नीलेश शहाकार/बुलडाणा : लहान मुलांकडून काम करून घेणे हा गुन्हा असला तरी राज्यात अनेक ठिकाणी बालकामगारांचे हात आजही कामांमध्ये जखडले आहेत. राज्यात विविध हॉटेल्समध्ये ३६ टक्के आणि विटभट्टय़ांवर २६ टक्के बालकामगारांना जुंपले असल्याचे राज्य शासनाच्या आर्थिक पाहणी अहवालात आढळून आले आहे.१८ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कामाला ठेवणे, त्यांच्याकडून काम करून घेणे कायद्यान्वये गुन्हा आहे; मात्र शहरासह ग्रामीण भागात बाल कामगारांकडून लहानमोठी कामे सर्रासपणे करून घेतली जातात. हॉटेल्स, बार आणि दुकानांमध्ये ह्ययेथे बालकामगार नाहीतह्ण असे फलक लावलेले जाते; मात्र त्याच दुकानात लहान मुले काम करताना दिसतात. वीटभट्टयांवरही बालमजूर आई-वडिलांसोबत राबताना दिसतात. गारा तुडविणे, ओल्या विटा वाहून नेणे आदी कामे ही मुलं करताना दिसतात. शासकीय यंत्रणेच्या उदासिनतेमुळे शेकडो बालकामगार धोकादायक व्यवसायात करताना दिसतात. *हजारो बालकामगार मुख्य प्रवाहात गत तीन वर्षांत राष्ट्रीय बालकामगार प्रकल्पाच्या माध्यमातून बालमजुरांना मुख्य प्रवाहात आणण्याचे प्रयत्न करण्यात आले. राज्यात २0१२-१३ मध्ये ५ हजार १५0, २0१३-१४ मध्ये ५ हजार ११३, तर २0१४-१५ मध्ये ४ हजार ५३२ बालकामगारांना मुख्य प्रवाहात आणण्यात आले. काही मुलांनी दहावी, बारावी, व्यावसायिक शिक्षण घेतले आहे. *विविध व्यवसायातील बालमजूरव्यवसाय मुले चामडे २ टक्के जरीकाम २ टक्के तयार कपडे ३ टक्के ज्वेलरी ६ टक्के बेकरी ११ टक्के गॅरेज १४ टक्केवीटभट्टी २६ टक्केहॉटेल ३६ टक्के
चिमुकले हात जखडले कामात!
By admin | Updated: June 12, 2015 01:58 IST