शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

पिके करपली; दुबार पेरणीचे संकट, शेतकरी हवालदिल!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:24 IST

अकोला : पावसाने दांडी मारल्याने शेतात उगवलेली पिके करपली असून, दुबार पेरणीचे संकट निर्माण झाले आहे. त्यामुळे कोरोनाकाळात आधीच ...

अकोला : पावसाने दांडी मारल्याने शेतात उगवलेली पिके करपली असून, दुबार पेरणीचे संकट निर्माण झाले आहे. त्यामुळे कोरोनाकाळात आधीच आर्थिक विवंचनेत सापडलेल्या शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. शेतीची कामे ठप्प असल्याने, शेतमजुरांच्या हाताला काम मिळत नसल्याचे दुर्भिक्ष जिल्ह्यातील खारपानपट्ट्यातील ‘बारुला’ विभागात मंगळवारी समोर आले. जिल्ह्यातील इतरही भागांत असेच चित्र असल्याचे वास्तव आहे.

खरीप हंगामातील जवळपास ८० टक्के पेरण्या आटोपल्या असून, पेरणीनंतर मात्र पावसाने दांडी मारली आहे. गेल्या बारा, तेरा दिवसांपासून पाऊस नसल्याने, शेतात पेरलेले बियाणे काही ठिकाणी उगवले तर काही उगवले नाही. पावसाचा पत्ता नाही आणि तापत्या उन्हासोबतच प्रचंड उकाडा जाणवत असल्याने शेतात उगवलेल्या सोयाबीन, कपाशी, तूर, मूग व उडीद इत्यादी पिकांची वाढ खुंटली असून, पावसाअभावी अनेक शेतांत पिके करपली आहेत. त्यामुळे पेरणीसाठी शेतकऱ्यांनी केलेला खर्च बुडाला असून, दुबार पेरणीचे संकट निर्माण झाले आहे. कोरोनाकाळात आधीच आर्थिक विवंचनेत सापडलेल्या शेतकऱ्यांच्या हातातील पैसा पेरणीसाठी खर्च झाला असून, पिके करपल्याने दुबार पेरणीचा खर्च कसा भागविणार, याबाबतची चिंता शेतकऱ्यांना सतावत आहे. पावसाने दांडी मारल्याच्या स्थितीत शेतीची कामे ठप्प झाली असून, काही शेतकऱ्यांनी अद्यापही खरीप पेरणी केली नसून, हजारो रुपयांचे खरेदी केलेले बियाणे शेतकऱ्यांच्या घरातच पडून असल्याचे वास्तव आहे.

‘या’ गाव शिवारांत

असे आढळले वास्तव!

अकोला तालुक्यात बारुला विभागात घुसरवाडी, म्हातोडी, लाखोंडा, आपातापा, आखतवाडा, अनकवाडी, घुसर व खरप इत्यादी गाव शिवारांत बहुतांश शेतकऱ्यांनी खरीप पिकांची पेरणी केली असून, पावसाने दांडी मारल्याने काही ठिकाणी पिके उगवली तर काही ठिकाणी पिके उगवली नाही. उगवलेली पिकेदेखील पावसाअभावी करपली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना दुबार पेरणीशिवाय पर्याय उरला नाही. यासोबतच पावसाने दांडी मारल्याने शेतीची कामे बंद असल्यामुळे शेतमजुरांच्या हाताला काम नसल्याची स्थिती आहे.

२० एकरातील कपाशी करपली;

१.१५ लाख रुपयांचा खर्च बुडाला!

२० एकर शेतात कपाशीची पेरणी केली. पेरणीनंतर १२ दिवसांचा कालावधी उलटून गेला. मात्र, पावसाने दांडी मारल्याने शेतात काही ठिकाणी बियाणे उगवले असून, काही ठिकाणी बियाणे उगवले नाही. उगवलेले कपाशीचे पीक करपले आहे. आता दुबार पेरणीशिवाय पर्याय नाही. त्यामुळे कपाशीचे बियाणे, पेरणी, खत आणि मशागतीसाठी केलेला १ लाख १५ हजार रुपयांचा खर्च बुडाला आहे. अशी व्यथा घुसर येथील शेतकरी चंदू खडसे यांनी मांडली.

.....................फोटो.................

शेतकऱ्यांच्या अशा आहेत व्यथा............

१४ एकर शेतात कपाशीची पेरणी केली. कर्ज काढून बियाणे, पेरणी व मशागतीचा खर्च केला. मात्र, पेरणीनंतर पाऊस नसल्याने उगवलेले कपाशीचे पीक करपण्याच्या मार्गावर असून, दुबार पेरणीचे संकट निर्माण झाले आहे; परंतु दुबार पेरणीचा खर्च आता कसा भागविणार, याची चिंता सतावत असून, दुबार पेरणीसाठी सरकारने शेतकऱ्यांना मदत जाहीर केली पाहिजे.

-रामेश्वर बेहरे,

शेतकरी, घुसर.

.....................फोटो......................

चार एकर शेतात कपाशीची पेरणी केली. त्यानंतर पाऊस नसल्याने काही ठिकाणी पीक उगवले नाही, तर उगवलेले कपाशीचे पीक करपले आहे. त्यामुळे दुबार पेरणी करावी लागणार असून, या दुबार पेरणीचा खर्च भागविण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.

छंदक शिरसाट,

शेतकरी, म्हातोडी.

..................फोटो.................

सहा एकर शेतात मूग व आठ एकर शेतात कपाशीची पेरणी केली. पाऊस नसल्याने उगवलेले मुगाचे पीक कोमेजण्याच्या मार्गावर असून, आठ एकर शेतात पेरलेले कपाशीचे पीक कुठे उगवले तर कुठे उगवलेच नाही. उगवलेले पीकदेखील करपले आहे. त्यामुळे दुबार पेरणी करावी लागणार असून, दोन्ही पिकांच्या लागवडीसाठी केलेला खर्च बुडणार आहे.

गजानन भांडे,

शेतकरी, लाखोंडा.

.........................फोटो..........................

पाच एकरात कपाशीची पेरणी केली. त्यापैकी उगवलेले पीक कोमेजल्याने दुबार पेरणी करावी लागणार आहे. पेरणीसाठी केलेला खर्च व्यर्थ जाणार असून, दुबार पेरणीचा खर्च कसा भागविणार, याबाबतची आता चिंता आहे.

रवी घोडे,

शेतकरी, आपातापा.

........................फोटो..................................

पेरणीनंतर पाऊस नसल्याने शेतातील सोयाबीन व कपाशीचे पीक करपले आहे. या पिकांच्या लागवडीसाठी केलेला खर्च बुडाला असून, दुबार पेरणी करावी लागणार आहे. मात्र, दुबार पेरणीचा खर्च कसा करायचा, याबाबतची चिंता असून, पाऊस आला आणि पैसे हातात असले तर पेरणी करणार अन्यथा दुबार पेरणी करणे शक्य होणार नाही.

गजानन दुर्गे,

शेतकरी, आखतवाडा.

................फोटो.............................

पाच एकर शेतातील कपाशी, तसेच चार एकर शेतात सोयाबीन, तूर व मूग पेरणी केल्यानंतर पावसाने दांडी मारली. त्यामुळे पिकांची वाढ खुंटली असून, पिके करपली असल्याने दुबार पेरणीचे संकट निर्माण झाले आहे. हातातील पैसा पेरणीसाठी खर्च झाला असून, आता दुबार पेरणीचा खर्च कसा करणार, याबाबतची चिंता आहे. यासोबतच शेतमजुरांच्या हाताला काम नाही. त्यामुळे शासनाने दुबार पेरणीसाठी शेतकऱ्यांना मदत द्यावी तसेच शेतमजुरांसाठी रोहयो अंतर्गत कामे सुरू करण्याची गरज आहे.

दिलीप मोहोड,

सरपंच तथा शेतकरी, आखतवाडा.

..........................फोटो.......................

जीवन जगावं तरी कसं;

कोरोनापेक्षा कठीण परिस्थिती !

दहा दिवसांपूर्वी दोन एकर शेतात मूग, दोन एकर शेतात सोयाबीन व चार एकर शेतात कपाशीची पेरणी केली. पीक उगवले; परंतु पाऊस नसल्याने पिके करपली असून, दुबार पेरणीचे संकट आहे. मात्र, पेरलेल्या पिकांवर जवळचा पैसा खर्च झाल्याने आता दुबार पेरणीचा खर्च कसा करणार, याची चिंता आहे. त्यामुळे जीवन जगावं तरी कसं, कोरोनापेक्षा आमची परिस्थिती कठीण आहे, अशी व्यथा अनकवाडी येथील शेतकरी नीळकंठ थोरात यांनी व्यक्त केली. पीक नुकसानीचे पंचनामे करून शासनाने दुबार पेरणीसाठी मदत दिली पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली.

...................फोटो......................

पावसाची वाट; बियाणे घरातच!

नऊ एकर शेतात पेरणीसाठी कपाशी, सोयाबीन बियाणे घेतले. मात्र, पाऊस नसल्याने पेरणी केली नाही. त्यामुळे घेतलेले बियाणे घरातच पडून आहे. पावसाची वाट असून, पेरणीलायक पाऊस झाल्यानंतर पेरणी करणार आहे. आठ दिवसांत पाऊस आला नाही तर पेरणी साधणार नसून, रबी हंगामात हरभरा पिकाची पेरणी करावी लागणार आहे, असे घुसर येथील शेतकरी शेषराव तिडके यांनी सांगितले. तसेच पाऊस नसल्याने सात एकर शेतात अद्याप पेरणी केली नसल्याचे घुसर येथील शेतकरी चंद्रमणी गोपनायण यांनी सांगितले.

......................फोटो............................