शहरं
Join us  
Trending Stories
1
शटडाऊनमुळे अमेरिका मोठ्या संकटात; ७.५० लाख सरकारी कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
2
राशीभविष्य २ ऑक्टोबर २०२५: आज कामात यश मिळून आर्थिक लाभ होतील, नशिबाची साथ मिळेल
3
युक्रेन युद्धानंतर पुतिन पहिल्यांदाच भारत दौऱ्यावर येणार, अनेक करारांवर स्वाक्षऱ्या होणार
4
टीका, हल्ले झाले तरी संघाने कधीही कटुता बाळगली नाही; पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन : ‘राष्ट्र प्रथम’ हे संघाचे तत्त्व महत्त्वाचे
5
केंद्रीय मंत्रिमंडळाची दसरा भेट : ४९.१९ लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांसह ६८.७२ लाख निवृत्तीवेतनधारकांना मिळणार लाभ
6
आज गाजणार मेळावे! वाचा महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या सभांचे वेळापत्रक आणि प्रमुख मुद्दे
7
भ्रष्टाचारात महाराष्ट्र सलग तिसऱ्या वर्षी देशात टॉप; पुण्यात सर्वाधिक लाचखोर!
8
ईएमआय भरले म्हणून पती संयुक्त मालमत्तेवर एकट्याने मालकीचा दावा करू शकत नाही!
9
५७ केंद्रीय विद्यालयांना केंद्राने दिली मंजुरी; महाराष्ट्रातील चार जिल्ह्यांचा यादीत समावेश
10
रा. स्व. संघाने शिकवली फक्त शिस्त आणि सेवा! मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितली संघ शाखेतील प्रार्थनेची शक्ती
11
संघ शताब्दी आणि राज्यघटना; शताब्दीच्या उंबरठ्यावर रा.स्व.संघ आणि 'अमृतमहोत्सवी' संविधान!
12
अनुकंपाच्या तब्बल ५,१८७ उमेदवारांना मिळणार नियुक्तिपत्रे; एकाच दिवशी १० हजार जण नोकरीत हाेणार रुजू
13
ट्रम्प यांच्या योजनेला हमास मान्यता देईना; इस्रायलने गाझावर केलेल्या हल्ल्यात १६ जण ठार
14
"कतारवर हल्ला म्हणजे अमेरिकेवर हल्ला, पुन्हा असं घडलं तर..."; ट्रम्प यांचा इस्रायलला इशारा
15
"माझ्या पतीची बिनशर्त सुटका करा..."; सोनम वांगचुक यांच्या पत्नीचे थेट राष्ट्रपतींना पत्र
16
भिवंडीतील मानकोली येथे वह्या बनवणाऱ्या कंपनीच्या गोदामाला आग; सुदैवाने जीवितहानी नाही
17
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम
18
“मराठा समाजाला आरक्षणाची अत्यंत गरज, पण सरकारने...”; खासदार शाहू महाराजांनी व्यक्त केली खंत
19
ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागप्रमुखाला २५ लाखांची लाच घेताना अटक; अगोदर घेतलेले १० लाख
20
देश सर्वप्रथम!- नि:स्पृह राष्ट्रसाधनेची १०० वर्षे!

अकोला जिल्ह्यात ३८ ते ४० हजार हेक्टर सिंचनाचे नियोजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2019 14:21 IST

पाटबंधारे विभागाने यावर्षी विक्रमी म्हणजे ३८ ते ४० हजार हेक्टर सिंचनाचे नियोजन केले आहे; परंतु हे पाणी सोडणार केव्हा, हा प्रश्न आहे.

अकोला : जिल्ह्यात प्रकल्प तुडुंब भरलेले असून, रब्बी हंगामातील पिकांना सिंचनासाठी पाणी सोडण्यात येणार आहे. पाटबंधारे विभागाने यावर्षी विक्रमी म्हणजे ३८ ते ४० हजार हेक्टर सिंचनाचे नियोजन केले आहे; परंतु हे पाणी सोडणार केव्हा, हा प्रश्न आहे.काटेपूर्णा प्र्रकल्पात जुलै महिन्यापर्यंत अत्यंत अल्प जलसाठा शिल्लक राहिल्याने पाणीटंचाईचे भीषण संकट उभे ठाकले होते. इतरही सर्वच धरणांचा जलसाठा तळाला लागला होता. परतीच्या पावसाने सर्वच प्रकल्पातील जलसाठा वाढला असून, सर्वच मोठे, मध्यम प्रकल्पात मुबलक जलसाठा उपलब्ध झाला आहे. यावर्षी अकोला पूर संरक्षण योजनेंतर्गत बांधण्यात आलेल्या दगडपारवा प्रकल्पातही आजमितीस मुबलक जलसाठा आहे. काटेपूर्णा व वान या मोठ्या प्रकल्पात १०० टक्के जलसाठा आहे. मोर्णा, निर्गुणा मध्यम प्रकल्पातही शंभर टक्के जलसाठा असून, उमा प्रकल्पात जलसाठा उपलब्ध आहे. त्यामुळे यावर्षी रब्बी हंगामासाठी मुबलक पाणी असल्याने सिंचनासाठी पाणी मिळणार आहे.काटेपूर्णा प्रकल्पातून ८ हजार हेक्टरवर सिंंचनासाठी पाणी सोडण्यात येत असते. यावर्षी या प्रकल्पातून रब्बी हंगामात शेतकऱ्यांच्या शेवटच्या टोकापर्यंत शेतीला पाणी सोडण्यात येणार आहे.अकोला उपविभागांतर्गत मोर्णा, निर्गुणा व दगडपारवा प्रकल्पातून १२ हजार हेक्टरवर सिंंचनासाठी पाणी देण्यात येणार आहे. उमा व घुंगशी बॅरेजमधून रब्बी हंगामाला पाणी सोडण्याचे नियोजन करण्यात आले आहे. यावर्षी हे सर्व प्रकल्प मिळून ३८ ते ४० हजार हेक्टरवर सिंचन व्यवस्था अपेक्षित असल्याचे पाटबंधारे विभागाच्या अभियंत्याचे म्हणणे आहे.रब्बी पिकांंसाठी यावर्षी पाणी सोडण्यात येणार असले तरी उन्हाळी पिकांबाबत साशंकता आहे. अकोला उपविभागांतर्गत मात्र उन्हाळी पिकांना पाणी सोडण्यात येण्याची शक्यता पाटबंधारे अभियंत्याकडून वर्तविण्यात येत आहे. काटेपूर्णा धरणातून पाणी सोडण्यात येणार की नाही, हे रब्बी हंगामातील पाणी वापरल्यानंतर कळणार आहे; परंतु शेतकऱ्यांना मात्र उन्हाळी पिकांनाही पाणी मिळेल, अशी अपेक्षा आहे.

टॅग्स :AkolaअकोलाIrrigation Projectsपाटबंधारे प्रकल्पagricultureशेतीFarmerशेतकरी