शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
5
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
6
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
7
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
8
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
9
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
10
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
11
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
12
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
13
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
14
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
15
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
16
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
17
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
18
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
19
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
20
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!

राज्यातील १६४ गावांमध्ये आढळली गुलाबी बोंडअळी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2018 13:05 IST

अकोला : कपाशीवरील गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव कायम असून, कृषी विभागाने २,९३६ गावांत सर्वेक्षण केले. यात १६४ गावांतील कपाशी पिकावर बोंडअळी आढळून आली आहे.

अकोला : कपाशीवरील गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव कायम असून, कृषी विभागाने २,९३६ गावांत सर्वेक्षण केले. यात १६४ गावांतील कपाशी पिकावर बोंडअळी आढळून आली आहे. राज्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी फरदड कापूस उत्पादन घेतल्यास या किडीचा पुढचा मोठा धोका निर्माण होण्याची शक्यता कृषी तज्ज्ञांकरवी वर्तविली जात आहे.राज्यातील कापसाचे क्षेत्र सरासरी ४१.९१ लाख हेक्टर आहे. तथापि, चालू खरीप हंगामात ४२.५३ लाख हेक्टरवर कापूस पिकाची लागवड करण्यात आली आहे. यात बहुतांश बीटी वाणाचा समावेश आहे. गुलाबी बोंडअळीवर पतंग आढळल्याने कृषी विभाग, विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी नोव्हेंबर महिन्यात आठ दिवस राज्यातील २,९३६ गावातील कपाशी पिकाचे सर्वेक्षण केले. या सर्वेक्षणात मागच्या वर्षीच्या तुलनेत कमी; पण १६४ गावातील कपाशी पिकावर ही गुलाबी बोंडअळी आढळून आली. या अळीला खाद्य मिळत राहिल्यास तिचे जीवनचक्र सतत पुढे चालत राहते. फरदड कापसापासून थोडेफार उत्पादन मिळत असले, तरी या किडीचा पुढील हंगामातील प्रादुर्भाव टाळण्यासाठी शेतकºयांनी फरदड न घेता कपाशीच्या पºहाटी ही ग्रेडर, रोटाव्हेटर यांसारख्या यंत्राचा वापर करू न जमिनीत गाडणे क्रमप्राप्त आहे. ही उपाययोजना केल्यास जमिनीची सुपिकता वाढण्यास तसेच गुलाबी बोंडअळीचे जीवनचक्र खंडित होण्यास मदत होईल. शेत पाच ते सहा महिने कापूस विरहीत ठेवल्यास बोंडअळीचे जीवनचक्र संपुष्ठात येत असल्याचा दावा कृषी विभागाने केला आहे.सध्या वेचणी केलेला कापूस मार्केट यार्ड, जिनिंग- प्रेसिंग मिलमध्ये येत आहे. त्या ठिकाणीही गुलाबी बोंडअळी व्यवस्थापनाची कारवाई करणे गरजेचे आहे. म्हणूनच मार्केट यार्ड, गोडाउन, जिनिंग-पे्रसिंग मिल्स, संस्थांनी कपाशीवरील अळ््या, कोष तसेच पतंग नष्ट करावे, त्यासाठी प्रकाश, कामगंध सापळे लावण्याची नितांत गरज आहे.

यंत्रावर अनुदानकपाशीच्या पºहाट्या नष्ट करण्यासाठी यंत्रावर कृषी विभागाने अनुदान उपलब्ध करू न देण्यात आले आहे. शेतकºयांनी यंत्राचा लाभ घेण्याची गरज आहे.

गुलाबी बोंडअळीवर नियंत्रण मिळविण्यासाठी शेतकºयांनी फरदडीचा कापूस घेऊ नये, फरदड कापूस न घेतल्यास बोंडअळीचे जीवनचक्र संपुष्ठात येण्यासाठी मदत होईल. येत्या हंगामापूर्वी शेतकरी तसेच सर्व संबंधित यंत्रणांनी संयुक्तपणे मोहीम स्वरू पात तातडीने उपाययोजना करावी.- सचिंद्र प्रताप सिंह,आयुक्त, कृषी,पुणे.

 

टॅग्स :Akolaअकोलाagricultureशेती