शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

राज्यातील १६४ गावांमध्ये आढळली गुलाबी बोंडअळी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2018 13:05 IST

अकोला : कपाशीवरील गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव कायम असून, कृषी विभागाने २,९३६ गावांत सर्वेक्षण केले. यात १६४ गावांतील कपाशी पिकावर बोंडअळी आढळून आली आहे.

अकोला : कपाशीवरील गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव कायम असून, कृषी विभागाने २,९३६ गावांत सर्वेक्षण केले. यात १६४ गावांतील कपाशी पिकावर बोंडअळी आढळून आली आहे. राज्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी फरदड कापूस उत्पादन घेतल्यास या किडीचा पुढचा मोठा धोका निर्माण होण्याची शक्यता कृषी तज्ज्ञांकरवी वर्तविली जात आहे.राज्यातील कापसाचे क्षेत्र सरासरी ४१.९१ लाख हेक्टर आहे. तथापि, चालू खरीप हंगामात ४२.५३ लाख हेक्टरवर कापूस पिकाची लागवड करण्यात आली आहे. यात बहुतांश बीटी वाणाचा समावेश आहे. गुलाबी बोंडअळीवर पतंग आढळल्याने कृषी विभाग, विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी नोव्हेंबर महिन्यात आठ दिवस राज्यातील २,९३६ गावातील कपाशी पिकाचे सर्वेक्षण केले. या सर्वेक्षणात मागच्या वर्षीच्या तुलनेत कमी; पण १६४ गावातील कपाशी पिकावर ही गुलाबी बोंडअळी आढळून आली. या अळीला खाद्य मिळत राहिल्यास तिचे जीवनचक्र सतत पुढे चालत राहते. फरदड कापसापासून थोडेफार उत्पादन मिळत असले, तरी या किडीचा पुढील हंगामातील प्रादुर्भाव टाळण्यासाठी शेतकºयांनी फरदड न घेता कपाशीच्या पºहाटी ही ग्रेडर, रोटाव्हेटर यांसारख्या यंत्राचा वापर करू न जमिनीत गाडणे क्रमप्राप्त आहे. ही उपाययोजना केल्यास जमिनीची सुपिकता वाढण्यास तसेच गुलाबी बोंडअळीचे जीवनचक्र खंडित होण्यास मदत होईल. शेत पाच ते सहा महिने कापूस विरहीत ठेवल्यास बोंडअळीचे जीवनचक्र संपुष्ठात येत असल्याचा दावा कृषी विभागाने केला आहे.सध्या वेचणी केलेला कापूस मार्केट यार्ड, जिनिंग- प्रेसिंग मिलमध्ये येत आहे. त्या ठिकाणीही गुलाबी बोंडअळी व्यवस्थापनाची कारवाई करणे गरजेचे आहे. म्हणूनच मार्केट यार्ड, गोडाउन, जिनिंग-पे्रसिंग मिल्स, संस्थांनी कपाशीवरील अळ््या, कोष तसेच पतंग नष्ट करावे, त्यासाठी प्रकाश, कामगंध सापळे लावण्याची नितांत गरज आहे.

यंत्रावर अनुदानकपाशीच्या पºहाट्या नष्ट करण्यासाठी यंत्रावर कृषी विभागाने अनुदान उपलब्ध करू न देण्यात आले आहे. शेतकºयांनी यंत्राचा लाभ घेण्याची गरज आहे.

गुलाबी बोंडअळीवर नियंत्रण मिळविण्यासाठी शेतकºयांनी फरदडीचा कापूस घेऊ नये, फरदड कापूस न घेतल्यास बोंडअळीचे जीवनचक्र संपुष्ठात येण्यासाठी मदत होईल. येत्या हंगामापूर्वी शेतकरी तसेच सर्व संबंधित यंत्रणांनी संयुक्तपणे मोहीम स्वरू पात तातडीने उपाययोजना करावी.- सचिंद्र प्रताप सिंह,आयुक्त, कृषी,पुणे.

 

टॅग्स :Akolaअकोलाagricultureशेती