शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगामसारखा आणखी एक दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता; गुप्तचर विभागाची माहिती, यंत्रणा अलर्ट
2
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
3
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
4
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
5
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
6
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
7
May Born Astro: राजसी, आकर्षक पण तापट स्वभाव, वाचा मे महिन्यात जन्मलेल्या लोकांचे गुण दोष!
8
पळून गेलेले सासू-जावई सापडले, ७२ तास पोलिसांना दिला चकवा; म्हणाली, "मी फक्त माझ्या..."
9
कोलकाता आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू; PM मोदींनी शोक व्यक्त करत जाहीर केली २ लाखांची मदत
10
PF सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये ३ पट वाढ होणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा
11
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
12
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू
13
Stock Market Today: पळून थकला का शेअर बाजार? ८२ अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला; ऑटो-PSU Bank मध्ये विक्री
14
आता अमेरिकेतील दीड लाख भारतीय ट्रकचालक संकटात; अस्खलित इंग्रजीतच बोलण्याचा ट्रम्प यांनी काढला नवा आदेश
15
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
16
₹७७ लाखांचं घर : Home Loan EMI भरावे की SIP करावी, घर खरेदीची स्मार्ट पद्धत कोणती? पाहा कॅलक्युलेश
17
MBBS युवतीचा संशयास्पद मृत्यू, दिल्लीला परीक्षेला गेली होती; जळालेल्या अवस्थेत...
18
'या' कंपनीनं केली दुधाच्या दरात वाढ; आजपासून लागू होणार नवे दर, कारण काय?
19
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
20
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू

खरीप हंगामाचे नियोजन ३० एप्रिलपर्यंत करा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2020 10:51 IST

खरीप हंगामाचे नियोजनही ३० एप्रिलपर्यंत करावे, अशा सूचना कृषिमंत्री दादा भुसे यांनी राज्यातील सर्व कृषी अधिकाऱ्यांना केले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : कोरोना व्हायरस जगाला वेठीस धरत असून, राज्यातही हात-पाय पसरले आहे. हा प्रसार रोखण्यासाठी देशात टाळेबंदी घोषित करण्यात आली आहे. अशा परिस्थितीत शेतकरी केंद्रबिंदू मानून शासन काम करीत आहे. येत्या खरीप हंगामाचे नियोजनही ३० एप्रिलपर्यंत करावे, अशा सूचना कृषिमंत्री दादा भुसे यांनी राज्यातील सर्व कृषी अधिकाऱ्यांना केले आहेत.देशात दुसºया टप्प्याची टाळेबंदी सुरू होत असून, त्यात देखील आपण यशस्वी होऊ; पण त्यासाठी विविध विभागांसह कृषी खात्याचे महत्त्वाचे योगदान आहे. या काळात शेतमाल आणि शेतकऱ्यांची भूमिका महत्त्वाची असल्याची जाणीव झाली आहे. खºया अर्थाने जगाचा पोशिंदा म्हणून शेतकºयांनी स्वत:चे स्थान सिद्ध केले आहे. शेतमालाशिवाय जगणे कठीण आहे, हे भाजीमंडीतील गर्दीवरून सिद्ध झाले आहे.जीवनावश्यक वस्तूंमध्ये शेतकरी किती महत्त्वाचा घटक आहे, हे या परिस्थितीने मान्य केले आहे; परंतु १५ एप्रिलपासून टाळेबंदीचा दुसरा टप्पा सुरू होत असून, या टप्प्यात खरिपाचे नियोजन करावे लागणार आहे. आपण सर्वांनी शेतकºयांच्या पाठीशी उभे राहावे, असे आवाहनही कृषिमंत्र्यांनी केले आहे.शासनाने याबाबत सर्व योजना व कामांचा आराखडा दिला आहे. शेतकरी सन्मान आणि मार्गदर्शन, ग्राम सदस्य समिती, महिला शेतीशाळा, शेतकरी विचार मंच, प्रत्येक जिल्ह्यातील प्रमुख पिकांचे तीन प्रकार, दिशा ठरवताना शेतकºयांचे उत्पन्न, उत्पादन कसे वाढेल, याचा विचार करावा. जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांशी बोलून नियोजनाची तयारी करावी, त्यामुळे शेतकरी योजनांचा अंतर्भाव असावा, पंतप्रधान पीक विमा योजना, तसेच फळ पिकासाठी हवामान आधारित विमा योजना याचे अचूक नियोजन करावे. गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेच्या अंमलबजावणीसाठी कृती आराखडा तयार करावा, पोकरा योजनेच्या सर्व घटकांचा समावेश या योजनेत करावा, लाभार्थी निवडीसाठी आॅनलाइन प्रक्रिया, सर्व योजना घटकांसाठी एकच अर्ज व अभियानाचादेखील नियोजनात समावेश असावा. ठिबक सिंचन, शेततळे अस्तरीकरण यांचा नवीन मार्गदर्शक सूचनेनुसार कारवाई करण्यासाठी योजनेत नमूद करावे.३० एप्रिलपर्यंत सर्व तयारी करून ठेवावी. मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली होणाºया व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सर्व योजनांना मंजुरी देण्यात येईल, असे आवाहनही कृषिमंत्र्यांनी केले आहे. या सूचना त्यांनी कृषी सचिव एकनाथ डवले यांना दिल्या आहेत.

 

टॅग्स :Akolaअकोलाagricultureशेती