शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; दहा वाजता मतमोजणीस होणार सुरुवात
2
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
3
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
6
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
7
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
8
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
9
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
10
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
11
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
12
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
13
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
14
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
15
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
16
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
17
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
18
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
19
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
20
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
Daily Top 2Weekly Top 5

कृषी विषयात ‘पीएचडी’ करणार्‍या विद्यार्थ्यांना मिळणार शिष्यवृती!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2018 01:14 IST

अकोला : कृषी विषयात पीएचडी (आचार्य) करणार्‍या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यात यावी, यासाठीचा प्रस्ताव प्रथमच अकोल्याच्या डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने शासनाला सादर केला आहे. हा प्रस्ताव मान्य झाल्यास आर्थिक कारणामुळे वंचित राहणार्‍या राज्यातील हजारो विद्यार्थ्यांना पीएचडी करता येईल.

ठळक मुद्देशासनाला प्रस्ताव सादर; डॉ.पंदेकृविचा पाठपुरावा

राजरत्न सिरसाट । लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : कृषी विषयात पीएचडी (आचार्य) करणार्‍या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यात यावी, यासाठीचा प्रस्ताव प्रथमच अकोल्याच्या डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने शासनाला सादर केला आहे. हा प्रस्ताव मान्य झाल्यास आर्थिक कारणामुळे वंचित राहणार्‍या राज्यातील हजारो विद्यार्थ्यांना पीएचडी करता येईल. राज्यात डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी व डॉ. बाळासाहेब सावंत कृषी विद्यापीठ, दापोली ही चार कृषी विद्यापीठे असून, या कृषी विद्यापीठांतर्गत खासगी व अनुदानित मिळून १९0 कृषी महाविद्यालयातून दरवर्षी हजारो विद्यार्थी कृषी विषयातील विविध (बीएससी, एमएससी) अभ्यासक्रमाला प्रवेश घेतात. यातील एमएससी उत्तीर्ण हजारो विद्यार्थ्यांना पुढे विविध विषयांत पीएचडी करायची असते; तथापि अनेक विद्यार्थ्यांची आर्थिक स्थिती कमकुवत असल्याने पीएचडी करता येत नाही. याच अनुषंगाने डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने पीएचडी करणार्‍या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यात यावी, यासाठीचा प्रस्ताव शासनाकडे पाठविला. इतर तीन कृषी विद्यापीठेही अनुकूल असून, याबाबतचा प्रस्ताव पाठवित आहेत. चारही कृषी विद्यापीठात दरवर्षी एक हजारांवर विद्यार्थी  कृषी, मत्स्य विज्ञान, वनशास्त्र, पशुसंवर्धन, सामाजिक विज्ञान, कृषी व्यवसाय व्यवस्थापन, बीटेक कृषी अभियांत्रिकी, बीटेक अन्न तंत्रज्ञान, कृषी जैव तंत्रज्ञान, कीटक शास्त्र, कृषी अर्थशास्त्र, वनस्पती शास्त्र, फलोत्पादन शास्त्र, कृषी हवामान शास्त्र असे अनेक विषयांत पीएचडीला प्रवेश घेतात. त्यासाठी या विद्यार्थ्यांना सामाईक (सीईटी) परीक्षा उत्तीर्ण करावी लागते. पीएचडी हा देखील शिक्षणाचाच भाग आहे, पण कृषी एमएससी केल्यानंतर पीएचडीला शिष्यवृत्ती मिळत नाही. त्यामुळे इच्छा व गुणवत्ता असूनही हजारो विद्यार्थी सीईटीच देत नाहीत. दरम्यान, अशा विद्यार्थ्यांना पीएचडी करण्याची संधी मिळावी, यासाठी शासनही अनुकूल असून शिष्यवृत्ती मिळेल, असा विश्‍वास कृषी विद्यापीठाला आहे. असे झाले तर प्रती महिना पंधरा हजार रुपयांच्या जवळपास ही शिष्यवृत्ती राहील, असे वृत्त आहे.

कृषी अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना पीएचडी करता यावी, यासाठी शासनाला प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. शासनही  याबाबत अनुकूल आहे. असे झाल्यास पीएचडीपासून वंचित राहणार्‍या हजारो विद्यार्थ्यांना दिलासा मिळेल. डॉ.व्ही.एम. भाले, कुलगुरू , डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ,अकोला.   

टॅग्स :Dr. Punjabrao Deshmukh Krushi Vidhyapithडॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठAkola cityअकोला शहर