयांत संपूर्ण कुटुंबाचा खर्च चालवायचा कसा? तरुणीने संपवले जीवन
18
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
19
१०-१५ हजारांत संसाराचा गाडा हाकायचा कसा? राज्यातील शिक्षणसेवकांचा सवाल
20
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?

अकोला जिल्ह्यात ३८ ते ४० हजार हेक्टर सिंचनाचे नियोजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2019 14:21 IST

पाटबंधारे विभागाने यावर्षी विक्रमी म्हणजे ३८ ते ४० हजार हेक्टर सिंचनाचे नियोजन केले आहे; परंतु हे पाणी सोडणार केव्हा, हा प्रश्न आहे.

अकोला : जिल्ह्यात प्रकल्प तुडुंब भरलेले असून, रब्बी हंगामातील पिकांना सिंचनासाठी पाणी सोडण्यात येणार आहे. पाटबंधारे विभागाने यावर्षी विक्रमी म्हणजे ३८ ते ४० हजार हेक्टर सिंचनाचे नियोजन केले आहे; परंतु हे पाणी सोडणार केव्हा, हा प्रश्न आहे.काटेपूर्णा प्र्रकल्पात जुलै महिन्यापर्यंत अत्यंत अल्प जलसाठा शिल्लक राहिल्याने पाणीटंचाईचे भीषण संकट उभे ठाकले होते. इतरही सर्वच धरणांचा जलसाठा तळाला लागला होता. परतीच्या पावसाने सर्वच प्रकल्पातील जलसाठा वाढला असून, सर्वच मोठे, मध्यम प्रकल्पात मुबलक जलसाठा उपलब्ध झाला आहे. यावर्षी अकोला पूर संरक्षण योजनेंतर्गत बांधण्यात आलेल्या दगडपारवा प्रकल्पातही आजमितीस मुबलक जलसाठा आहे. काटेपूर्णा व वान या मोठ्या प्रकल्पात १०० टक्के जलसाठा आहे. मोर्णा, निर्गुणा मध्यम प्रकल्पातही शंभर टक्के जलसाठा असून, उमा प्रकल्पात जलसाठा उपलब्ध आहे. त्यामुळे यावर्षी रब्बी हंगामासाठी मुबलक पाणी असल्याने सिंचनासाठी पाणी मिळणार आहे.काटेपूर्णा प्रकल्पातून ८ हजार हेक्टरवर सिंंचनासाठी पाणी सोडण्यात येत असते. यावर्षी या प्रकल्पातून रब्बी हंगामात शेतकऱ्यांच्या शेवटच्या टोकापर्यंत शेतीला पाणी सोडण्यात येणार आहे.अकोला उपविभागांतर्गत मोर्णा, निर्गुणा व दगडपारवा प्रकल्पातून १२ हजार हेक्टरवर सिंंचनासाठी पाणी देण्यात येणार आहे. उमा व घुंगशी बॅरेजमधून रब्बी हंगामाला पाणी सोडण्याचे नियोजन करण्यात आले आहे. यावर्षी हे सर्व प्रकल्प मिळून ३८ ते ४० हजार हेक्टरवर सिंचन व्यवस्था अपेक्षित असल्याचे पाटबंधारे विभागाच्या अभियंत्याचे म्हणणे आहे.रब्बी पिकांंसाठी यावर्षी पाणी सोडण्यात येणार असले तरी उन्हाळी पिकांबाबत साशंकता आहे. अकोला उपविभागांतर्गत मात्र उन्हाळी पिकांना पाणी सोडण्यात येण्याची शक्यता पाटबंधारे अभियंत्याकडून वर्तविण्यात येत आहे. काटेपूर्णा धरणातून पाणी सोडण्यात येणार की नाही, हे रब्बी हंगामातील पाणी वापरल्यानंतर कळणार आहे; परंतु शेतकऱ्यांना मात्र उन्हाळी पिकांनाही पाणी मिळेल, अशी अपेक्षा आहे.

टॅग्स :AkolaअकोलाIrrigation Projectsपाटबंधारे प्रकल्पagricultureशेतीFarmerशेतकरी