शहरं
Join us  
Trending Stories
1
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले
2
वर्ल्ड बँकेकडून पाकिस्तानला ७०० मिलियन डॉलर्ची 'खैरात', भारताच्या विरोधानंतरही मिळाले कर्ज
3
इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत
4
"तुम्ही एक कोटी देताय; मी एअर इंडियाला दोन कोटी देते, माझे वडील परत द्या"; बाप गमावला, मुलीच्या अश्रूंचा फुटला बांध
5
झापुक-झुपुक...! देशी कंपनीने एकाचवेळी दोन स्वस्त ५जी फोन लाँच केले, स्मार्टफोन मार्केटमध्ये अजून काय हवे...
6
"जे स्वतःला सिंहाप्रमाणे...!" इराणवर हल्ला करण्यापूर्वी नेतन्याहू यांनी 'या' पवित्र भिंतीवर सोडली खास 'नोट'? काय आहे याचा अर्थ?
7
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
8
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
9
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
10
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
11
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
12
'जीवन खूप मौल्यवान आहे...' अहमदाबाद विमान अपघातानंतर केविन पीटरसनने भावनिक पोस्ट!
13
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
14
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
15
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
16
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
17
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
18
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
19
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
20
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस

कपाशीवर गुलाबी बोंडअळीचा प्रकोप वाढला!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2019 14:42 IST

अकोला जिल्ह्यातील शेतकºयांने तर चार एकरावरील कापसाचे उभे पीक कापून टाकले आहे.

- राजरत्न सिरसाट

अकोला :आतापर्यंत सुप्त अवस्थेत असलेल्या गुलाबी बोंडअळीचा कपाशीवर प्रकोप वाढला असून,अगोदरच विविध संकटाच्या मालिकांचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांवर पुन्हा हे संकट उभे ठाकले आहे.बोंडअळीने त्रस्त अकोला जिल्ह्यातील शेतकºयांने तर चार एकरावरील कापसाचे उभे पीक कापून टाकले आहे.या अस्मानी,सुलतानी संकटाचा सामना करणारा शेतकरी आता धास्तावला आहे.यावर्षी सुरुवातीला पाऊस उशिरा सुरू झाल्याने पेरण्या खोळबंल्या होत्या. पाऊस आला, पेरण्या झाल्या; पण पावसाचा दीर्घ खंड पडल्याने अनेक भागात पेरण्या उलटल्या. शेतकºयांना पेरणी केलेल्या पिकांवर नांगर फिरविला. मूग, उडीद पीक हातचे गेले. उष्ण, दमट वातावरण किडींना पोषक ठरल्याने सोयाबीन पिकावर पाच जातींच्या किडींनी आक्रमण केले. कपाशीवर तुडतुडे, मावासारखी कीड वाढली होती. इतर पिकावरही कीड वाढली. या किडींवर नियंत्रण मिळविण्यासाठी शेतकºयांना तीन ते चार वेळा कीटकनाशक फवारणी करावी लागल्याने खर्च वाढला. या स्थितीचा सामना करीत असतानाच पीक वाढीच्या अवस्थेतच पावसाने झडी लावली. दोन महिने सतत पाऊस पडत होता. सततच्या पावसामुळे शेतात बुरशी तयार झाली. पिकांना व त्यांच्या मुळांना प्रकाशसंश्लेषण होत नसल्याने पिके सडण्याचे प्रकार घडले. पीक परिपक्वतेच्या काळातही पाऊस उसंत देत नव्हता. परतीच्या पावसानेही कहर केल्याने उरले-सुरले पीकही हातचे गेले. सोयाबीन, ज्वारी काळी ठिक्क र पडली. कपाशी पाण्यात भिजली. परिणामी प्रतवारी घसरल्याने या पिकांचे दर बाजारात घटले. नाफेडप्रमाणे व्यापाºयांनही प्रतवारीचे निकष लावल्याने हाती आलेले अल्प पिकांना अल्प दरात विकून शेतकºयांना समाधान मानावे लागत आहे.या परिस्थितीचा सामना करीत असताना बोंडअळीने त्रस्त अकोला जिल्ह्यातील शेतकºयांनी चार एकरावरील कपाशीचे पीक कापून टाकले आहे. यामुळे कृषी शास्त्रज्ञासह कृषी विभागात खळबळ उडाली आहे. ही अळी एका शेतातून वेगाने दुसºया शेतातील कपाशीवर आश्रय घेत कपाशीचे मोठ्या प्रमाणात नुकसान करते.- कपाशीवरील गुलाबी बोंडअळीच्या सर्वेक्षणसाठी कृषी विद्यापीठाच्या कापूस प्रक्षेत्रावर कामगंध सापळे लावण्यात आले आहेत. त्यात मोठ्या प्रमाणात बोंडअळीचे पतंग सापडले आहेत. अनेक भागातील कापूस पट्ट्यात ही परिस्थिती असू शकते; परंतु शेतकºयांनी घाबरू न न जाता कृषी विद्यापीठाच्या शिफारशीनुसार कीटकनाशक फवारणी करावी तसेच कामगंध सापळ््यांचा वापर करावा.डॉ. डी.बी. उंदिरवाडे,विभागप्रमुख कीटकशास्त्र,डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ

 

टॅग्स :AkolaअकोलाFarmerशेतकरीagricultureशेती