शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

अकोला जिल्ह्यात ‘रेणू’ योजना राबविण्याचे नियोजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2019 12:17 IST

‘रेणू’ उपक्रमाची सुरुवात अकोला जिल्हा परिषदेतून सुरू करण्याचा प्रयत्न मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी चालविला आहे.

अकोला : ग्रामीण भागातील महिलांना उद्योग निर्मिती, त्याचा विकास आणि संचालनातून रोजगार निर्मितीचा उपक्रम म्हणून अकोला जिल्ह्यात ‘रेणू’ योजना राबविण्याचे नियोजन जिल्हा परिषद प्रशासनाने केले आहे. त्यासाठी जिल्हा अग्रणी बँकेसह सर्वच बँकांना पत्र देत त्याबाबत माहिती देण्यात आली आहे.महिलांमध्ये उद्योगाबाबत रुची निर्माण करणे, तसेच समूहातील नेतृत्व तयार करण्यासाठी हा उपक्रम महत्त्वाचा ठरणार आहे. ‘रेणू’ उपक्रमाची सुरुवात अकोला जिल्हा परिषदेतून सुरू करण्याचा प्रयत्न मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी चालविला आहे. महिला उद्योग निर्मितीसाठी सक्षम यंत्रणांच्या मंजुरीनंतरच सुरुवात होणार आहे. त्यासाठी महिला बचत गट आणि त्यांच्या उद्योग प्रकल्पांची पाहणी निकषानुसार करण्याचेही सांगण्यात आले आहे. या उपक्रमासाठी मुद्रा, स्टॅण्डअप इंडिया, स्टार्ट अप इंडिया किंवा स्वयं साहाय्यता बचत गटांसाठी कर्ज घेतलेले समूह पात्र ठरणार आहेत. जिल्ह्यातील कोणत्याही गावात त्या बचत गटाचे नोंदणीकृत कार्यालय आवश्यक आहे. कोणत्याही योजनेतील कर्ज मंजुरी लगतच्या म्हणजे, २०१८-१९ किंवा २०१९-२०२० या वर्षातीलच असावी, तसेच महिला उद्योग, बचत गटांचे बँक खाते थकीत असू नये किंवा कोणत्याही कारणास्तव निधी इतरत्र वापरलेला नसावा, या निकषावर ही तपासणी केली जात आहे.या निकषानुसार पात्र महिला समूह, बचत गटांची माहिती बँकांकडून मागविण्यात आली. त्या महिलांची कार्यशाळा जिल्हा परिषदेत घेतली जाईल. त्यामध्ये रेणू योजनेची निवड प्रक्रिया त्यांना सांगितली जाणार आहे. निवड झालेल्या समूहांना अनुदान मिळणार आहे. त्यासाठी त्यांना मॉर्जिन मनीची अट आहे. सोबतच केंद्र शासनाच्या इतर योजनांतून मिळालेल्या कर्जाचाही त्यामध्ये सहभाग असेल. ही योजना जिल्हा परिषद प्रशासनाकडून सुरू होत आहे. त्याचा लाभ घेण्याचे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी केले आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाAkola ZPअकोला जिल्हा परिषद