शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

राज्यातील १६४ गावांमध्ये आढळली गुलाबी बोंडअळी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2018 13:05 IST

अकोला : कपाशीवरील गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव कायम असून, कृषी विभागाने २,९३६ गावांत सर्वेक्षण केले. यात १६४ गावांतील कपाशी पिकावर बोंडअळी आढळून आली आहे.

अकोला : कपाशीवरील गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव कायम असून, कृषी विभागाने २,९३६ गावांत सर्वेक्षण केले. यात १६४ गावांतील कपाशी पिकावर बोंडअळी आढळून आली आहे. राज्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी फरदड कापूस उत्पादन घेतल्यास या किडीचा पुढचा मोठा धोका निर्माण होण्याची शक्यता कृषी तज्ज्ञांकरवी वर्तविली जात आहे.राज्यातील कापसाचे क्षेत्र सरासरी ४१.९१ लाख हेक्टर आहे. तथापि, चालू खरीप हंगामात ४२.५३ लाख हेक्टरवर कापूस पिकाची लागवड करण्यात आली आहे. यात बहुतांश बीटी वाणाचा समावेश आहे. गुलाबी बोंडअळीवर पतंग आढळल्याने कृषी विभाग, विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी नोव्हेंबर महिन्यात आठ दिवस राज्यातील २,९३६ गावातील कपाशी पिकाचे सर्वेक्षण केले. या सर्वेक्षणात मागच्या वर्षीच्या तुलनेत कमी; पण १६४ गावातील कपाशी पिकावर ही गुलाबी बोंडअळी आढळून आली. या अळीला खाद्य मिळत राहिल्यास तिचे जीवनचक्र सतत पुढे चालत राहते. फरदड कापसापासून थोडेफार उत्पादन मिळत असले, तरी या किडीचा पुढील हंगामातील प्रादुर्भाव टाळण्यासाठी शेतकºयांनी फरदड न घेता कपाशीच्या पºहाटी ही ग्रेडर, रोटाव्हेटर यांसारख्या यंत्राचा वापर करू न जमिनीत गाडणे क्रमप्राप्त आहे. ही उपाययोजना केल्यास जमिनीची सुपिकता वाढण्यास तसेच गुलाबी बोंडअळीचे जीवनचक्र खंडित होण्यास मदत होईल. शेत पाच ते सहा महिने कापूस विरहीत ठेवल्यास बोंडअळीचे जीवनचक्र संपुष्ठात येत असल्याचा दावा कृषी विभागाने केला आहे.सध्या वेचणी केलेला कापूस मार्केट यार्ड, जिनिंग- प्रेसिंग मिलमध्ये येत आहे. त्या ठिकाणीही गुलाबी बोंडअळी व्यवस्थापनाची कारवाई करणे गरजेचे आहे. म्हणूनच मार्केट यार्ड, गोडाउन, जिनिंग-पे्रसिंग मिल्स, संस्थांनी कपाशीवरील अळ््या, कोष तसेच पतंग नष्ट करावे, त्यासाठी प्रकाश, कामगंध सापळे लावण्याची नितांत गरज आहे.

यंत्रावर अनुदानकपाशीच्या पºहाट्या नष्ट करण्यासाठी यंत्रावर कृषी विभागाने अनुदान उपलब्ध करू न देण्यात आले आहे. शेतकºयांनी यंत्राचा लाभ घेण्याची गरज आहे.

गुलाबी बोंडअळीवर नियंत्रण मिळविण्यासाठी शेतकºयांनी फरदडीचा कापूस घेऊ नये, फरदड कापूस न घेतल्यास बोंडअळीचे जीवनचक्र संपुष्ठात येण्यासाठी मदत होईल. येत्या हंगामापूर्वी शेतकरी तसेच सर्व संबंधित यंत्रणांनी संयुक्तपणे मोहीम स्वरू पात तातडीने उपाययोजना करावी.- सचिंद्र प्रताप सिंह,आयुक्त, कृषी,पुणे.

 

टॅग्स :Akolaअकोलाagricultureशेती