शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

वीटभट्टीसाठी लागणार परवानगी; प्रदूषण नियंत्रण मंडळाने केला नियमात बदल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2018 13:11 IST

अकोला : विटांच्या ठरलेल्या आकारानुसार एकाचवेळी २५ आणि ५० हजार नगांची निर्मिती करणाऱ्या वीटभट्टीधारकांना तीन दिवसांनंतर पुन्हा वीटभट्टी लावण्यासाठी सक्षम अधिकाºयांची परवानगी घेणे बंधनकारक करण्यात आले आहे.

- सदानंद सिरसाटअकोला : विटांच्या ठरलेल्या आकारानुसार एकाचवेळी २५ आणि ५० हजार नगांची निर्मिती करणाऱ्या वीटभट्टीधारकांना तीन दिवसांनंतर पुन्हा वीटभट्टी लावण्यासाठी सक्षम अधिकाºयांची परवानगी घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. हवेचे प्रदूषण रोखण्यासाठी पर्यावरण (संरक्षण) कायदा १९८६ नुसार राष्ट्रीय हवा गुणवत्ता मानकांचे पालन करण्याचे निर्देश महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाने विभागीय कार्यालयांना दिले आहेत.राष्ट्रीय, राज्य महामार्ग, गावे, वस्त्यालगत सुरू असलेल्या वीटभट्ट्यांमुळे प्रदूषणात होत असलेली वाढ रोखण्यासाठी प्रदूषण नियंत्रण मंडळाने कारवाई करण्याला सातत्याने बगल दिली आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळाने राज्यातील पारंपरिक वीटभट्ट्यांसाठी (स्थान, निश्चिती व उद्योग उभारणी) नियम २०१६ प्रसिद्ध केला आहे. त्यानुसार या वीटभट्ट्या कोणत्या ठिकाणी असू नयेत, याबाबत विविध ठिकाणे, रस्ते, गावांपासूनचे अंतरही निश्चित केले आहे. या नियमांचा भंग करणाºया वीटभट्ट्यांवर कारवाई करण्याचे अधिकार महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला आहेत; मात्र कारवाईस टाळाटाळ करण्यात आली. त्यावर प्रदूषण नियंत्रण मंडळाने कोणत्या मुद्यांवर कारवाई करावी, याबाबत पर्यावरण विभागाच्या सप्टेंबर २०१८ मध्ये झालेल्या बैठकीत नियम २०१६ मध्ये सुधारणा करण्यात आली. त्या सुधारित नियमानुसार कारवाई करण्याचे पत्र २ नोव्हेंबर २०१८ रोजीच प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या विभागीय कार्यालयांना देण्यात आले.

हवेचे प्रदूषण रोखण्याचा उपायहवेची गुणवत्ता खराब होत असल्याने पर्यावरणाला मोठा धोका निर्माण झाला आहे. त्यातून सजीवांच्या आरोग्यावरही विपरीत परिणाम झाला आहे. तो रोखण्यासाठी राष्ट्रीय हवा गुणवत्ता मानकांचे पालन बंधनकारक करण्यात आले. त्यानुसार वीटभट्टी लावण्याचा नियमही ठरवून देण्यात आला.

वीटभट्टीच्या धुरामुळे पर्यावरणाचा घातवीटभट्टीमध्ये ९:४:६ इंच आकाराचे २५ हजार तसेच ९:४:३ इंच आकाराचे ५० हजार नगांची एकाचवेळी निर्मिती केल्यानंतर तीन दिवसांत पुन्हा वीटभट्टी लावायची असल्यास सक्षम अधिकाºयांनी परवानगी दिल्यानंतरच लावता येणार आहे. त्यासाठी राष्ट्रीय हवा गुणवत्ता मानकांचे पालन होत असल्याची खात्री अधिकाºयांना करावी लागणार आहे. निर्मितीच्या आकड्यासाठी पुन्हा तपासणीजिल्ह्यातील अनेक वीटभट्ट्यांवर नोव्हेंबर ते जून या आठ महिन्यांच्या काळात आठवडाभरात एका भट्टीवर लाखापेक्षाही अधिक विटा तयार केल्या जातात; मात्र त्यातून किती विटांची निर्मिती केली जात आहे, यासाठी पुन्हा तपासणीची तयारी होण्याची शक्यता आहे.

 

टॅग्स :Akolaअकोलाpollutionप्रदूषण